शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

बावीस फूट उंचीवरील पत्र्यातून मुलांचे पलायन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:23 IST

सातारा : येथील बालसुधारगृहातून आठ मुले पळून गेली, हा धाडसाचा एक नमुनाच म्हणावा लागेल. कारण, २० ते २२ फूट ...

सातारा : येथील बालसुधारगृहातून आठ मुले पळून गेली, हा धाडसाचा एक नमुनाच म्हणावा लागेल. कारण, २० ते २२ फूट उंचीवरील पत्रा फोडून बाहेर पडणे सहजासहजी शक्य नाही. मनोरा रचून व बाथरुमच्या दरवाजावर पाय ठेवत हातात हात घेऊन ते बाहेर पडल्याचे स्पष्ट होत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे त्यांच्या पथ्यावर पडले, त्यामुळे दिवसाही पलायन करण्यात ते यशस्वी ठरले.साताऱ्यातील सदर बझार परिसरात मुला-मुलींचे निरीक्षण, बालगृह, आधार गृह (रिमांड होम) आहे. या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी ठेवण्यात येते. तसेच कायदेशीर रखवालीसाठी ठेवले जाते. याच निरीक्षणगृहातूनअवघ्या दोन दिवसांत आठ मुले पळून गेली आहेत. मंगळवारी चार मुले बेपत्ता झाली होती. त्यानंतर दुसºयाच दिवशी म्हणजे बुधवारीही आणखी चार मुलांनी पलायन केले, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. ही खळबळ उडण्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे ही मुले रात्री नव्हे तर चक्क दिवसा पळून गेली आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, रिमांड होममधील साधारणपणे १५ बाय २० च्या खोलीत मंगळवारी सुमारे १० मुले होती. त्यातील चारजण सायंकाळी चारच्या सुमारास खोलीवरील २० ते २२ फूट उंचीवरील सिमेंटचा पत्रा फोडून बाहेर पडले. हे सर्वजण १५ ते १७ वर्षांच्या दरम्यानचे होते. त्यांनी मनोरा रचून व तेथील बाथरुमच्या दरवाजावर पाय ठेवून पत्र्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रा काढून ते बाहेर पडले. तर दुसºया दिवशीही चौघाजणांनी पलायन केले. ते तर सकाळी दहाच्या सुमारास हे विशेष.पहिल्या दिवशी ज्या खोलीतून मुलांनी पलायन केले. तेथील वरील एक पत्रा काढला होता. त्यानंतर तेथे असणाºया सर्व मुलांना शेजारच्या खोलीत हलविले. शिफ्ट केलेल्या खोलीतून चौघेजण निसटले. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास जेवण करत असतानाच त्यांनी हा प्रकार केला. त्यासाठी ते शिफ्ट झालेल्या खोलीतील वरील लोखंडी अँगलवरून प्रथम राहत असणाºया खोलीत गेले. कारण दोन्ही खोल्यांच्या मधील भिंतीवरून दोन्हीकडे जाता येते. त्याठिकाणी पहिल्या दिवशी पलायन केलेल्या मुलांप्रमाणेच हुशारी वापरून त्यांनी फोडलेल्या पत्र्यातूनच बाहेर पडण्याचे धाडस केले.या निरीक्षणगृहात सुरक्षारक्षक नाहीत. तेथील काळजीवाहकच या मुलांकडे लक्ष ठेवतात. त्यामुळे येथील सुरक्षिततेचा प्रश्न खºया अर्थाने समोर आला आहे. यावर वेळीच विचार करण्याचीही गरज आहे. तरच अशा घटना टाळता येतील.तीन पथके; आणखी दोघांना पकडण्यात यशपळून गेलेले सर्वजण १५ ते १७ वयोगटातील असून वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील रहिवासी आहेत. यामधील एकाला गुरुवारी पकडले होते. तर इतरांच्या मागावर पोलिसांची तीन पथके आहेत. त्यामधील आणखी दोघांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. आता इतर मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.