शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

बावीस फूट उंचीवरील पत्र्यातून मुलांचे पलायन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:23 IST

सातारा : येथील बालसुधारगृहातून आठ मुले पळून गेली, हा धाडसाचा एक नमुनाच म्हणावा लागेल. कारण, २० ते २२ फूट ...

सातारा : येथील बालसुधारगृहातून आठ मुले पळून गेली, हा धाडसाचा एक नमुनाच म्हणावा लागेल. कारण, २० ते २२ फूट उंचीवरील पत्रा फोडून बाहेर पडणे सहजासहजी शक्य नाही. मनोरा रचून व बाथरुमच्या दरवाजावर पाय ठेवत हातात हात घेऊन ते बाहेर पडल्याचे स्पष्ट होत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे त्यांच्या पथ्यावर पडले, त्यामुळे दिवसाही पलायन करण्यात ते यशस्वी ठरले.साताऱ्यातील सदर बझार परिसरात मुला-मुलींचे निरीक्षण, बालगृह, आधार गृह (रिमांड होम) आहे. या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी ठेवण्यात येते. तसेच कायदेशीर रखवालीसाठी ठेवले जाते. याच निरीक्षणगृहातूनअवघ्या दोन दिवसांत आठ मुले पळून गेली आहेत. मंगळवारी चार मुले बेपत्ता झाली होती. त्यानंतर दुसºयाच दिवशी म्हणजे बुधवारीही आणखी चार मुलांनी पलायन केले, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. ही खळबळ उडण्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे ही मुले रात्री नव्हे तर चक्क दिवसा पळून गेली आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, रिमांड होममधील साधारणपणे १५ बाय २० च्या खोलीत मंगळवारी सुमारे १० मुले होती. त्यातील चारजण सायंकाळी चारच्या सुमारास खोलीवरील २० ते २२ फूट उंचीवरील सिमेंटचा पत्रा फोडून बाहेर पडले. हे सर्वजण १५ ते १७ वर्षांच्या दरम्यानचे होते. त्यांनी मनोरा रचून व तेथील बाथरुमच्या दरवाजावर पाय ठेवून पत्र्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रा काढून ते बाहेर पडले. तर दुसºया दिवशीही चौघाजणांनी पलायन केले. ते तर सकाळी दहाच्या सुमारास हे विशेष.पहिल्या दिवशी ज्या खोलीतून मुलांनी पलायन केले. तेथील वरील एक पत्रा काढला होता. त्यानंतर तेथे असणाºया सर्व मुलांना शेजारच्या खोलीत हलविले. शिफ्ट केलेल्या खोलीतून चौघेजण निसटले. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास जेवण करत असतानाच त्यांनी हा प्रकार केला. त्यासाठी ते शिफ्ट झालेल्या खोलीतील वरील लोखंडी अँगलवरून प्रथम राहत असणाºया खोलीत गेले. कारण दोन्ही खोल्यांच्या मधील भिंतीवरून दोन्हीकडे जाता येते. त्याठिकाणी पहिल्या दिवशी पलायन केलेल्या मुलांप्रमाणेच हुशारी वापरून त्यांनी फोडलेल्या पत्र्यातूनच बाहेर पडण्याचे धाडस केले.या निरीक्षणगृहात सुरक्षारक्षक नाहीत. तेथील काळजीवाहकच या मुलांकडे लक्ष ठेवतात. त्यामुळे येथील सुरक्षिततेचा प्रश्न खºया अर्थाने समोर आला आहे. यावर वेळीच विचार करण्याचीही गरज आहे. तरच अशा घटना टाळता येतील.तीन पथके; आणखी दोघांना पकडण्यात यशपळून गेलेले सर्वजण १५ ते १७ वयोगटातील असून वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील रहिवासी आहेत. यामधील एकाला गुरुवारी पकडले होते. तर इतरांच्या मागावर पोलिसांची तीन पथके आहेत. त्यामधील आणखी दोघांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. आता इतर मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.