शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

बावीस फूट उंचीवरील पत्र्यातून मुलांचे पलायन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:23 IST

सातारा : येथील बालसुधारगृहातून आठ मुले पळून गेली, हा धाडसाचा एक नमुनाच म्हणावा लागेल. कारण, २० ते २२ फूट ...

सातारा : येथील बालसुधारगृहातून आठ मुले पळून गेली, हा धाडसाचा एक नमुनाच म्हणावा लागेल. कारण, २० ते २२ फूट उंचीवरील पत्रा फोडून बाहेर पडणे सहजासहजी शक्य नाही. मनोरा रचून व बाथरुमच्या दरवाजावर पाय ठेवत हातात हात घेऊन ते बाहेर पडल्याचे स्पष्ट होत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे त्यांच्या पथ्यावर पडले, त्यामुळे दिवसाही पलायन करण्यात ते यशस्वी ठरले.साताऱ्यातील सदर बझार परिसरात मुला-मुलींचे निरीक्षण, बालगृह, आधार गृह (रिमांड होम) आहे. या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी ठेवण्यात येते. तसेच कायदेशीर रखवालीसाठी ठेवले जाते. याच निरीक्षणगृहातूनअवघ्या दोन दिवसांत आठ मुले पळून गेली आहेत. मंगळवारी चार मुले बेपत्ता झाली होती. त्यानंतर दुसºयाच दिवशी म्हणजे बुधवारीही आणखी चार मुलांनी पलायन केले, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. ही खळबळ उडण्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे ही मुले रात्री नव्हे तर चक्क दिवसा पळून गेली आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, रिमांड होममधील साधारणपणे १५ बाय २० च्या खोलीत मंगळवारी सुमारे १० मुले होती. त्यातील चारजण सायंकाळी चारच्या सुमारास खोलीवरील २० ते २२ फूट उंचीवरील सिमेंटचा पत्रा फोडून बाहेर पडले. हे सर्वजण १५ ते १७ वर्षांच्या दरम्यानचे होते. त्यांनी मनोरा रचून व तेथील बाथरुमच्या दरवाजावर पाय ठेवून पत्र्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रा काढून ते बाहेर पडले. तर दुसºया दिवशीही चौघाजणांनी पलायन केले. ते तर सकाळी दहाच्या सुमारास हे विशेष.पहिल्या दिवशी ज्या खोलीतून मुलांनी पलायन केले. तेथील वरील एक पत्रा काढला होता. त्यानंतर तेथे असणाºया सर्व मुलांना शेजारच्या खोलीत हलविले. शिफ्ट केलेल्या खोलीतून चौघेजण निसटले. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास जेवण करत असतानाच त्यांनी हा प्रकार केला. त्यासाठी ते शिफ्ट झालेल्या खोलीतील वरील लोखंडी अँगलवरून प्रथम राहत असणाºया खोलीत गेले. कारण दोन्ही खोल्यांच्या मधील भिंतीवरून दोन्हीकडे जाता येते. त्याठिकाणी पहिल्या दिवशी पलायन केलेल्या मुलांप्रमाणेच हुशारी वापरून त्यांनी फोडलेल्या पत्र्यातूनच बाहेर पडण्याचे धाडस केले.या निरीक्षणगृहात सुरक्षारक्षक नाहीत. तेथील काळजीवाहकच या मुलांकडे लक्ष ठेवतात. त्यामुळे येथील सुरक्षिततेचा प्रश्न खºया अर्थाने समोर आला आहे. यावर वेळीच विचार करण्याचीही गरज आहे. तरच अशा घटना टाळता येतील.तीन पथके; आणखी दोघांना पकडण्यात यशपळून गेलेले सर्वजण १५ ते १७ वयोगटातील असून वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील रहिवासी आहेत. यामधील एकाला गुरुवारी पकडले होते. तर इतरांच्या मागावर पोलिसांची तीन पथके आहेत. त्यामधील आणखी दोघांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. आता इतर मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.