शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस हजार प्रकल्पग्रस्तांचा एक वेळ अन्नत्याग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:43 IST

कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या आठवा दिवशी दुसरा टप्पा जाहीर करून सुमारे पंचवीस ...

कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या आठवा दिवशी दुसरा टप्पा जाहीर करून सुमारे पंचवीस हजार प्रकल्पग्रस्त व कुटुंबीय सदस्यांनी एक वेळ अन्नत्याग करत आंदोलन सुरू ठेवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सह्याद्री अतिथीगृह येथील निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम असलेल्या प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा सोमवारी दुसरा टप्पा सुरू होत आहे. यामध्ये राज्यातील सात जिल्ह्यांतील साडेपाच हजार कुटुंब खातेदार व त्यांचे कुटुंबीय असे एकूण पंचवीस हजार ते सव्वीस हजार लोक सहभागी झाले आहेत.

कोयनेचे प्रश्न हे सातारा जिल्ह्यातील अधिकारीच लांबवत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गावागावात एक वेळचे अन्नत्याग करून आपल्या दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. ही लढाई निकराने व प्रत्यक्षात अंमलबजावणी प्रारंभ न झाल्यास आरपारची लढाई लढू, असा इशारा कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त जनतेने दिला आहे. वेळ पडल्यास अधिक आंदोलन तीव्र करून होणाऱ्या परिणामास सातारा जिल्ह्याचे प्रशासन व राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनात सातारा, सांगली जिल्ह्यातील लोक सहभागी असून, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व हरिचंद्र दळवी हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

(चौकट)

आंदोलनकर्त्यांकडून निषेध...

सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचे जे काम आता सुरू आहे ते काम म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशा पद्धतीने सुरू आहे. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच विलंब होत आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

===Photopath===

240521\img-20210524-wa0026.jpg

===Caption===

कोयना धरणग्रस्तांची चौथी पिढीही आंदोलनात सक्रिय