शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

गुळव्या पंचवीस लाखांच्या गाडीतून!

By admin | Updated: March 13, 2015 23:54 IST

सदाभाऊ खोत यांचा टोला : तांबवे येथे सभा; कारखान्याची यंत्रणा अध्यक्षांच्या दिमतीला

कऱ्हाड : ‘सभासद कारखान्याचा मालक आहे आणि त्याला प्रत्यक्षात गुलामापेक्षा वाईट वागणूक द्यायची, ही सह्याद्रीच्या साखरसम्राटाची खासियत आहे. जर सभासद खरंच मालक असेल, तर कारखान्याचा अध्यक्ष गुऱ्हाळाच्या गुळव्याप्रमाणे कारखान्याचा गुळव्या असायला पाहिजे; पण आज गुळव्याच पंचवीस लाखांच्या गाडीतून फिरतोय. त्याच्या दिमतीला साखर कारखान्याची यंत्रणा वापरली जाते; पण खऱ्या मालकाची काय अवस्था आहे, हे न सांगितलेलंच बरं ! हे सारं बदलण्याची संधी आली आहे. त्या संधीचा लाभ उठवा,’ असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी लगावला.तांबवे, ता. कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते. पॅनेलप्रमुख लालासाहेब यादव, काँग्रेसचे धैर्यशील कदम, स्वाभिमानीचे मनोज घोरपडे, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, भीमराव पाटील, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, जयदीप यादव, उत्तम दसवंत, बाबूराव पवार, सह्याद्रीचे माजी संचालक निवासराव पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण, कोयना बँकेचे संचालक अविनाश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.खोत म्हणाले, ‘कारखान्याचा फक्त एक टक्का साखर उतारा चोरला तर सह्याद्रीचे गळीत लक्षात घेता प्रतिटन दहा किलो साखरेचे तेरा लाख मेट्रिक टन वजनाचे वर्षाला ३२ कोटी मिळतात. मोकळी पोती, काटामारीसह इतर कमिशन वेगळेच. अशा साखरसम्राटाला धडा शिकविण्यासाठी हक्काच्या लढाईत एकत्र या.’ ‘यशवंतराव चव्हाण यांनी साखर कारखान्याचा शेतकरी मालक बनविण्याची किमया केली; पण ज्यांच्या हातात सत्ता राहिली हीच मंडळी आज मालक बनली आहेत. खरंतर सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणुकीत पॅनेल टाकणेच अवघड. अशा परिस्थितीत एकास एक उमेदवार दिला हाच आपला पहिला विजय आहे.’लालासाहेब यादव म्हणाले, ‘सह्याद्रीत यशवंतरावांच्या विचारांचीच प्रतारणा सुरू आहे. कारखाना खासगी करण्याचा कुटील डाव असून, त्यासाठीच कोट्यवधींच्या आर्थिक अडचणीत आणला आहे. आज कारखाना ८० कोटी शॉर्टमार्जिन मध्ये आहे. गतवर्षीची १३ लाख पोती शिल्लक आहेत. आणि कोट्यवधींचा भुर्दंड संचालक मंडळाच्या नाकर्तेपणामुळे सभासदांच्या माथ्यावर मारला जात आहे. संचालक मंडळ म्हणजे ‘तोंड असून बोलायचे नाही आणि डोळे असून बघायचे नाही,’ अशी अवस्था आहे.’ निवासराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठलराव जाधव यांनी आभार मानले. यावेळी महेंद्र पाटील, रघुनाथ नलवडे, शिवाजीराव गायकवाड, उत्तम पाटील, तानाजी पवार, श्रीमंत काटकर, तुकाराम डुबल, एच. एन. सुर्वे, प्रभाकर शिंदे, लक्ष्मण जाधव यांच्यासह शेकडो सभासद उपस्थित होते. यावेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. (प्रतिनिधी)तर त्यांनाही मानधन देईन..‘मी २७ वर्षे चळवळीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आणि येरवडा जेलची हवाही खाल्ली आहे. पण, मी इथे प्रचाराला आलो तर मानधनावरचा प्रचारक असा आरोप सुरू झालाय. आमदार बाळासाहेबांनीही शेतकऱ्यांसाठी चळवळ करून दाखवावी. एकदा तरी कळंबा जेलमध्ये जावं. मग मीही त्यांना मानधन देईन,’ अशी खिल्ली सदाभाऊ खोत यांनी उडविली.सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा चेहरा नेहमीच दारिद्र्यरेषेखाली असल्याप्रमाणे दिसतो; पण त्यांच्या वरकरणी रूपाला भुलू नका. त्यांनी सह्याद्रीतून भरपूर हाणलंय, अशी खरपूस टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली.