कऱ्हाड : पोलिसांच्या ताब्यातील संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस यांच्यासह बाराजणांना तडकाफडकी निलंबित केले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केली नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, मृत रावसाहेब जाधवच्या नातेवाइकांसह शेकडोंचा जमाव रविवारी सकाळपासून कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होता. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. चोवीस तासांनंतर (पान १ वरून) रविवारी रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बसमधून ७७ लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती. याबाबतचा गुन्हा कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस या प्रकरणाचे तपासी अधिकारी होते. शुक्रवारी या प्रकरणातील संशयिताबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेला माहिती मिळाली. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह सहा कर्मचारी संशयित रावसाहेब जाधवला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यांनी रावसाहेब जाधवसह अनिल दशरथ डिकोळे (वय ३६, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेऊन कऱ्हाडात आणले. शनिवारी तपासकामी ते त्या दोघांना घेऊन कार्वे नाका चौकीत गेले होते. त्या ठिकाणी उलटी होऊन प्रकृती खालावल्याने जाधवला उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. रावसाहेब जाधव याच्यावर यापूर्वी आंध्रप्रदेश पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही त्याचा हात असण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच कर्तव्यातही कसूर केली आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडून केला जात आहे. तपास पथकावरील आरोप ४संशयित रावसाहेब जाधवला कऱ्हाडला आणले त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस रजेवर असतानाही उपस्थित होते. ४रावसाहेब जाधवच्या अंगावर काळे, निळे व्रण आहेत. मात्र, ते मारहाणीमुळेच झालेत का, हे आताच निश्चितपणे सांगता येत नाही. ४रावसाहेब जाधव व अनिल डिकोळे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना त्याबाबत सांगणे गरजेचे होते. मात्र, तसे झालेले नाही. ४ज्या ठिकाणी कारवाई झाली तेथील स्थानिक पोलिसांनाही याबाबत कसलीच कल्पना देण्यात आलेली नाही. ४ संशयित ताब्यात घेतलेल्याची नोंद कऱ्हाडच्या स्टेशन डायरीतही केली गेलेली नाही. महिलांचा पोलिस ठाण्यात आक्रोश ४मृत रावसाहेब जाधव यांच्या नातेवाईक महिलांसह शेकडोंचा जमाव रविवारी सकाळीच कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. ४जमावाने पोलिस ठाण्यासमोरच ठाण मांडले. यावेळी उपस्थित महिलांनी मोठा आक्रोश केला होता. ४सकाळी अकरापासून रात्री उशिरापर्यंत महिला एकाच ठिकाणी बसून होत्या.
अधिकाऱ्यासह बारा पोलिस निलंबित
By admin | Updated: June 20, 2016 00:43 IST