शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अडीच एकरात पिकवला बारा लाखांचा कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:39 IST

सिद्धार्थ सरतापे वरकुटे-मलवडी कांदा हे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, सातारा ...

सिद्धार्थ सरतापे

वरकुटे-मलवडी

कांदा हे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील आणि दुष्काळ शापीत माण तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या कुरणेवाडीतील कांतिलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांना कांद्याचे पीक वरदान ठरले आहे. त्यांनी अडीच एकर कांद्याच्या शेतीतून तब्बल १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून पिचलेल्या शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे..

कुरणेवाडी येथील कांतिलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांची अडीच एकर जमीन आहे. याअगोदर त्या जमिनीत ज्वारी, बाजरी यांसारखी पारंपरिक पिके घेतली जात होती. त्यावरही कधी अस्मानी, तर कधी सुल्तानी संकटाने ग्रासलेल्या शेतीतून जेमतेम प्रपंच चालवण्याइतपतच उत्पन्न निघत असे. अनेकदा प्रचंड तोटाही सहन करावा लागत असे. यामुळे शेती करत असताना उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने, त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण शेतात कांदा लागवड करायचे ठरवले.

गेल्या वर्षी दमदार पडलेल्या पावसाने पाणी साठा टिकून आहे. मशागतीसाठी एकूण दीड लाख रुपये खर्च आला. साधारण ८० दिवसातच अडीच महिन्यांचा कांदा ६ टन विकला. त्यास साधारणपणे ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यानुसार २ लाख ४० हजार रुपये झाले आहेत आणि पाच महिन्यांच्या दीड एकर कांद्याची काढणी सुरू आहे. तोही चांगला पोसला असून, जवळपास १९ ते २० टन भरणार असल्याची खात्री आहे. चालू कांद्याच्या वाढत्या दरानुसार सरासरी ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची शक्यता असून, ९ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

ऑक्टोबरपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाच महिन्यात बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी त्यांना वरकुटे - मलवडी परिसरातील कृषी मार्गदर्शक अनिरुद्ध (छोट्या) आटपाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सांगलीच्या बाजारपेठेत बोली लावून व्यापाऱ्यांना कांद्याची विक्री केली. कांद्याचा रंग आकर्षक असल्याने त्यांना सध्या ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने सर्व खर्च वजा जाता १० लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.

कोट :

आत्तापर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याने तोट्यात जात होतो. परंतु कांद्याची आधुनिक पद्धतीने लागवड करून कमी खर्चात आणि जेमतेम पाण्यात चांगले उत्पन्न मिळवले. शिवाय कोणत्या वेळेला कोणती खते द्यायची, याबाबत माहिती करून घेतल्यास, कमी पाण्यातसुद्धा दर्जेदार उत्पन्न मिळवता येते. याबद्दल खात्री झाली आहे.

कांतिलाल खांडेकर.

(सामान्य शेतकरी, कुरणेवाडी)