शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

जंगलात बांधलेली बारा घरं जमीनदोस्त

By admin | Updated: December 4, 2014 00:45 IST

महाबळेश्वरात कारवाई : वनविभागाने केली दोघांना अटक; सात वाहने जप्त

महाबळेश्वर : येथून तीन किमी अंतरावर असलेल्या देवी चौकाजवळील दाट जंगलात अतिक्रमण करून विनापरवाना उभारलेली बारा घरे येथील विभागीय वन अधिकारी दादासाहेब शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाने आज सकाळी प्रचंड बंदोबस्तात उद्ध्वस्त केली. या प्रकरणी चंद्रकांत ढेबे व चंद्रकांत डोईफोडे या दोघांना अटक करण्यात आली. तसेच दोन चारचाकी ५ दुचाकी अशी एकूण सात वाहनेही वनविभागाने जप्त केली. या धडक कारवाईमुळे या भागात खळबळ उडाली आहे.महाबळेश्वर-सातारा मार्गावर असलेल्या देवी चौकाजवळील सर्व्हे क्रमांक १० मधील घनदाट जंगलात मे महिन्यांत येथील काही लोकांनी अतिक्रमण केले होते. साधारणत: १५ ते २० गुंठे क्षेत्रामध्ये वृक्षतोड करून लोखंडी अँगल व पत्रा वापरून घरे उभारली होती. यासंदर्भात वन विभागाने बारा जणांवर गुन्हा नोंद केला होता व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५३, ५४ नुसार संबंधितांना नोटीस वली होती. तरीही अतिक्रमण काढण्यात न आल्याने वनविभागाने ही कारवाई केली. या कारवाईत मोकळी दोन ते तीन घरे पाडण्यात आली. मात्र काही घरांमध्ये लोक राहत असल्याने त्या घरांवर कारवाई न करता नोटीस बजावण्यात आली होती. वन विभागाच्या नोटीसमध्ये म्हटले होते की, ‘आपण पुढील काही दिवसांत हे अतिक्रमण हटवावे, अन्यथा वनविभागाकडून कारवाई केली जाईल व सर्व माल जप्त करून सरकारजमा करण्यात येईल.’ वन विभागाने केलेल्या आवाहनास येथील लोकांनी प्रतिसाद दिला नाही. उलट तेथे पुन्हा वृक्षतोड करून कूपनलिका काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे वनविभागाने धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी सकाळी कोल्हापूर विभागीय वनसंरक्षक दादासाहेब शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपवनसंरक्षक एन. एम. मोहिते, नीता ढेरे-कट्टे, दीपक खाडे, वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी, पी. डी. बुधनवार, ए. ए. पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, वनपाल, वनरक्षक, ४० पोलीस कर्मचारी व ७० वनकर्मचारी एवढा फौजफाटा घेऊन वनविभागाने कारवाईला प्रारंभ केला.अनेक घरांत राहिणाऱ्या महिला व मुलांना घराबाहेर काढण्यात आले. सामान घराबाहेर काढण्यात आले व जेसीबीच्या साह्याने घरे उद्धस्त करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी तेथे राहणाऱ्या लोकांनी गोंधळ सुरू केला. परंतु बंदोबस्त असल्यामुळे कारवाईत खंड पडला नाही. या कारवाईत नुकतीच खोदलेली कूपनलिका जेसीबीच्या साह्याने उखडून काढण्यात आली. घरासाठी वापरलेले लोखंड, पत्रे हे सर्व सामान वनविभागाने जप्त केले आहे. कारवाईत अडथळा येऊ नये म्हणून सर्व लोकांना वनविभागाने ताब्यात घेतले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांना दुपारी सोडून देण्यात आले. (प्रतिनिधी)