शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी मूल्यमापन सुत्रांची विद्यार्थ्यांना धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST

अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांना गुणांकनात घसरणीची भीती लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील बारावीच्या शिक्षण मंडळाच्या परीक्षा रद्द ...

अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांना गुणांकनात घसरणीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील बारावीच्या शिक्षण मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महिना उलटून गेला तरीही अद्याप शिक्षण मंडळाकडून त्याच्या निकालाची मूल्यमापनाचे सूत्र आणि पध्दती जाहीर करण्यात आलेली नाही. मूल्यमापनाचे सूत्र कसे आणि काय असेल, याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात मात्र धाकधूक वाढली आहे.

बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने ३ जून रोजी जाहीर केला. त्यांनतर शिक्षण मंडळ, तज्ज्ञ आणि शिक्षणमंत्र्यांच्या बैठका सुरू झाल्या. दरम्यान, सीबीएसई मंडळाच्या मूल्यमापनाच्या धर्तीवर बारावी शिक्षण मंडळाच्या निकालाचे सूत्र मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार तयार करण्यात आले आहे. त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होऊन ते जाहीर होण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

दरम्यान, सीबीएसईच्या निकालासाठी ३०:३०:४० असे सूत्र वापरण्यात आले आहे. त्याच धर्तीेवर बारावी राज्य शिक्षण मंडळाच्या निकालासाठीही दहावी, अकरावीच्या गुणांचा विचार करणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे.

पॉईंटर

मुले :

मुली :

तृतीयपंथी :

एकूण :

चौकट

अकरावीच्या गुणांचा अंतर्भाव बारावीत नको

राज्य शिक्षण मंडळाने अकरावीच्या गुणांना सीबीएसईप्रमाणे ३० टक्के वेटेज दिले तर अंतिम गुणांकनात घसरण होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे, २०१९-२०२० या वर्षात उशिरा सुरू केलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि उरलेल्या काही महिन्यांत पूर्ण न झालेला अभ्यासक्रम यामुळे विद्यार्थ्यांनी स्वाध्याय, गृहपाठ, चाचण्या यांच्याकडे लक्ष न दिल्याने ते रेस्ट इयर म्हणूनच गेल्याच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. यातच जर अकरावीच्या गुणांचा अंतर्भाव बारावी निकालात होणार असेल तर निश्चितच निकाल खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळ आता बारावीच्या मूल्यांकनासाठी नेमके काय सूत्र ठरवणार, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

बारावी मूल्यांकनाची अद्यापही प्रतीक्षाच

बारावीचे राज्यातील लाखो विद्यार्थी राज्य मंडळाच्या बारावी मूल्यांकनाचे निकष काय तयार झाले, याबाबत प्रतीक्षा करत आहेत. पुढील दोन दिवसात हे निकष जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीएसईप्रमाणेच दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्षांचे गुण ग्राह्य धरून अंतर्गत मूल्यमापन केले जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बारावीच्या परीक्षांचे निकष जाहीर झाल्यानंतर ३१ जुलैपर्यंत या परीक्षांचा निकालही राज्य शिक्षण मंडळांनी जाहीर करायचा आहे. त्यामुळे निकालासाठी राज्य शिक्षण मंडळाला कमी वेळ मिळण्याची शक्यता असल्याने मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

कोट

बारावीच्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अपूर्ण राहिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तर या काळात सर्वाधिक परिणाम झाला. अकरावीच्या वर्षात विद्यार्थी गंभीरपणे अभ्यास करत नाहीत. त्यामुळे अकरावी, बारावीच्या गुणांचे पूर्ण नियंत्रण महाविद्यालयांच्या हातात असणार आहे. अशात दहावीची परीक्षा ही शिक्षण मंडळाची असल्याने त्यात गुणांचे समानीकरण असल्याने त्यात गुणांचे समानीकरण होण्यास मदत होईल आणि हुशार विद्यार्थ्यांवरही अन्याय होणार नाही.

- प्रा. डॉ. चंद्रकांत माने, पाटण

बारावीचा निकाल कसा आणि कुठल्या सुत्रावर लागणार, हे निश्चित नसल्याने पुढील प्रवेशासाठी कुठला पर्याय निवडावा याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. दहावी, अकरावीच्या गुणांचा अंतर्भाव असणार असेल तर निकालाचा त्या पध्दतीने अंदाज घेऊन पुढील प्रवेशाबाबत तरी निर्णय घेणं शक्य होईल. मात्र, अद्याप यातील काहीच झाले नसल्याने पदवी प्रवेशाबाबत संभ्रम जाणवतोय.

- वरूण आपटे, विद्यार्थी

शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होणार असल्याने कमीत कमी वेळात अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत पुढील काळात शिक्षकांना करावी लागणार आहे. बारावीचा निकाल उशिरा जाहीर होण्याची चिन्हे असल्याने पदवी प्रवेशाला आणि त्यासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांनाही उशीरच होणार, हेही निश्चित झाले आहे.

- प्रियांका जगताप, विद्यार्थिनी

..............