शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

साताऱ्याला वळवाने पाऊण तास झोडपले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST

सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वळवाचा पाऊस होत असून रविवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहर आणि परिसराला झोडपले. जवळपास ...

सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वळवाचा पाऊस होत असून रविवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहर आणि परिसराला झोडपले. जवळपास पाऊण तास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडत होता. या पावसामुळे शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तसेच पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, खंडाळा तालुक्यातील कवठे येथे वीज पडल्याने दोघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून दोनवेळा वळवाचा पाऊस पडला आहे. गेल्या महिन्यात सलग पाच दिवस पाऊस झाला होता. त्यानंतर मागील आठवड्यातही साताऱ्यासह परिसरात आणि जिल्ह्यात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी साताऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.

सातारा शहर व परिसरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार होते. मात्र, सायंकाळी चारनंतर अंधारून आले आणि बघता बघता गार वारा सुटून पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. क्षणार्धात पाऊस मोठ्याने पडू लागला. यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. जवळपास ४५ मिनिटे जोरदार पाऊस पडत होता. त्याचबरोबर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता. यादरम्यान, शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. बराच वेळ वीज नव्हती. पाऊस कमी झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

मागील काही दिवसांपासून पाऊस होत आहे. रविवारी झालेला पाऊस हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा वळवाचा पाऊस होता. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना दिलासा मिळाला. दरम्यान, सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पाऊस कमी झाला, पण त्यानंतरही ढगांचा गडगडाट सुरूच होता.