शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून रहा दूर-दूर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दरवर्षी उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पडण्याच्या घटनाही घडतात. यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दरवर्षी उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पडण्याच्या घटनाही घडतात. यावर्षी वीज पडून आतापर्यंत तिघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर अनेक जनावरेही वीज पडून ठार झाली आहेत. त्यामुळे वीज कडाडताच मोबाईल बंद करणे, झाडांपासून सतत दूर राहणे व इतर सतर्कताही महत्त्वाची ठरते.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून वळीवाचा पाऊस सुरु होतो. त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊस येतो. या काळात जोरदार वारे वाहतात तसेच वीज पडण्याच्या घटनाही घडतात. वीज पडण्याने दरवर्षी अनेक शेतकरी, नागरिक तसेच मजुरांचा मृत्यू होतो. त्याचबरोबर जनावरेही ठार होतात. शासन नियमानुसार वीज पडून ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येते.

यावर्षी उन्हाळ्याच्या काळात सातारा जिल्ह्यात तिघा शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर जनावरे चारण्यास गेलेली एक महिलाही ठार झाली होती. वीज पडल्याने शेळ्यांचाही मृत्यू झाला होता.

......................................

यावर्षीचे वीज पडून मृत्यू...

२९ एप्रिल रोजी कऱ्हाड तालुक्यातील उंब्रजजवळ शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यात खंडाळा तालुक्यात जेवणाला बसलेल्या दोघा शेतकऱ्यांवर वीज पडली होती. यामध्ये दोघेही ठार झाले होते. तर माण तालुक्यात जनावरे चारण्यास गेलेली महिला ठार झाली होती. माणमधील दुसऱ्या एका घटनेत १० शेळ्या व एक बोकड ठार झाला होता.

...........................................................

अशी मिळेल नुकसानभरपाई

- वीज पडून ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार रुपये.

- ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत.

- वीज पडून जखमी झालेली व्यक्ती एका आठवड्यापेक्षा अधिककाळ रुग्णालयात दाखल असल्यास १२,७०० रुपये मिळतात.

- एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ४,३०० रुपये मदत मिळते.

..........................................................

वीज पडत असताना ही घ्या काळजी...

- शेतात विजा चमकत असताना जवळील घरात त्वरित आसरा घ्यावा.

- शेतातील सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्यावर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवावा.

- दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसावे.

- पायाव्यतिरिक्त शरिराच्या कोणत्याही भागाचा जमिनीला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.

- ओल्या शेतात तसेच तलावात काम करणाऱ्यांनी त्वरित कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.

- झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

- पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण. शक्य असल्यास घरावर वीजवाहक यंत्रणा बसवावी.

- आपले घर, शेताच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.

- वीज, टेलिफोनचा खांब, टॉवरजवळ उभे राहू नये.

- विजेचा प्रकाश आणि आवाज यामध्ये ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ८० टक्के आहे. अशावेळी सुरक्षित जागेचा आसरा घ्यावा.

- शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे.

...........................................................