शहरं
Join us  
Trending Stories
1
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
2
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
3
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
4
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
5
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
6
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
7
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
8
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
9
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
10
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
11
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
12
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
13
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
14
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
15
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
16
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
17
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
18
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
19
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
20
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून रहा दूर-दूर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दरवर्षी उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पडण्याच्या घटनाही घडतात. यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दरवर्षी उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पडण्याच्या घटनाही घडतात. यावर्षी वीज पडून आतापर्यंत तिघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर अनेक जनावरेही वीज पडून ठार झाली आहेत. त्यामुळे वीज कडाडताच मोबाईल बंद करणे, झाडांपासून सतत दूर राहणे व इतर सतर्कताही महत्त्वाची ठरते.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून वळीवाचा पाऊस सुरु होतो. त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊस येतो. या काळात जोरदार वारे वाहतात तसेच वीज पडण्याच्या घटनाही घडतात. वीज पडण्याने दरवर्षी अनेक शेतकरी, नागरिक तसेच मजुरांचा मृत्यू होतो. त्याचबरोबर जनावरेही ठार होतात. शासन नियमानुसार वीज पडून ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येते.

यावर्षी उन्हाळ्याच्या काळात सातारा जिल्ह्यात तिघा शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर जनावरे चारण्यास गेलेली एक महिलाही ठार झाली होती. वीज पडल्याने शेळ्यांचाही मृत्यू झाला होता.

......................................

यावर्षीचे वीज पडून मृत्यू...

२९ एप्रिल रोजी कऱ्हाड तालुक्यातील उंब्रजजवळ शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यात खंडाळा तालुक्यात जेवणाला बसलेल्या दोघा शेतकऱ्यांवर वीज पडली होती. यामध्ये दोघेही ठार झाले होते. तर माण तालुक्यात जनावरे चारण्यास गेलेली महिला ठार झाली होती. माणमधील दुसऱ्या एका घटनेत १० शेळ्या व एक बोकड ठार झाला होता.

...........................................................

अशी मिळेल नुकसानभरपाई

- वीज पडून ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार रुपये.

- ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत.

- वीज पडून जखमी झालेली व्यक्ती एका आठवड्यापेक्षा अधिककाळ रुग्णालयात दाखल असल्यास १२,७०० रुपये मिळतात.

- एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ४,३०० रुपये मदत मिळते.

..........................................................

वीज पडत असताना ही घ्या काळजी...

- शेतात विजा चमकत असताना जवळील घरात त्वरित आसरा घ्यावा.

- शेतातील सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्यावर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवावा.

- दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसावे.

- पायाव्यतिरिक्त शरिराच्या कोणत्याही भागाचा जमिनीला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.

- ओल्या शेतात तसेच तलावात काम करणाऱ्यांनी त्वरित कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.

- झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

- पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण. शक्य असल्यास घरावर वीजवाहक यंत्रणा बसवावी.

- आपले घर, शेताच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.

- वीज, टेलिफोनचा खांब, टॉवरजवळ उभे राहू नये.

- विजेचा प्रकाश आणि आवाज यामध्ये ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ८० टक्के आहे. अशावेळी सुरक्षित जागेचा आसरा घ्यावा.

- शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे.

...........................................................