शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आठवलेंवरील वात्रटिका बंद करा

By admin | Updated: January 28, 2015 00:53 IST

‘रिपाइं’चे निवेदन : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे मागणी

सातारा : रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचा अवमान करणाऱ्या वात्रटिका सोशल मीडियातून प्रसारित केल्या जात आहेत. या वात्रटिका आंबेडकरी जनतेच्या भावाना दुखावणाऱ्या असून त्या तत्काळ बंद कराव्यात. याविषयी प्रशासनानेही योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी ‘रिपाइं’चे सातारा तालुका अध्यक्ष अप्पा तुपे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.याबाबतचे एक निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आही अज्ञात शत्रू जळावू वृत्तीने रामदास आठवले यांच्याविषयी व्हाट्स अ‍ॅप तसेच इतर सोशल मीडियावर विडंबन करणाऱ्या कविता, वात्रटिका प्रसारित करत आहेत. तुपे यांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. त्याच्या माध्यमातून अनेक सकारात्मक गोष्टी घडू शकतात. मात्र आंबेडकरी विचारांची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांना आमचे नेते रामदास आठवले यांच्या विषयी नेहमीच पोटदुखी राहिली आहे. अशीच मंडळी आठवले यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्या नावे व्हाट्स अ‍ॅप तसेच इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विडंबनात्मक रचना सादर करीत आहेत. यामुळे रिपब्लीकन जनतेच्या आणि या पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या जात आहे. अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्तींना सायबर सेलच्या माध्यमातून पायबंद घालावा आणि पोलिसांनीही त्याकडे गांभीर्याने पहावे, अन्यथा रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही अप्पा तुपे यांनी निवेदनात दिला आहे. निवेदन देतेसमयी ‘रिपाइं’चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)