शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मंगळवार तळे स्वच्छतेचे पालिकेकडे पालकत्व!

By admin | Updated: September 4, 2014 00:07 IST

स्वच्छतेसाठी २२ लाख : विसर्जनानंतर मोहिमेला होणार सुरुवात

सातारा : मंगळवार तळ्यात गणेशमूर्ती विसर्जनास घातलेली बंदी खासदार उदयनराजे भोसले यांनी उठविली आहे. हे तळे त्यांच्या खासगी मालकीचे असले तरीही ते सार्वजनिक वापरासाठी देत असल्याने त्याच्या स्वच्छतेचे पालकत्व सातारा पालिकेलाच घ्यावे लागणार असून तळ्याच्या स्वच्छतेसाठी २२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.मूर्ती विसर्जनामुळे तळ्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तळ्यात बुडत नाहीत तसेच मूर्तींना लावलेले विषारी रंग तळ्यातील जलचर प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरतात. गतवर्षी मूर्ती विसर्जनानंतर तळ्यात विषारी वायू तयार झाल्याने तळ्यातील पाणी दूषित झाले होते. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने येथील नागरिकांनी उठाव केला होता. मात्र, तरीही सार्वजनिक गणेश मंडळांची मागणी लक्षात घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी तळ्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी दिली आहे. गणेश उत्सव हा सार्वजनिक उपक्रम असल्याने लोकांच्या हितासाठी पालिकेला या तळ्याची स्वच्छता करणे भाग आहे. गणेशोत्सवानंतर पालिका तळ्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया पालिकेने पूर्वीच राबविली होती. २२ लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च केला जाणार आहे. गेल्या वर्षी पालिकेने एवढेच पैसे मोती तळ्याच्या स्वच्छतेसाठी खर्च केले होते. दरम्यान, पुढील वर्षीपासून या दोन्ही तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याने सार्वजनिक मंडळांपुढे यक्षप्रश्न निर्माण होणार आहे. मूर्ती कमी उंचीच्या तसेच शाडू व मातीपासून बनविलेल्या मूर्ती बसविण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’च्या भूमिकेचे स्वागतपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘लोकमत’ ने पुढाकार घेतला होता. त्याप्रमाणे शहरातील बहुतांश नगरसेवकांनी वॉर्डातील हौदांच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. पालिकेच्या माध्यमातून या हौदांची स्वच्छता सुरु आहे. पंताचा गोट, मंगळवार तळे, शनिवार पेठेतील काही हौदांची स्वच्छता करण्यात आली आहे. वॉर्डातील घरगुती गणेशमूर्तींचे या हौदातच विसर्जन केले जाणार आहे. ४४ लाखांचा निधी तळे स्वच्छतेसाठीपालिकेने गतवर्षी मोती तळ्याची स्वच्छता करण्यासाठी २२ लाख रुपये खर्च केले होते. आता मंगळवार तळ्याच्या स्वच्छतेसाठी २२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तळ्यांच्या स्वच्छतेसाठी एवढा मोठा निधी खर्च केला जात असल्याने त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत असल्याने अनेक ठिकाणी चांगले रस्तेही नाहीत. आरोग्य व सार्वजनिक स्वच्छतागृहांना पाणीपुरवठ्याचाही प्रश्न आ वासून आहे.