शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

झाडाचा बुंधा ठरला रक्षणकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

सातारा : पाऊस वाढला तसं आम्हाला धडकी भरली, शेतातनं पोरं अजून कशी आली नाहीत, हे बघायला मी बाहेर गेलो ...

सातारा : पाऊस वाढला तसं आम्हाला धडकी भरली, शेतातनं पोरं अजून कशी आली नाहीत, हे बघायला मी बाहेर गेलो आणि ओढ्याच्या शेजारून माती गाळ, लाकूड यांचा भलामोठा लोंढा माझ्याकडे आला. धावण्याची परिस्थिती नव्हती. काही विचार करायच्या आतच मी त्या लोंढ्यात ओढला गेलो अन् नाकातोंडासह डोळ्यांतही माती गेल्याने पुढचं काहीच दिसत नव्हतं. हाताला जे लागेल ते धरायचं आणि त्याच्या आधारावर आजूबाजूला काही आसरा मिळातोय का हे शोधत होतो. पाण्याच्या या लाटेनं तीन किलोमीटरपर्यंत नेलं. एका ठिकाणी झाडाचा बुंधा सापडला, त्यालाच घट्ट धरलं तोच माझा रक्षणकर्ता ठरला. चार तासांच्या झुंजीनंतर रात्री बारा वाजता मला तहसीलदारांनी दवाखान्यात दाखल केलं... कोसळणाऱ्या पावसाचं रुद्ररूप अनुभवलेले ६७ वर्षीय राजाराम जाधव सांगत होते.

मृत्यूशी झालेल्या सामन्याविषयी. वाई तालुक्यातील दुर्गम जोर भागातही पावसाने मोठे नुकसान केले आहे. पावसाच्या प्रकोपानंतर वाई तालुक्यातील काही ही गावं अद्याप संपर्कहीन आहेत. २२ तारेखला झालेल्या धुवाधार पावसातून राजाराम जाधव संघर्ष करून वाचले आहेत. सध्या त्यांच्यावर वाईतील मिशन हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे वाहून आलेल्या लोंढ्यात वाहून गेलेले जाधव कसेबसे बचावले असले तरी तीन बरकड्या, हात मोडल्याने ते जायबंद आहेत.

आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या या पावसाचं वर्णन अजब पाऊस म्हणून त्यांनी केलं. जाधव म्हणाले, या कोविडमुळं पोरांची नोकरी गेली. मुंबईत हाताला काम नाही, तर शेतात राबून जरा घरचं पिकवू असा विचार करून पुतण्यानं महिनाभरापासून शेतात काम करणं सुरू केलं. सकाळपासूनच पाऊस लागून राहिल्यानं संध्याकाळी चारच्या सुमारास दोघं भाऊ भात शेतात किती पाणी शिरलंय ते बघायला गेले. घरात ८९ वर्षांची आई आहे. तिनं ‘हा पाऊस वंगाळ वाटतूय’ असं वाक्य उच्चारलं आणि माझ्याही मनात कालवाकालव सुरू झाली. पाच-सात मिनिटं गेली आणि मीच कोसळत्या पावसात वाहत्या पाण्याचा अंदाज घेत पोरांना शोधायला गेलो. पोरांना हाळी दिली, पण पावसाचे आणि ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज इतका मोठा होता की त्यांच्यापर्यंत माझा आवाज गेलाच नाही. जरा पुढं जाऊ म्हणून पाय उचलला तर ओढ्याच्या पाण्यानं मला अक्षरश: ओढूनच नेलं.

डोंगरमथ्यावरून येणारी माती, दगडं, झाडं, घाण, सगळं म्हणजे सगळं या काल्यात दिसत होतं. पाण्याचा हा लोंढा इतका मोठा होता की त्यात वाचणं मुश्कील होतं. कृतीचा विचार करायच्या आत मी चिखलाच्या राड्यात होतो आणि काही कळायच्या आतच माझ्या नाकातोंडात माती गेली. लुकलुक करून डोळ्यांनी काही बघावं म्हटलं तर त्यातही माती गेली. हातांनी डोळे चोळावेत तर त्यालाही माती लागलेली. तब्बल चार तास मातीच्या या राड्यात माझी आंधळी कोशिंबीर सुरू होती. हाताला कुठलीही वस्तू लागली तर ती आपल्याला वाचवू शकेल का, हा एकच विचार डोक्यात होता. डोळ्यात माती गेल्याने पुढचं काही दिसत नव्हतं, पण हार मानायची नाही असं ठरवलं आणि हातपाय हलवत राहिलो. पाण्याचा लोंढा नेत होता आणि शरिरावर निव्वळ जखमा होत होत्या. तब्बल चार तास परिस्तीशी झगडा दिल्यानंतर मला झाडाचा बुंधा सापडला ज्याच्या आधाराने मी बाहेर पडू शकलो. बाहेर येऊन चालायचा प्रयत्न केला, पण कमरेखालचा भाग उचलेना हे लक्षात आलं. मग नेनत्या मुलासारखं रांगत, घसटत पुढं आलो आणि सरकारी यंत्रणेला मी दिसलो. त्यांनीच मला रात्री बारा वाजता उपचारांसाठी दाखल केलं.