शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

शेतमाल वाहतूक झाला आंतबट्ट्याचा व्यवसाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : इंधन दरात वाढ झाल्याने महागाईचे चटके बसू लागलेत. मात्र, शेतमाल वाहतूक करणारे वाहनधारक अजूनही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : इंधन दरात वाढ झाल्याने महागाईचे चटके बसू लागलेत. मात्र, शेतमाल वाहतूक करणारे वाहनधारक अजूनही भाडेवाढीच्या विचारात नाहीत. बाजारात मंदी, शेतमालाला दर कमी, यामुळे शेतकऱ्यांचेच भागेना मग भाडेवाढ करून धंदाच बंद करायचा का, असा सवालही त्यांच्याकडून होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना इच्छा असूनही भाडे वाढविता येईना.

मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढू लागले आहेत. या इंधन दरवाढीचा सर्वच घटकांवर हळूहळू का होईना परिणाम होऊ लागला आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. काही ठिकाणी अल्प भाडेवाढही झालेली आहेे पण शेतमाल, तरकारीची वाहतूक करणाऱ्यांनी अजूनही भाडेवाढ केलेली नाही.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून शेतमाल येतो. यामध्ये माण, खटाव, फलटण, खंडाळा, जावळी, कोरेगाव अशा तालुक्यांतून तरकारी येते. ठरावीक वाहनधारकच शेतमाल घेऊन येतात. बहुतांशी शेतकरी एकाच वाहनधारकांच्या माध्यमातून आपला माल बाजार समितीत पोहोच करतात. यासाठी प्रत्येक डागामागे काही पैसे आकारले जातात. सातारा तालुक्यातून शेतमाल घेऊन बाजार समितीत यायचे असेल तर एका डागाला ३० ते ४० रुपये घेतले जातात. जेवढे वाहनांत डाग भरू तेवढे पैसे शेतकऱ्यांकडून आकारले जातात. तर खंडाळा, फलटण किंवा खटाव, माण तालुक्यातून शेतमाल सातारा बाजार समितीत आणायचा झाला तर अंतरानुसार ६० ते ८० रुपये एका डागाला घेतले जातात.

सातारा बाजार समितीत तर सायंकाळपासून वाहनधारक शेतमाल घेऊन येतात. पहाटेपर्यंत बहुतांशी वाहनधारक आलेले असतात. वाहनधारकांबरोबर काहीवेळा शेतकरीही येतात. सकाळी ११ पर्यंत दर निघाला की शेतकरी व वाहनधारक गावाकडे परतात; पण एवढे करूनही वाहनधारकांना सध्या कसाबसा धंदा करावा लागतोय. कारण, डिझेलचा दर ९० रुपयांच्या जवळ पोहोचलाय. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही; पण बाजारात मंदी आहे. शेतमालाला म्हणावा असा उठावच नाही. शेतकऱ्यांचाच खर्च निघेना. त्या ठिकाणी भाडेवाढ करून काय साध्य होणार, हा विषय आहे. त्यामुळे सध्यातरी भाडे वाढ न करण्याच्या विचारात वाहनधारक आहेत.

चौकट :

७० रुपयांवर डिझेल होते,

तेव्हाचे भाडे आताही...

बाजारात मंदी आहे; पण अजूनही शेतमालाची वाहतूक करणारे वाहनधारक भाडेवाढीच्या विचारात नाहीत. ७० रुपये लिटर डिझेल होते. त्यावेळी शेतमाल वाहतुकीसाठी भाडे आकारले जायचे तेच भाडे डिझेल ९० च्या घरात गेल्यावरही आकारले जात आहे.

कोट :

डिझेलचा दर वाढला आहे. यामुळे भाडेवाढ होणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही कांदा वगळता इतर शेतमालाला दर कमी असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. बाजारात मंदी असल्याने अशा काळात भाडेवाढ करणे योग्य ठरणार नाही. ज्यांनी बँकांकडून वाहन घेतले आहे, हप्ता जाऊन त्यांच्या हातात काहीही राहत नाही.

- सतीश साबळे, वाहनधारक, शिवथर

फोटो दि. २३सातारा बाजारा समिती फोटो...

फोटो ओळ : सातारा बाजार समितीत जिल्ह्यातून शेतमाल मोठ्या प्रमाणात येतो. सकाळी १० पर्यंत वाहनांतून माल खाली उतरवला जातो. (छाया : नितीन काळेल)

..................................................................