शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

चढणीच्या माशांवर संक्रांत : प्रजनन खुंटण्याने मासेमारीवर होतोय परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांत गढूळ पाणी असून माशांचा प्रजननाचा काळ सुरू झालाय. हे मासे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांत गढूळ पाणी असून माशांचा प्रजननाचा काळ सुरू झालाय. हे मासे नदीच्या उलट्या प्रवाहाला लागल्याने ‘चढाचे मासे’ पकडण्यासाठी ग्रामीण भागात खवय्यांचा ठिय्या नदीकाठांवर गळ टाकून आहे. माशांच्या अंडी घालण्याचा हा काळ असल्याने चढाचे मासे न पकडता दोन महिने मासेमारी बंद ठेवली तरच माशांची पैदास वाढून आपणाला वर्षभर मासे पुरणार आहेत. मत्स्यव्यवसाय विभागानेही या दिवसांत मासेमारी न करण्याचे आवाहन केले आहे.

पावसाला नुकतीच सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील नद्यांमध्ये गढूळ पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीतील असंख्य मासे प्रजननासाठी उगमाच्या दिशेने उलटा प्रवास सुरु करतात. हा प्रवास सांगताना मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे म्हणाले, ‘डोंगर, झरे, ओहळ, भाताची खाचरे आणि तात्पुरत्या पाणथळ जागेत ते प्रजननासाठी येतात. शांत पाणी पाहून तेथे ते अंडी घालतात व पुन्हा मागे परततात. या अंड्यातून माशांची पिल्ले जन्म घेतात. वर्षातून एकदाच गोड्या पाण्यातील माशांना निसर्ग अंडी घालण्यासाठी संधी देतो आणि पिल्ले संगोपनासाठी वातावरण निर्माण करून देतो.’

नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध, चढाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या माशांना चढाचे किंवा चढणीचे मासे म्हणतात. गोड्या पाण्यातील माशांना प्रजननाची संधी द्यायला हवी. तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक सागर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

उथळ पाण्यात अंडी घालण्यासाठी आलेले मासे ही संधी समजून गाव गावातील असंख्य लोक ‘चढणीचे मासे’ पकडतात. माशांच्या प्रजननाचा हा काळ असल्याने हे दोन महिने मासेमारी करु नये, असे आग्रही मत मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, मत्स्याच्या प्रजननावर आपले वर्षभराचे मत्स्यान्न अवलंबून असते. पोटात अंडी असलेले मासे आपण आधीच मारुन टाकले तर आपल्याला चांगले तयार झालेले मासे मिळणार नाहीत.’

चौकट १...

खडशी, वांब, मरळ, मळे हे मासे प्रजननक्षम झालेले असतात. या काळात ते चविष्ट असले तरी मत्स्यप्रेमींना स्वत:च्या चिभेला थोड्या काळासाठी मुरड घालावी लागेल. अन्यथा त्यांच्या प्रजननात अडथळा आणल्यामुळे गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे जलचरांची जिवसाखळी धोक्यात येऊ शकते.

चौकट २

छोटा धबधबा, बंधाऱ्याच्या ठिकाणी हे मासे पाण्याच्या धारेला धरून उंच उडतानाचे दृश्य फारच मनोहारी असते. विशेषत: रात्रीच्या वेळी असे शेकडो मासे प्रवाहाच्या विरुद्ध उडी मारताना पाहण्यात वेगळीच मौज आहे. ती अनुभवण्यासाठी मत्स्यप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक रात्रीचा दिवस करत आहेत.

कोट

‘मासेमारी टिकवायची असेल तर पावसाळ्याचे दोन महिने नदीत मासेमारी करु नये. अशी मासेमारी थांबवण्यासाठी शासनस्तरावर विचारविनिमय सुरु आहे. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीतून या दिवसांत मासेमारीसाठी जाऊ नये.’

- अभयसिंह शिंदे इनामदार,

सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय सातारा.

...............