शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

चढणीच्या माशांवर संक्रांत : प्रजनन खुंटण्याने मासेमारीवर होतोय परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांत गढूळ पाणी असून माशांचा प्रजननाचा काळ सुरू झालाय. हे मासे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांत गढूळ पाणी असून माशांचा प्रजननाचा काळ सुरू झालाय. हे मासे नदीच्या उलट्या प्रवाहाला लागल्याने ‘चढाचे मासे’ पकडण्यासाठी ग्रामीण भागात खवय्यांचा ठिय्या नदीकाठांवर गळ टाकून आहे. माशांच्या अंडी घालण्याचा हा काळ असल्याने चढाचे मासे न पकडता दोन महिने मासेमारी बंद ठेवली तरच माशांची पैदास वाढून आपणाला वर्षभर मासे पुरणार आहेत. मत्स्यव्यवसाय विभागानेही या दिवसांत मासेमारी न करण्याचे आवाहन केले आहे.

पावसाला नुकतीच सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील नद्यांमध्ये गढूळ पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीतील असंख्य मासे प्रजननासाठी उगमाच्या दिशेने उलटा प्रवास सुरु करतात. हा प्रवास सांगताना मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे म्हणाले, ‘डोंगर, झरे, ओहळ, भाताची खाचरे आणि तात्पुरत्या पाणथळ जागेत ते प्रजननासाठी येतात. शांत पाणी पाहून तेथे ते अंडी घालतात व पुन्हा मागे परततात. या अंड्यातून माशांची पिल्ले जन्म घेतात. वर्षातून एकदाच गोड्या पाण्यातील माशांना निसर्ग अंडी घालण्यासाठी संधी देतो आणि पिल्ले संगोपनासाठी वातावरण निर्माण करून देतो.’

नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध, चढाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या माशांना चढाचे किंवा चढणीचे मासे म्हणतात. गोड्या पाण्यातील माशांना प्रजननाची संधी द्यायला हवी. तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक सागर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

उथळ पाण्यात अंडी घालण्यासाठी आलेले मासे ही संधी समजून गाव गावातील असंख्य लोक ‘चढणीचे मासे’ पकडतात. माशांच्या प्रजननाचा हा काळ असल्याने हे दोन महिने मासेमारी करु नये, असे आग्रही मत मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, मत्स्याच्या प्रजननावर आपले वर्षभराचे मत्स्यान्न अवलंबून असते. पोटात अंडी असलेले मासे आपण आधीच मारुन टाकले तर आपल्याला चांगले तयार झालेले मासे मिळणार नाहीत.’

चौकट १...

खडशी, वांब, मरळ, मळे हे मासे प्रजननक्षम झालेले असतात. या काळात ते चविष्ट असले तरी मत्स्यप्रेमींना स्वत:च्या चिभेला थोड्या काळासाठी मुरड घालावी लागेल. अन्यथा त्यांच्या प्रजननात अडथळा आणल्यामुळे गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे जलचरांची जिवसाखळी धोक्यात येऊ शकते.

चौकट २

छोटा धबधबा, बंधाऱ्याच्या ठिकाणी हे मासे पाण्याच्या धारेला धरून उंच उडतानाचे दृश्य फारच मनोहारी असते. विशेषत: रात्रीच्या वेळी असे शेकडो मासे प्रवाहाच्या विरुद्ध उडी मारताना पाहण्यात वेगळीच मौज आहे. ती अनुभवण्यासाठी मत्स्यप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक रात्रीचा दिवस करत आहेत.

कोट

‘मासेमारी टिकवायची असेल तर पावसाळ्याचे दोन महिने नदीत मासेमारी करु नये. अशी मासेमारी थांबवण्यासाठी शासनस्तरावर विचारविनिमय सुरु आहे. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीतून या दिवसांत मासेमारीसाठी जाऊ नये.’

- अभयसिंह शिंदे इनामदार,

सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय सातारा.

...............