शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

चढणीच्या माशांवर संक्रांत : प्रजनन खुंटण्याने मासेमारीवर होतोय परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांत गढूळ पाणी असून माशांचा प्रजननाचा काळ सुरू झालाय. हे मासे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांत गढूळ पाणी असून माशांचा प्रजननाचा काळ सुरू झालाय. हे मासे नदीच्या उलट्या प्रवाहाला लागल्याने ‘चढाचे मासे’ पकडण्यासाठी ग्रामीण भागात खवय्यांचा ठिय्या नदीकाठांवर गळ टाकून आहे. माशांच्या अंडी घालण्याचा हा काळ असल्याने चढाचे मासे न पकडता दोन महिने मासेमारी बंद ठेवली तरच माशांची पैदास वाढून आपणाला वर्षभर मासे पुरणार आहेत. मत्स्यव्यवसाय विभागानेही या दिवसांत मासेमारी न करण्याचे आवाहन केले आहे.

पावसाला नुकतीच सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील नद्यांमध्ये गढूळ पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीतील असंख्य मासे प्रजननासाठी उगमाच्या दिशेने उलटा प्रवास सुरु करतात. हा प्रवास सांगताना मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे म्हणाले, ‘डोंगर, झरे, ओहळ, भाताची खाचरे आणि तात्पुरत्या पाणथळ जागेत ते प्रजननासाठी येतात. शांत पाणी पाहून तेथे ते अंडी घालतात व पुन्हा मागे परततात. या अंड्यातून माशांची पिल्ले जन्म घेतात. वर्षातून एकदाच गोड्या पाण्यातील माशांना निसर्ग अंडी घालण्यासाठी संधी देतो आणि पिल्ले संगोपनासाठी वातावरण निर्माण करून देतो.’

नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध, चढाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या माशांना चढाचे किंवा चढणीचे मासे म्हणतात. गोड्या पाण्यातील माशांना प्रजननाची संधी द्यायला हवी. तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक सागर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

उथळ पाण्यात अंडी घालण्यासाठी आलेले मासे ही संधी समजून गाव गावातील असंख्य लोक ‘चढणीचे मासे’ पकडतात. माशांच्या प्रजननाचा हा काळ असल्याने हे दोन महिने मासेमारी करु नये, असे आग्रही मत मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, मत्स्याच्या प्रजननावर आपले वर्षभराचे मत्स्यान्न अवलंबून असते. पोटात अंडी असलेले मासे आपण आधीच मारुन टाकले तर आपल्याला चांगले तयार झालेले मासे मिळणार नाहीत.’

चौकट १...

खडशी, वांब, मरळ, मळे हे मासे प्रजननक्षम झालेले असतात. या काळात ते चविष्ट असले तरी मत्स्यप्रेमींना स्वत:च्या चिभेला थोड्या काळासाठी मुरड घालावी लागेल. अन्यथा त्यांच्या प्रजननात अडथळा आणल्यामुळे गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे जलचरांची जिवसाखळी धोक्यात येऊ शकते.

चौकट २

छोटा धबधबा, बंधाऱ्याच्या ठिकाणी हे मासे पाण्याच्या धारेला धरून उंच उडतानाचे दृश्य फारच मनोहारी असते. विशेषत: रात्रीच्या वेळी असे शेकडो मासे प्रवाहाच्या विरुद्ध उडी मारताना पाहण्यात वेगळीच मौज आहे. ती अनुभवण्यासाठी मत्स्यप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक रात्रीचा दिवस करत आहेत.

कोट

‘मासेमारी टिकवायची असेल तर पावसाळ्याचे दोन महिने नदीत मासेमारी करु नये. अशी मासेमारी थांबवण्यासाठी शासनस्तरावर विचारविनिमय सुरु आहे. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीतून या दिवसांत मासेमारीसाठी जाऊ नये.’

- अभयसिंह शिंदे इनामदार,

सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय सातारा.

...............