शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पुनर्वसनाच्या भुताला एकदाचा उतारा!

By admin | Updated: January 3, 2015 00:15 IST

शिक्के उठणार : शासनाच्या निर्णयाचा सातारा जिल्ह्यातील ४४७ गावांना होणार लाभ

सातारा : जिल्ह्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. धरण प्रकल्पात बाधित झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के उठविण्यात येणार असून, जिल्ह्यातील सुमारे ४४७ गावांच्या मानगुटीवर बसलेले पुनर्वसनाच्या शिक्क्यांचे भूत एकदाच हद्दपार होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात एकूण १८ प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या बाधित गावांचे बुडित क्षेत्र व लाभ क्षेत्र असे दोन वर्गीकरण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आला, तेथील गावे पाणी योजनेचा लाभ मिळणाऱ्या लाभक्षेत्रात वसविण्यात आली. प्रत्येक प्रकल्पासाठी जमीन संपादनाचा वेगवेगळा स्लॅब आहे. ४, ६ व ८ एकर असे स्लॅबचेही वर्गीकरण करण्यात आले आहे. इतक्या जमीन क्षेत्राच्या वर एका खातेदाराच्या नावावर जमीन असेल तर ती जमीन प्रकल्पग्रस्तांसाठी संपादित करण्यात आली आहे. मात्र, शासनाने बुडित व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करत असताना त्या जमिनींच्या सात-बाऱ्यावर ‘पुनर्वसन’ असे शिक्के मारले आहेत. या शिक्क्यांमुळे जमिनींची विक्री करताना, गहाण खत करताना, जमिनीचे वारसांमध्ये वाटप करताना अडचणी येत आहेत. यासाठी शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होतो. या शेतकऱ्यांची होणारी होरपळ थांबावी, या उद्देशाने शासनाने नियमानुसार स्लॅबच्या आत असणाऱ्या जमिनींच्या सात-बाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात स्लॅब वगळता बाधित शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के काढले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात कॅनॉलच्या वरच्या क्षेत्रातील (ज्या ठिकाणी पाण्याचा लाभ होत नाही) शेतकऱ्यांच्या जमिनीवरी पुनर्वसनाचे शिक्के उठविण्यात येतील. तिसऱ्या टप्प्यात ज्यांच्या जमिनी संपादित करून झाल्या आहेत. मात्र, तरीही संबंधित शेतकऱ्यांच्या इतर क्षेत्रावर पुनर्वसनाचे शिक्के आहेत, ते काढून टाकले जाणार आहेत. (प्रतिनिधी)पुनर्वसनाचे शिक्के असणाऱ्या गावांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. संबंधित गावांतील तलाठ्यांच्या माध्यमातून ही माहिती काही दिवसांत संकलित होईल. पहिल्या टप्प्यात ७० टक्के बाधित क्षेत्रावरील पुनर्वसनाचे शिक्के जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली काढण्यात येतील. - सतीश धुमाळ, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन