शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आत्मविश्वास हरविलेल्या चालकांना पुन्हा प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:14 IST

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराला अपघातांनी घेरले आहे. अपघातांच्या मालिकेमुळे चालक-वाहकांचा आत्मविश्वास कमी होत चालल्याचे जाणवत आहे.

ठळक मुद्दे फलटणला अपघातांची मालिका : मानसिक स्थैर्यासाठी हवेत ध्यान अन् योगा प्रशिक्षणअपघातांच्या मालिकेचा चालकांच्या मानसिकतेवर किती परिणाम झालेला आहेझोपेत त्यांच्याकडे गाडी दिली तरी ते सफाईदारपणे चालवू शकतात.

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराला अपघातांनी घेरले आहे. अपघातांच्या मालिकेमुळे चालक-वाहकांचा आत्मविश्वास कमी होत चालल्याचे जाणवत आहे. यावर उपाय म्हणून दोन दिवसांचे चालन प्रशिक्षण दिले जात आहे. हा उपाय तोकडा असून, चालक-वाहकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी योगाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

फलटण आगारातील चालक रामदास सूर्यभान मेश्राम यांना सोमवार, दि. २१ आॅगस्ट रोजी गाडी चालवित असताना फीट आली. त्यामुळे झालेल्या अपघातात चाळीस प्रवासी जखमी झाले. त्यानंतर दुसºयाच दिवशी चौधरवाडीजवळ एसटी खड्ड्यात घुसली.प्रवाशांना सिडीवरून बाहेर काढावे लागले. या अपघातात २४ प्रवासी जखमी झाले. पिसुरडीजवळ बुधवार, दि. २४ रोजी अपघातांची हॅटट्रिक साधली. कारच्या धडकेने तोल सुटल्याने एसटी खड्ड्यात गेली. त्यामध्ये पाचजण किरकोळ जखमी झाले होते. त्यानंतर पिंपरदजवळ एसटी-कार यांच्यात शुक्रवार, दि. १ रोजी अपघात झाला.

अपघातांच्या मालिकेचा चालकांच्या मानसिकतेवर किती परिणाम झालेला आहे, याची प्रचिती फलटण आगारात शुक्रवार, दि. २५ रोजी आली. फलटण-लोणंद एसटीच्या चालकाने वाहकाला स्थानकात सोडूनच गाडी मार्गस्थ केली. शेवटी वाहकाने मोटारसायकलवरून पाठलाग करून बस थांबविली.या घटनेनंतर विभागाने जिल्ह्यातील चालकांसाठी दोन दिवसांचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आयोजित केले. वास्तविक एसटीचे चालक वाहन चालविण्यात पारंगत आहेत. बहुतांश वेळा ते स्टिअरिंगवर बसलेले असतात. त्यामुळे झोपेत त्यांच्याकडे गाडी दिली तरी ते सफाईदारपणे चालवू शकतात. तरीही हे प्रशिक्षण का आयोजित केले? हा प्रश्न पडतो.

एसटी ही संस्था कामगार व प्रवाशांच्या जीवावर चालते. दोघेही माणसं असल्याने त्यांचं मानसिक स्वास्थ जपणे संस्थेचेच काम आहे. हीच गरज ओळखून प्रतापसिंह सावंत यांनी सातारा विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक असताना अनेक प्रयोग केले होते. चालकांसाठी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच सर्व आगार व कार्यशाळेत ध्यान, योगाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. दररोज सकाळी एक तास व सायंकाळी एक तास जादा वेळ देऊन कर्मचारी लाभ घेत होते.चालकांचं आरोग्याकडं दुर्लक्षएसटीतील चालक-वाहक हे रस्त्यावरचे कर्मचारी आहेत. त्यांचे आरोग्य, आहार, विश्रांतीकडे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. चांगले विश्रांतीगृह नाहीत. त्यामुळे त्यांना आरोग्याचे, ध्यान-साधनेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. मानसिकदृष्ट्या बलवान ठरल्याने आत्मविश्वासाने ते एसटीची सेवा बजावतील. साहजिकच यात एसटीचाच विकास होणार आहे. त्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी चालक-वाहकांसाठी चाकोरीबाहेर जाऊन योगा, ध्यान साधनेचे आयोजन करणे गरजेचे आहे.फलटण आगारातील घटनांनंतर सातारा विभागीय कार्यालयात जिल्ह्यातील चालकांसाठी दोन दिवसीय चालन प्रशिक्षण आयोजित केले आहे. आवश्यकता भासल्यास त्यामध्ये बदल केले जातील.- अमृता ताम्हणकरविभाग नियंत्रक, सातारा