शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

महाराष्ट्र घडविणाऱ्यांच्या संस्थेत शोकांतिका

By admin | Updated: May 8, 2016 00:33 IST

उदयनराजे भोसले : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित कृती समितीच्या उपोषणास पाठिंबा

सातारा : ‘कर्मवीर अण्णांनी बहुजन, उपेक्षित असलेले लोक मोठे व्हावे, या ध्यास विचारांच्या आधारावर रयतेची घटना निर्माण केली. त्यात बदल का केला गेला, हे मला समजत नाही. रयतेची घटना निर्माण झाली त्यावेळी यात राजकारण आणू नये, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून आज येथे कोणी राजकारण आणू नये. सर्व शिक्षक आपल्या संस्थेचे आहेत. भले मला संस्थेत स्थान देऊ नका; पण शिक्षकांना त्यांचे स्थान द्यावे,’ असे आवाहन प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. रयतच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित आदी शिक्षकांना सेवेत सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घ्यावे, या मागणीसाठी रयत विनाअनुदानित कृती समितीने संस्थेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शनिवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी खा. उदयनराजे भोसले उपोषणस्थळी आले होते. यावेळी ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, ‘महाराष्ट्राची जडण-घडण करणाऱ्या व्यक्ती या संस्थेत असताना शिक्षकांचा प्रश्न सुटत नाही, ही एक शोकांतिका आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचीच या शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी आहे. कर्मवीरांच्या विचारांना चालना द्यायची असेल तर यांना संस्थेत सामील करून घ्यावे लागेल. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. छ. शिवाजी महाराजांनी ज्या विचारांनी वाटचाल केली, त्याच विचारांनी आम्ही वाटचाल करीत आहोत. राजमाता सुमित्राराजे भोसले यांना कर्मवीरांचे विचार पटले आणि त्यांनी ही संस्था धननीच्या बागेतून सुरू केली. कोणतेही भेदभाव न करता आजपर्यंत या संस्थेचे कामकाज सुरू आहे, अण्णांनी ‘कमवा व शिकवा’ ही योजना जगात प्रथम आणली आणि याच योजनेचा लाभ घेत राजकारण, समाजकारण विविध क्षेत्रांत अनेकजण मोठे झाले आहेत,’ असा टोलाही उदयनराजे यांनी यावेळी लगावला. दरम्यान, शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांविषयी उदयनराजे भोसले यांच्याशी सविस्तर चर्चा केली. (प्रतिनिधी)