शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

वाहतूक व्यवस्थेचे ठीक; पण शेतकऱ्यांचे काय..?

By admin | Updated: April 18, 2017 23:10 IST

खंबाटकी बोगदा : अल्पभूधारक, भूमिहीनची भीती असल्यानेच गावांचा विरोध

दशरथ ननावरे ल्ल खंडाळापुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात नवीन बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. वास्तविक, या नव्या बोगद्यामुळे वाहतूक व्यवस्था आणखी सुरळीत करण्याचा प्रयत्न असला तरी यामध्ये तीन गावांतील स्थानिक शेतकऱ्यांना भूमिहीन किंवा अल्पभूधारक होण्याची भीती असल्याने त्यांनी या बोगद्याला कडाडून विरोध दर्शविला आहे.पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी नवीन बोगद्याची आखणी करण्यात आली आहे. त्याच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आले. या बोगद्याच्या कामाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश दिल्याने हा बोगदा नक्की कोणत्या ठिकाणावरून होणार याबाबत संभ्रमता आहे. वास्तविक यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. सध्याच्या बोगद्याच्या पश्चिम बाजूने बोगदा होण्याची शक्यता आहे. बोगद्यापासून निघणारा रस्ता खंडाळा येथील जुन्या टोल नाक्याजवळ व सध्याच्या महामार्गाला जोडला जाणार असल्याचे समोर येत आहे. या बोगद्यासाठी वाण्याचीवाडी, खंडाळा, वेळे या तीन गावांची सर्वाधिक जमीन संपादित केली जाणार असल्याने येथील शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यासाठी जमिनी गेल्या आहेत. पहिल्या बोगद्याचासुद्धा फटका या गावांना बसला होता. आता या नव्या बोगद्यातही शेतकरी भरडला जाणार असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या कमीत कमी जमिनी जातील याची काळजी घेणे गरजेचे आहे. एस कॉर्नरवर उपाय होणार का ?पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडे जाताना खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर ‘एस’ कॉर्नर आहे. या ठिकाणी सतत अपघात होत असतात. येथील नव्या बोगद्याच्या प्रस्तावित कामामध्ये ‘एस’ कॉर्नरच्या अशास्त्रीय वळणावर उपाययोजना होणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.