शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

वाहतूक व्यवस्थेचे ठीक; पण शेतकऱ्यांचे काय..?

By admin | Updated: April 18, 2017 23:10 IST

खंबाटकी बोगदा : अल्पभूधारक, भूमिहीनची भीती असल्यानेच गावांचा विरोध

दशरथ ननावरे ल्ल खंडाळापुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात नवीन बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. वास्तविक, या नव्या बोगद्यामुळे वाहतूक व्यवस्था आणखी सुरळीत करण्याचा प्रयत्न असला तरी यामध्ये तीन गावांतील स्थानिक शेतकऱ्यांना भूमिहीन किंवा अल्पभूधारक होण्याची भीती असल्याने त्यांनी या बोगद्याला कडाडून विरोध दर्शविला आहे.पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी नवीन बोगद्याची आखणी करण्यात आली आहे. त्याच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आले. या बोगद्याच्या कामाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश दिल्याने हा बोगदा नक्की कोणत्या ठिकाणावरून होणार याबाबत संभ्रमता आहे. वास्तविक यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. सध्याच्या बोगद्याच्या पश्चिम बाजूने बोगदा होण्याची शक्यता आहे. बोगद्यापासून निघणारा रस्ता खंडाळा येथील जुन्या टोल नाक्याजवळ व सध्याच्या महामार्गाला जोडला जाणार असल्याचे समोर येत आहे. या बोगद्यासाठी वाण्याचीवाडी, खंडाळा, वेळे या तीन गावांची सर्वाधिक जमीन संपादित केली जाणार असल्याने येथील शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यासाठी जमिनी गेल्या आहेत. पहिल्या बोगद्याचासुद्धा फटका या गावांना बसला होता. आता या नव्या बोगद्यातही शेतकरी भरडला जाणार असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या कमीत कमी जमिनी जातील याची काळजी घेणे गरजेचे आहे. एस कॉर्नरवर उपाय होणार का ?पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडे जाताना खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर ‘एस’ कॉर्नर आहे. या ठिकाणी सतत अपघात होत असतात. येथील नव्या बोगद्याच्या प्रस्तावित कामामध्ये ‘एस’ कॉर्नरच्या अशास्त्रीय वळणावर उपाययोजना होणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.