शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात वाहतूक कोंडी फुटणार!

By admin | Updated: February 6, 2015 00:39 IST

पर्यटकांना दिलासा : राजकीय एकवाक्यतेमुळे नवीन वाहनतळाचा प्रस्ताव पालिकेत मंजूर

सातारा : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नवीन वाहनतळाचा प्रस्ताव नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. विरोधकांच्या आक्षेपास नगरसेवक कुमार शिंदे यांनी खुलासेवार उत्तरे दिल्यानंतर ठराव मंजूर करण्यात आला.महाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक येतात. सलग सुट्या व हंगामातील गर्दीत वाहने लावण्यास पर्यटकांना अडचणी येतात. हा प्रश्न स्थानिकांसाठीही जिव्हाळ््याचा बनला होता. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून अनुदान आले असतानाही राजकीय एकवाक्यता नसल्यामुळे ठरावाबाबत गांभीर्याने विचार होत नव्हता. पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर वाहनतळाबाबत गांभीर्याने विचार करून सत्ताधारी गटातर्फे नगराध्यक्षा तोष्णीवाल यांनी यासंदर्भातील सर्व कागदपत्रे आणि अनुदानाची सांगड घालून हा गहन प्रश्न हातावेगळा करण्याचे ठरविले. सत्ताधारी नगरसेवकांच्या सहकार्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेत विषय चर्चेस घेण्यात आला.रे गार्डन येथील सिटीसर्व्हे नंबर ५४८ येथे सुमारे चारशे वाहने उभी राहू शकतील असा भूखंड असून, चार हजार चौरस मीटर क्षेत्रात भव्य वाहनतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ९ कोटी ४ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, प्रकल्पासाठी शासनाने ५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. वाहनतळ एकमजली असावे की तीनमजली याबाबत नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण रंगू लागल्याने सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निविदा मंजूर होते की नाही याबाबत साशंकता निर्माण होत असताना नगरसेवक कुमार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांची बाजू व उद्देश विषद केला. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी आपल्या पक्षसदस्यांना पक्षादेश बजावला व वाहनतळ दोनमजली ऐवजी तीनमजली का नसावे, असा प्रश्न उपस्थित केल्याने वातावरण गंभीर झाले. दरम्यान तोष्णीवाल यांनी तीन मजल्यांसंदर्भातील मागणी राज्य सरकारकडे तीन वेळा केली होती; मात्र ती फेटाळली गेली, असे सांगितले. मुख्याधिकारी सचिन पवार यांनीही यास दुजोरा दिल्याने विरोधातील हवा कमी झाली. मात्र, बावळेकर यांनी सभा तहकुबीची मागणी केली. विरोधक मागणीवर ठाम होते, तर जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत दिरंगाई नको, अशी मागणी सत्ताधारी गटाने केली. शिवसेना माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे, माजी जिल्हाप्रमुख गोपाळ वागदरे, विजय नायडू यांच्यासह अनेक शिवसैनिक तसेच व्यापाऱ्यांतर्फे प्रवीण भांगडिया, मयूर डिकोंडा, हिरो शेख, अजय तोडकर, प्रमोद लोखंडे, अमेय रानडे, सनी उगळे, सचिन वागदरे यावेळी उपस्थित होते. व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या रेट्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी अखेर सर्वानुमते मंजुरी देऊन हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला. दोन्ही गटांनी समन्वयाची भूमिका घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जनरेट्यामुळे अडथळे दूरवाहनतळासंदर्भात राजकारण होत असून, याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली सभागृहात प्रवेश करून ठरावास व्यापारीवर्गाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पास विरोध न करता तातडीने मंजुरी घ्यावी व प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशी मागणीही शिवसेना कार्यकर्त्यांनी केली. शिवसेनेच्या पवित्र्याने सत्ताधारी गटात समाधान व्यक्त करण्यात आले. तातडीने विषय मंजूर करून घेण्यातील अडथळे त्यामुळे दूर झाले.शहराच्या गरजांचा विचार करून आमदार मकरंद पाटील यांनी माझ्यावर नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. वाहनतळाचा प्रस्ताव मंजूर करून त्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करताना यश आल्याचा मला आनंद होत आहे.- उज्ज्वला तोष्णीवाल, नगराध्यक्षा