शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

महाबळेश्वरात वाहतूक कोंडी फुटणार!

By admin | Updated: February 6, 2015 00:39 IST

पर्यटकांना दिलासा : राजकीय एकवाक्यतेमुळे नवीन वाहनतळाचा प्रस्ताव पालिकेत मंजूर

सातारा : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नवीन वाहनतळाचा प्रस्ताव नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. विरोधकांच्या आक्षेपास नगरसेवक कुमार शिंदे यांनी खुलासेवार उत्तरे दिल्यानंतर ठराव मंजूर करण्यात आला.महाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक येतात. सलग सुट्या व हंगामातील गर्दीत वाहने लावण्यास पर्यटकांना अडचणी येतात. हा प्रश्न स्थानिकांसाठीही जिव्हाळ््याचा बनला होता. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून अनुदान आले असतानाही राजकीय एकवाक्यता नसल्यामुळे ठरावाबाबत गांभीर्याने विचार होत नव्हता. पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर वाहनतळाबाबत गांभीर्याने विचार करून सत्ताधारी गटातर्फे नगराध्यक्षा तोष्णीवाल यांनी यासंदर्भातील सर्व कागदपत्रे आणि अनुदानाची सांगड घालून हा गहन प्रश्न हातावेगळा करण्याचे ठरविले. सत्ताधारी नगरसेवकांच्या सहकार्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेत विषय चर्चेस घेण्यात आला.रे गार्डन येथील सिटीसर्व्हे नंबर ५४८ येथे सुमारे चारशे वाहने उभी राहू शकतील असा भूखंड असून, चार हजार चौरस मीटर क्षेत्रात भव्य वाहनतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ९ कोटी ४ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, प्रकल्पासाठी शासनाने ५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. वाहनतळ एकमजली असावे की तीनमजली याबाबत नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण रंगू लागल्याने सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निविदा मंजूर होते की नाही याबाबत साशंकता निर्माण होत असताना नगरसेवक कुमार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांची बाजू व उद्देश विषद केला. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी आपल्या पक्षसदस्यांना पक्षादेश बजावला व वाहनतळ दोनमजली ऐवजी तीनमजली का नसावे, असा प्रश्न उपस्थित केल्याने वातावरण गंभीर झाले. दरम्यान तोष्णीवाल यांनी तीन मजल्यांसंदर्भातील मागणी राज्य सरकारकडे तीन वेळा केली होती; मात्र ती फेटाळली गेली, असे सांगितले. मुख्याधिकारी सचिन पवार यांनीही यास दुजोरा दिल्याने विरोधातील हवा कमी झाली. मात्र, बावळेकर यांनी सभा तहकुबीची मागणी केली. विरोधक मागणीवर ठाम होते, तर जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत दिरंगाई नको, अशी मागणी सत्ताधारी गटाने केली. शिवसेना माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे, माजी जिल्हाप्रमुख गोपाळ वागदरे, विजय नायडू यांच्यासह अनेक शिवसैनिक तसेच व्यापाऱ्यांतर्फे प्रवीण भांगडिया, मयूर डिकोंडा, हिरो शेख, अजय तोडकर, प्रमोद लोखंडे, अमेय रानडे, सनी उगळे, सचिन वागदरे यावेळी उपस्थित होते. व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या रेट्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी अखेर सर्वानुमते मंजुरी देऊन हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला. दोन्ही गटांनी समन्वयाची भूमिका घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जनरेट्यामुळे अडथळे दूरवाहनतळासंदर्भात राजकारण होत असून, याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली सभागृहात प्रवेश करून ठरावास व्यापारीवर्गाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पास विरोध न करता तातडीने मंजुरी घ्यावी व प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशी मागणीही शिवसेना कार्यकर्त्यांनी केली. शिवसेनेच्या पवित्र्याने सत्ताधारी गटात समाधान व्यक्त करण्यात आले. तातडीने विषय मंजूर करून घेण्यातील अडथळे त्यामुळे दूर झाले.शहराच्या गरजांचा विचार करून आमदार मकरंद पाटील यांनी माझ्यावर नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. वाहनतळाचा प्रस्ताव मंजूर करून त्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करताना यश आल्याचा मला आनंद होत आहे.- उज्ज्वला तोष्णीवाल, नगराध्यक्षा