शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जीएसटी विरोधात सोमवारपासून वाहतूकदारांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 17:34 IST

सातारा,दि.६ : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँगे्रसच्या वतीने वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ९ व १० आॅक्टोबर रोजी राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे,ह्ण अशी माहिती या संघटनेचे संघटनेचे संचालक प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.गवळी म्हणाले, ह्यमाल व प्रवासी वाहतूक व्यवसाय सध्याच्या घडीला पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. विविध करांचा बोजा वाहतूकदारांच्या ...

सातारा,दि.६ : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँगे्रसच्या वतीने वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ९ व १० आॅक्टोबर रोजी राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे,ह्ण अशी माहिती या संघटनेचे संघटनेचे संचालक प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गवळी म्हणाले, ह्यमाल व प्रवासी वाहतूक व्यवसाय सध्याच्या घडीला पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. विविध करांचा बोजा वाहतूकदारांच्या माथ्यावर मारण्यात आला आहे.

जीएसटी करासह, रोड कर, डिझेल कर, टोल आमच्याकडे वसूल केला जात आहे. सर्व यंत्रणा ट्रान्सपोर्टशिवाय चालूच शकत नाही. तरीही याच व्यवसायावर सर्वांची वाईट दृष्टी पाहायला मिळते.

महामार्गावर महामार्ग पोलिस, जिल्हा पोलिस, तालुका पोलिस, पीसीआर, रात्रीचे गस्त घालणारे पोलिस आदींकडून पैशांची वसुली केली जाते. या पोलिसांच्या भीतीने परजिल्ह्यातील वाहतूकदारांनी जायचे बंद केले आहे. याबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेतली; पण त्यांनीही गांभीर्याने घेतले नाही.

वाहनांवर ठराविक कंपन्यांचेच रेडिअम लावावेत, असा खाक्या आहे. महिनोमहिने वाहनांचे पासिंग होत नाही. हे तर वेगळेच प्रश्न आहेत. व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. इन्शुरन्स १५० टक्के वाढला आहे. धंदा बंद असल्याने गाड्या ओढून नेल्या जात असल्याचे श्रीनिवास म्हेत्रे यांनी सांगितले.

सक्तीचे वस्तू आणि सेवा कर नोंदणीचे बंधन करू नका, डिझेलच्या वाढत्या किमतीवर असलेले कर कमी करावेत व देशभर एकाच दरात डिझेल व पेट्रोल मिळावे, परिवहन विभाग व पोलिस यंत्रणेकडून होणाºया जाचावर बंधने घालण्यात यावीत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.पोलिसांचा ससेमिरा...महामार्गावर वडाप व्यवसायांसह इतर माल वाहतूक करणाºया वाहन चालकांशी पोलिस उद्धटपणे बोलत असतात. तो गुन्हेगारच आहे, अशा अविर्भावात त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. असा त्रास आम्हाला झाला तर आता जिथे वाहन अडवले आहे, त्याच ठिकाणी ठेवून आम्ही निघून जाऊ, मग कोणतीही कायदेशीर बाब निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहील, असा इशाराही गवळी यांनी यावेळी दिला.