शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जीएसटी विरोधात सोमवारपासून वाहतूकदारांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 17:34 IST

सातारा,दि.६ : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँगे्रसच्या वतीने वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ९ व १० आॅक्टोबर रोजी राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे,ह्ण अशी माहिती या संघटनेचे संघटनेचे संचालक प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.गवळी म्हणाले, ह्यमाल व प्रवासी वाहतूक व्यवसाय सध्याच्या घडीला पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. विविध करांचा बोजा वाहतूकदारांच्या ...

सातारा,दि.६ : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँगे्रसच्या वतीने वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ९ व १० आॅक्टोबर रोजी राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे,ह्ण अशी माहिती या संघटनेचे संघटनेचे संचालक प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गवळी म्हणाले, ह्यमाल व प्रवासी वाहतूक व्यवसाय सध्याच्या घडीला पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. विविध करांचा बोजा वाहतूकदारांच्या माथ्यावर मारण्यात आला आहे.

जीएसटी करासह, रोड कर, डिझेल कर, टोल आमच्याकडे वसूल केला जात आहे. सर्व यंत्रणा ट्रान्सपोर्टशिवाय चालूच शकत नाही. तरीही याच व्यवसायावर सर्वांची वाईट दृष्टी पाहायला मिळते.

महामार्गावर महामार्ग पोलिस, जिल्हा पोलिस, तालुका पोलिस, पीसीआर, रात्रीचे गस्त घालणारे पोलिस आदींकडून पैशांची वसुली केली जाते. या पोलिसांच्या भीतीने परजिल्ह्यातील वाहतूकदारांनी जायचे बंद केले आहे. याबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेतली; पण त्यांनीही गांभीर्याने घेतले नाही.

वाहनांवर ठराविक कंपन्यांचेच रेडिअम लावावेत, असा खाक्या आहे. महिनोमहिने वाहनांचे पासिंग होत नाही. हे तर वेगळेच प्रश्न आहेत. व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. इन्शुरन्स १५० टक्के वाढला आहे. धंदा बंद असल्याने गाड्या ओढून नेल्या जात असल्याचे श्रीनिवास म्हेत्रे यांनी सांगितले.

सक्तीचे वस्तू आणि सेवा कर नोंदणीचे बंधन करू नका, डिझेलच्या वाढत्या किमतीवर असलेले कर कमी करावेत व देशभर एकाच दरात डिझेल व पेट्रोल मिळावे, परिवहन विभाग व पोलिस यंत्रणेकडून होणाºया जाचावर बंधने घालण्यात यावीत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.पोलिसांचा ससेमिरा...महामार्गावर वडाप व्यवसायांसह इतर माल वाहतूक करणाºया वाहन चालकांशी पोलिस उद्धटपणे बोलत असतात. तो गुन्हेगारच आहे, अशा अविर्भावात त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. असा त्रास आम्हाला झाला तर आता जिथे वाहन अडवले आहे, त्याच ठिकाणी ठेवून आम्ही निघून जाऊ, मग कोणतीही कायदेशीर बाब निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहील, असा इशाराही गवळी यांनी यावेळी दिला.