शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक अस्ताव्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

शिरवळ : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा ...

शिरवळ : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

वाहतुकीला अडथळा

सातारा : शहरातील पोवई नाका ते बसस्थानक मार्ग, राजपथ, भाजी मंडई, राधिका रस्ता या परिसरात मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही जनावरे रस्त्यातच ठाण मांडत असल्याने याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरे पकडून ती सोनगाव डेपोत सोडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत पालिकेने तत्काळ कार्यवाही करून जनावरांना कोंडवाड्यात ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कठड्यांची दुरवस्था

मेढा : मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. धोकादायक वळणांवरील कठडे तुटले असून, काही ठिकाणचे कठडे तर नावापुरतेच उरले आहेत. घाटातील धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याचे वाहनधारकांची नेहमीच फसगत होताना दिसते. घाटातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरण करून संरक्षक कठड्यांची उभारणी करावी, धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

जैवसाखळी धोक्यात

सातारा : डोंगराळ भागात वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असून, लहान-मोठे जीव आगीत होरपळून मृत्यू पावत असल्याने जैवसाखळी धोक्यात आली आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेप न रोखल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊ शकत असल्याने वनविभागाने काळजी घ्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

मद्यपींना रोखा

सातारा : कास हे नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले स्थळ असून, केवळ हंगामात पैसे गोळा न करता वनखात्याच्या वतीने वर्षभर त्याची देखभाल केली जावी, तेथे बाटल्या आणून दारू पिणाऱ्यांना अटकाव केला जावा, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

रस्त्याकडेला कचरा

सातारा : शहरातील शहर पोलीस स्टेशन मार्गावरील मुख्य रस्त्याकडेला असणारे नाले कचऱ्यांमुळे तुडुंब भरत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून वाहनधारकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे साताऱ्यात कामानिमित्त येणारे प्रवासीही नाके मुरडत आहेत.

साइडपट्ट्या खचल्या

मेढा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: रात्री या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनू लागला आहे. अनेकदा येथे छोटे-मोठे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त दिसत नसल्यामुळे मदत मिळणे अवघड होऊन बसते.

गव्यांचे दर्शन

पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राजमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. या रस्त्यावरून वर्दळ वाढली असल्याने काही वेळा दुचाकीचालक आणि गव्यांचा कळप आमने-सामने येत असून, गव्यांच्या संवर्धनासाठी या भागात तातडीने उपाय योजण्याची गरज आहे.

बससेवा लवचिक हवी

सातारा : सातारा-स्वारगेट बससेवा प्रवासीसंख्येच्या तुलनेत अपुरी पडताना दिसत आहे. पुण्याला जाणाऱ्या सातारकरांची संख्या जास्त असल्याने विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी गर्दी होते. इतर वेळी गाड्या रिकाम्या असतात. हा विरोधाभास दूर करण्यासाठी बससेवा लवचिक करावी, अशी मागणी होत आहे.