शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाहतूक अस्ताव्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

शिरवळ : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा ...

शिरवळ : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

वाहतुकीला अडथळा

सातारा : शहरातील पोवई नाका ते बसस्थानक मार्ग, राजपथ, भाजी मंडई, राधिका रस्ता या परिसरात मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही जनावरे रस्त्यातच ठाण मांडत असल्याने याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरे पकडून ती सोनगाव डेपोत सोडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत पालिकेने तत्काळ कार्यवाही करून जनावरांना कोंडवाड्यात ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कठड्यांची दुरवस्था

मेढा : मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. धोकादायक वळणांवरील कठडे तुटले असून, काही ठिकाणचे कठडे तर नावापुरतेच उरले आहेत. घाटातील धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याचे वाहनधारकांची नेहमीच फसगत होताना दिसते. घाटातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरण करून संरक्षक कठड्यांची उभारणी करावी, धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

जैवसाखळी धोक्यात

सातारा : डोंगराळ भागात वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असून, लहान-मोठे जीव आगीत होरपळून मृत्यू पावत असल्याने जैवसाखळी धोक्यात आली आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेप न रोखल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊ शकत असल्याने वनविभागाने काळजी घ्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

मद्यपींना रोखा

सातारा : कास हे नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले स्थळ असून, केवळ हंगामात पैसे गोळा न करता वनखात्याच्या वतीने वर्षभर त्याची देखभाल केली जावी, तेथे बाटल्या आणून दारू पिणाऱ्यांना अटकाव केला जावा, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

रस्त्याकडेला कचरा

सातारा : शहरातील शहर पोलीस स्टेशन मार्गावरील मुख्य रस्त्याकडेला असणारे नाले कचऱ्यांमुळे तुडुंब भरत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून वाहनधारकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे साताऱ्यात कामानिमित्त येणारे प्रवासीही नाके मुरडत आहेत.

साइडपट्ट्या खचल्या

मेढा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: रात्री या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनू लागला आहे. अनेकदा येथे छोटे-मोठे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त दिसत नसल्यामुळे मदत मिळणे अवघड होऊन बसते.

गव्यांचे दर्शन

पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राजमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. या रस्त्यावरून वर्दळ वाढली असल्याने काही वेळा दुचाकीचालक आणि गव्यांचा कळप आमने-सामने येत असून, गव्यांच्या संवर्धनासाठी या भागात तातडीने उपाय योजण्याची गरज आहे.

बससेवा लवचिक हवी

सातारा : सातारा-स्वारगेट बससेवा प्रवासीसंख्येच्या तुलनेत अपुरी पडताना दिसत आहे. पुण्याला जाणाऱ्या सातारकरांची संख्या जास्त असल्याने विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी गर्दी होते. इतर वेळी गाड्या रिकाम्या असतात. हा विरोधाभास दूर करण्यासाठी बससेवा लवचिक करावी, अशी मागणी होत आहे.