शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

प्रशिक्षणाच्या ओझ्याने शिक्षक बेजार

By admin | Updated: October 15, 2015 00:30 IST

महिन्यातून किमान चारवेळा होतेय मुख्य गावांची वारी--शाळाबाह्य गुरुजी : चार

प्रगती जाधव-पाटील - सातारा --विद्यार्थ्यांना शिकवायचे, दफ्तरनोंदी करायच्या, शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचवायच्या का, महिन्यातून चार-चारवेळा आयोजित केलेल्या प्रशिक्षणात सहभागी व्हायचे, असा प्रश्न प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना गेल्या काही दिवसांपासून सतावत आहे. प्रशिक्षणाच्या वाढत्या ओझ्याने शिक्षक अक्षरश: बेजार झाले आहेत.राज्य शासनाने कोणतीही नवीन योजना काढली की, त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षकांवर येते. त्यासाठी कधी जिल्हा परिषद तर कधी पंचायत समितीमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. शाळेतील अभ्यासक्रम आणि वैयक्तिक आयुष्यातील व्यवधाने सांभाळून शिक्षकांना सक्तीने या सर्व प्रशिक्षणांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांनी पिढ्या घडविण्याची अपेक्षा करत असताना त्यांना अध्ययनासाठी वेळच नसतो, ही वस्तुस्थिती आहे. यातून मार्ग काढून अध्ययनाविषयी मार्गदर्शन झाले तर त्याचे कौतुक शिक्षकांनाही वाटेल.अशी करावी लागते शिक्षकांना कसरतविद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे कितीही महत्त्वाचे प्रशिक्षण असले तरीही शिक्षकांना अध्यापन पूर्ण करावे लागते. काही ठिकाणी शिक्षक वर्गातील हुशार मुलांवर वर्ग सोपवून प्रशिक्षणासाठी निघून जातात.प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले तर बऱ्याचदा दोन शिक्षकी शाळेतील शिक्षक आळीपाळीने प्रशिक्षणासाठी जातात. त्यावेळी मात्र, अख्ख्या शाळेची जबाबदारी एकाच शिक्षकावर पडते.शिक्षक वर्गात नसताना शाळेत काही अघटित घडले किंवा अपघात झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेल्या शिक्षकावर असते. त्यामुळे हजर नसतानाही अनेकदा या शिक्षकांना भुर्दंड सोसावा लागत आहे.प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्याची टिपणे काढून प्रत्यक्ष कृती काय केली, याविषयीचा अहवाल बनवावा लागतो. म्हणून प्रशिक्षण नको पण अहवाल आवरा, अशी म्हणण्याची वेळ शिक्षकांवर येते.