शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

प्रशिक्षणाच्या ओझ्याने शिक्षक बेजार

By admin | Updated: October 15, 2015 00:30 IST

महिन्यातून किमान चारवेळा होतेय मुख्य गावांची वारी--शाळाबाह्य गुरुजी : चार

प्रगती जाधव-पाटील - सातारा --विद्यार्थ्यांना शिकवायचे, दफ्तरनोंदी करायच्या, शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचवायच्या का, महिन्यातून चार-चारवेळा आयोजित केलेल्या प्रशिक्षणात सहभागी व्हायचे, असा प्रश्न प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना गेल्या काही दिवसांपासून सतावत आहे. प्रशिक्षणाच्या वाढत्या ओझ्याने शिक्षक अक्षरश: बेजार झाले आहेत.राज्य शासनाने कोणतीही नवीन योजना काढली की, त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षकांवर येते. त्यासाठी कधी जिल्हा परिषद तर कधी पंचायत समितीमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. शाळेतील अभ्यासक्रम आणि वैयक्तिक आयुष्यातील व्यवधाने सांभाळून शिक्षकांना सक्तीने या सर्व प्रशिक्षणांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांनी पिढ्या घडविण्याची अपेक्षा करत असताना त्यांना अध्ययनासाठी वेळच नसतो, ही वस्तुस्थिती आहे. यातून मार्ग काढून अध्ययनाविषयी मार्गदर्शन झाले तर त्याचे कौतुक शिक्षकांनाही वाटेल.अशी करावी लागते शिक्षकांना कसरतविद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे कितीही महत्त्वाचे प्रशिक्षण असले तरीही शिक्षकांना अध्यापन पूर्ण करावे लागते. काही ठिकाणी शिक्षक वर्गातील हुशार मुलांवर वर्ग सोपवून प्रशिक्षणासाठी निघून जातात.प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले तर बऱ्याचदा दोन शिक्षकी शाळेतील शिक्षक आळीपाळीने प्रशिक्षणासाठी जातात. त्यावेळी मात्र, अख्ख्या शाळेची जबाबदारी एकाच शिक्षकावर पडते.शिक्षक वर्गात नसताना शाळेत काही अघटित घडले किंवा अपघात झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेल्या शिक्षकावर असते. त्यामुळे हजर नसतानाही अनेकदा या शिक्षकांना भुर्दंड सोसावा लागत आहे.प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्याची टिपणे काढून प्रत्यक्ष कृती काय केली, याविषयीचा अहवाल बनवावा लागतो. म्हणून प्रशिक्षण नको पण अहवाल आवरा, अशी म्हणण्याची वेळ शिक्षकांवर येते.