शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास बंदी असताना पाचगणीत पर्यटक दाखल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:28 IST

पाचगणी : प्रवास करण्याबाबत निर्बंध असतानाही पाचगणी येथे विना ई-पास दाखल झालेल्या पर्यटकांवर पाचगणी पोलीस व पालिकेच्या पथकाने ...

पाचगणी : प्रवास करण्याबाबत निर्बंध असतानाही पाचगणी येथे विना ई-पास दाखल झालेल्या पर्यटकांवर पाचगणी पोलीस व पालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यांना एक तासात पाचगणी सोडण्याचे फर्मान प्रशासनाने सोडले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे जिल्हाबंदी लागू केली आहे. तरीही शहरात चोरीछुपे पर्यटक दाखल होत असल्याने पाचगणीकरांची चिंता वाढली आहे.

याबाबत पाचगणी पोलीस व पाचगणी पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी येथे गुरुवारी रात्री गाडी (एमएच ०१ डीबी ०७३७), (एमएच ०१ डीके ४५५८) व गाडी (टीएस ०९ ईयू ८) हे नंबर असलेल्या तीन गाड्यांमधून अकरा प्रवासी दाखल झाले होते. हे सर्वजण विना ई-पास आल्याने त्यांच्यावर पाचगणी पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतरही ते पर्यटक पाचगणी येथील दिल्ली दरबार हॉटेलवर गेले. सकाळी त्यांच्यावर पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करून सहा हजार रुपयांचा दंड केला आणि एका तासात शहर सोडा अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी दिली.

नगरपालिकेने केलेल्या कारवाई पथकात सूर्यकांत कासुर्डे, बाबू झाडे, आबू डांगे, सागर बगाडे, अफजल डांगे, विशाल स्वामी, लालू क्षीरसागर, आकाश वन्ने यांनी सहभाग घेतला. पाचगणी या थंड हवेच्या पर्यटन स्थळावर सध्या कोरोनामुळे पूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. शासनाने कडक निर्बंध घातले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाचगणी नगरपालिका, पोलीस आणि आरोग्य विभाग आटोकाट प्रयत्न करत आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यात येत असताना, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना रोखण्यात अडचणी येतील.

चौकट

प्रवेश मिळवला हे विशेष

जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना मुंबईवरून आलेल्या तिन्ही पर्यटक गाड्या जिल्हा प्रवेशद्वारावरून कशा आल्या, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या पर्यटक गाड्यांना प्रवेश देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा जिल्हा प्रशासन उगारणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

चौकट :

रात्री नाकाबंदीत प्रथम विनापरवाना प्रवास केल्याबद्दल पोलिसांनी चार हजार रुपयांची दंडात्मक तर सकाळी पालिकेच्या भरारी पथकाने हॉटेलवर जाऊन सहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.