शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पर्यटनस्थळांना धोका दरडींचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:16 IST

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम दिशेतून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे या परिसरात मुसळधार पाऊस पडतो. साहजिकच जागोजागी धबधबे, हिरवागार निसर्ग ...

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम दिशेतून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे या परिसरात मुसळधार पाऊस पडतो. साहजिकच जागोजागी धबधबे, हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पावले तिकडे खेचली जातात. खास आकर्षण असलेल्या कास, बामणोली, भांबवली, ठोसेघर धबधब्याकडे जाणारे रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे फिरायला जाताना काळजी घेण्याची गरज आहे.महाबळेश्वर, नवजा, कोयना येथे दररोज सरासरी शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. विदर्भ, मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्यात वर्षभर पडत असेल तेवढा येथे एका दिवसात पडतो. वर्षा सहलीचा अनुभव घेण्यासाठी शेकडो पर्यटक पावसाळ्यात महाबळेश्वर, पाचगणीला येतात. येथे येण्यासाठी पसरणी किंवा आंबेनळी घाटातूनच जावे लागते. या घाटातही गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा सतर्क असल्याने काही दिवसांत ती हटविली जात असल्याने रस्ता मोकळा होतो.वजराई धबधबा पर्यावरणप्रेमींचे प्राधान्याचे ठिकाण आहे. मार्गातही दरडी, रस्ता खचण्याचा धोका आहे. गेल्या आठवड्यात तर भांबवली धबधबा पाहायला गेलेले पुण्यातील काही पर्यटक दरड पडल्याने अडकले होते. त्यांचा मुक्काम व जेवणाची सोय ग्रामस्थांनी केली. दुसऱ्या दिवशी ते गावी गेले. सज्जनगड फाट्याच्या पुढील वळणावर रस्ता खचल्यामुळे अवजड वाहतूक बंद आहे.पर्यटनस्थळी फिरायला जाताना घ्यावयाची काळजीपावसाळ्यात सहलीला किंवा ट्रेकला जाताना त्या परिसराची संपूर्ण माहिती अवगत करून घेणे.एखाद्या पर्यटनस्थळाला आपण प्रथमच भेट देणार असू तर फिरण्यासाठी तेथील मार्गदर्शकाची मदत घ्यावी.पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत. या धबधब्यांच्या जवळ जाणे शक्यतो टाळावे.वाहत्या पाण्यात धोका पत्करून फोटोसेशन करण्याचा मोह आवरावा.पाऊस व धुके याचा अंदाज घेऊन वाहने सावकाश चालवावीत.पावसाळ्याच दरडी कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने घाटमार्गातून शक्यतो दिवसा प्रवास करावा.पावसामुळे डोंगर हिरवेगार झाले असून, अनेकजण डोंगरावर फिरण्यासाठी जातात. याठिकाणी जाण्यापूर्वी पायात चांगले रबरी बूट, अंगात रेनकोट परिधान करावा.पाणी आणि शेवाळे यांच्यामुळे दगड निसरडे झालेले असतात. त्यामुळे डोंगरदºयामध्ये भटकंती करताना विशेष काळजी घ्यावी.पावसाचे प्रमाण अधिक असल्यास फिरायला जाणे टाळावे.