शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

पर्यटनस्थळांना धोका दरडींचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:16 IST

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम दिशेतून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे या परिसरात मुसळधार पाऊस पडतो. साहजिकच जागोजागी धबधबे, हिरवागार निसर्ग ...

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम दिशेतून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे या परिसरात मुसळधार पाऊस पडतो. साहजिकच जागोजागी धबधबे, हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पावले तिकडे खेचली जातात. खास आकर्षण असलेल्या कास, बामणोली, भांबवली, ठोसेघर धबधब्याकडे जाणारे रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे फिरायला जाताना काळजी घेण्याची गरज आहे.महाबळेश्वर, नवजा, कोयना येथे दररोज सरासरी शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. विदर्भ, मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्यात वर्षभर पडत असेल तेवढा येथे एका दिवसात पडतो. वर्षा सहलीचा अनुभव घेण्यासाठी शेकडो पर्यटक पावसाळ्यात महाबळेश्वर, पाचगणीला येतात. येथे येण्यासाठी पसरणी किंवा आंबेनळी घाटातूनच जावे लागते. या घाटातही गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा सतर्क असल्याने काही दिवसांत ती हटविली जात असल्याने रस्ता मोकळा होतो.वजराई धबधबा पर्यावरणप्रेमींचे प्राधान्याचे ठिकाण आहे. मार्गातही दरडी, रस्ता खचण्याचा धोका आहे. गेल्या आठवड्यात तर भांबवली धबधबा पाहायला गेलेले पुण्यातील काही पर्यटक दरड पडल्याने अडकले होते. त्यांचा मुक्काम व जेवणाची सोय ग्रामस्थांनी केली. दुसऱ्या दिवशी ते गावी गेले. सज्जनगड फाट्याच्या पुढील वळणावर रस्ता खचल्यामुळे अवजड वाहतूक बंद आहे.पर्यटनस्थळी फिरायला जाताना घ्यावयाची काळजीपावसाळ्यात सहलीला किंवा ट्रेकला जाताना त्या परिसराची संपूर्ण माहिती अवगत करून घेणे.एखाद्या पर्यटनस्थळाला आपण प्रथमच भेट देणार असू तर फिरण्यासाठी तेथील मार्गदर्शकाची मदत घ्यावी.पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत. या धबधब्यांच्या जवळ जाणे शक्यतो टाळावे.वाहत्या पाण्यात धोका पत्करून फोटोसेशन करण्याचा मोह आवरावा.पाऊस व धुके याचा अंदाज घेऊन वाहने सावकाश चालवावीत.पावसाळ्याच दरडी कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने घाटमार्गातून शक्यतो दिवसा प्रवास करावा.पावसामुळे डोंगर हिरवेगार झाले असून, अनेकजण डोंगरावर फिरण्यासाठी जातात. याठिकाणी जाण्यापूर्वी पायात चांगले रबरी बूट, अंगात रेनकोट परिधान करावा.पाणी आणि शेवाळे यांच्यामुळे दगड निसरडे झालेले असतात. त्यामुळे डोंगरदºयामध्ये भटकंती करताना विशेष काळजी घ्यावी.पावसाचे प्रमाण अधिक असल्यास फिरायला जाणे टाळावे.