शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

तब्बल ४५० तंटे निकालात

By admin | Updated: July 6, 2014 23:15 IST

बावधनचा इतिहास : ३० वर्षांपूर्वीचीही भांडणे मिटविण्यात समितीला यश

तानाजी कचरे ल्ल बावधनराजकीयदृष्ट्या जागृत व सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बावधन (ता. वाई) येथे तंटामुक्त समितीने केलेल्या पारदर्शक कारभारामुळे सुमारे तीस वर्षांपूर्वीचे प्रलंबित व किचकट तंट्यासह शेकडो तंट्यांचे निवारण करण्यात समितीला यश आले आहे. १४८ महसुली, ९० दिवाणी तर २२४ फौजदारी असे तब्बल ४६२ तंटे मिटवून गावाने नवा इतिहास रचला आहे.पोलीस यंत्रणा व न्याय व्यवस्थेवरील वाढलेला ताण लक्षात घेता शासनाने राबविलेल्या महत्त्वकांक्षी तंटामुक्त अभियानाला वाई तालुक्यातही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बावधनसारख्या राजकीयदृष्ट्या जागृत गावात हा या अभियानाचा श्री गणेशा झाला; पण मोठ्या लोकसंख्येच्या गावात अभियान यशस्वी होईल का? याबाबत शंका उपस्थित झाल्या. एकट्या बावधनची १६ हजार लोकसंख्या तर आसपासच्या बारा वाड्यांची काही हजारात, त्यामुळे ऐकेकाळी तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बावधनकरांनी बोलू ते करू, हे चित्र पाहावयाला मिळाले. मोठ्या संख्येच्या गावात स्वभाविकपणे तंटेही लक्षणीय होते. यामुळे दिवसाआड कोर्ट-कचेरी ठरलेली अनेकवेळा वाढत्या तंट्याने गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता.या पार्श्वभूमीवर २००७ मध्ये तंटामुक्त अभियान उदयाला आले अन् गावाची परिस्थितीच बदलून गेली. गेल्या सात वर्षांपासून गावात तंटामुक्त समितीचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत तर समितीने एक पाऊल पुढे टाकले आहे. २० ते ३० वर्षांत जे न्यायालयात घडले नाही ते समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून घडले आहे. जे तंटे मिटूच शकत नाहीत, असे शेकडो महसूल, बांधकाम, दिवाणी व फौजदारी तंटे आपआपसात तडजोडी करून मिटवले आहेत. केवळ बावधन गावातील नव्हे तर आजूबाजूंच्या वाड्यांचे तंटेही या समितीने सहजरीत्या मिटविले आहेत.योग्य मार्गदर्शन, युक्तिवाद व दोन्हीकडील लोकांना पटवून सांगायचे कौशल्य, यामुळे १४८ महसुली, ९० दिवाणी तर २२४ हून अधिक फौजदारी तंटे निकाली काढण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनानेही समितीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील मोठ्या गावांनी आदर्श घ्यावा असे काम बावधनच्या तंटामुक्त समितीने केले आहे.