शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

टोमॅटो उतरला... कांदा भडकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 16:31 IST

सातारा : पावसाळा सुरू झाल्यापासून पालेभाज्यांच्या दरात नेहमीत चढ-उतार होत आहे. जी भाजी महाग ती ताटातून गायब असेच चित्र स्वयंपाकघरात पहावयास मिळत होते. काही दिवसांपूर्वी ८० रूपये किलोवर गेलेल्या टोमॅटोचे दर कुठे कमी होतायत न होतायत तोवर कांद्याच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजट पुन्हा एकदा कोलमडले आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम ...

ठळक मुद्देआवक कमी झाल्याने ग्राहकांना दरवाढीची झळकांदा विक्री सध्या तीस रुपये किलो टोमॅटोची विक्री मात्र ६० रुपये किलो दराने पालेभाज्यांच्या दरात सतत चढ-उतारग्राहकांना याची काही प्रमाणात झळ

सातारा : पावसाळा सुरू झाल्यापासून पालेभाज्यांच्या दरात नेहमीत चढ-उतार होत आहे. जी भाजी महाग ती ताटातून गायब असेच चित्र स्वयंपाकघरात पहावयास मिळत होते. काही दिवसांपूर्वी ८० रूपये किलोवर गेलेल्या टोमॅटोचे दर कुठे कमी होतायत न होतायत तोवर कांद्याच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजट पुन्हा एकदा कोलमडले आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाला असला तरी पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. याचा परिणाम फळ व पालेभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन व आवक कमी झाल्यामुुळे पालेभाज्यांच्या किमतीतही हळूहळू वाढ होऊ लागली आहे.ग्रामीण भागातून मुख्य बाजारपेठेत विक्रीसाठी येणाºया पालेभाज्याचे प्रमाण कमी झाल्याने ग्राहकांचा दरवाढीची झळ सोसावी लागत आहे.

पावसाळ्यात बहुतांश पालेभाज्यांचे दर कमी झाले. अगदी ६० ते ८० रुपये किलो या दराने विकल्या जाणाºया फळ व पालेभाज्या २० ते ३० रुपये किलोवर आल्या. एक महिन्यांपूर्वी टोमॅटो १० ते २० रुपये किलो या दराने विकला जात होता. मात्र, आवक कमी झाल्याने टोमॅटोचे दर गगणाला भिडले. तब्बल ८० रुपये किलो या दराने टॉमॅटोची विक्री केली गेली. गेल्या तीन-चार दिवसांपासून हे दर वीस रूपयांनी उतरले असून सध्या बाजारपेठेत ६० रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री केली जात आहे.

ग्राहकांना याचा थोडा दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. बाजारपेठेत आठ ते दहा रुपये किलो या दराने मिळणारा कांदा सध्या तीस रुपये किलो या दराने विकला जात आहे. पालेभाज्यांच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याने ग्राहकांना याची काही प्रमाणात झळ बसत आहे.