शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

टोकलं सीताफळाचं बियाणं; फुलणार माळरान जोमानं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

सातारा : माण तालुक्यातील माणदेश विकास फांउडेशनच्या वतीने देवापूर-शिरताव मार्गावरील वन विभागाच्या हद्दीत उजाड माळावर एक हजार सीताफळ बियांचे ...

सातारा : माण तालुक्यातील माणदेश विकास फांउडेशनच्या वतीने देवापूर-शिरताव मार्गावरील वन विभागाच्या हद्दीत उजाड माळावर एक हजार सीताफळ बियांचे टोकण करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी फळझाडाचे संगोपन व संवर्धनचा निर्धारही करण्यात आला. दरम्यान, यामुळे माळरानावर सीताफळाचा बहर येणार आहे.

सीताफळ बिया टोकणचा प्रारंभ उपजिल्हाधिकारी विक्रम वीरकर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य सी. डी. व्हावळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष उध्दव बाबर, जगन्नाथ वीरकर, शिवाजी माने, कृष्णा बाबर, चंद्रकांत शेंडे, सतेज पाटील, कैलास कांबळे, सुमीत बाबर, उद्योगपती श्रीकांत शेंडे, प्रा. एम. बी. नारायणकर, प्रा. एस. एस. बाबर, प्रा. दादाराम साळुंखे, प्रा. डी. डी. खटके, प्रा. एस. एस. गोडसे, प्रा. व्ही. पी. लवटे, चंद्रकांत शेंडे आदी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी विक्रम वीरकर म्हणाले, ‘सीताफळ हे अत्यंत काटक फळझाड असून त्याला शेळ्या, मेंढ्या व इतर प्राण्यापासून इजा पोहोचत नाही. त्यामुळे जनावरांपासून संरक्षण न करताही सीताफळाची जोपासणे होऊ शकते. शिवाय या झाडावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होतो. आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने लागवड अधिक प्रमाणात होण्याची गरज आहे.

फोटो दि.१९ सातारा सीताफळ फोटो...

फोटो ओळ : माण तालुक्यातील देवापूर-शिरताव गावाच्या मार्गावर सीताफळ बियांचे टोकन करण्यात आले.

......................................................