शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

लोणंदसाठी आज मतदान

By admin | Updated: April 17, 2016 00:33 IST

नगरपंचायत निवडणूक : २१ मतदान केंद्रांची निर्मिती; प्रशासन सज्ज; सोमवारी मतमोजणी

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान बदलण्याची ताकद कुणाच्यातही नाही, संविधान बदलण्यासाठी पुढे येणारे हात तोडण्याची ताकद आमच्यात आहे, ज्यांना हे संविधान मान्य नाही, त्यांनी हा देश सोडून जावे, असा इशारा खासदार रामदास आठवले यांनी दिला. रिपब्लिकन पक्षाच्या ‘भारत भीम’ यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे शनिवारी कोल्हापुरात आले होते, यावेळी दसरा चौकात झालेल्या समता महापरिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे होते. खासदार आठवले म्हणाले, देशातील सर्व जाती-धर्माच्या भिंती भेदून माणसे जोडणे हा भारत भीमयात्रेचा उद्देश आहे. धर्म, जात, पंथ यावरून होत असलेला संघर्ष थांबावा, या व्यापक विचारासाठी माझा प्रयत्न आहे. देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांच्या पाठीशी आम्ही आहोत, त्यांनी स्वत:ला असुरक्षित समजू नये, असे आवाहन करत, बाबासाहेबांच्या संविधानामुळे मी पंतप्रधान झालो असल्याचे नरेंद्र मोदी यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे देशाची लोकशाही प्रगल्भ आहे. या देशावर प्रेम करणाऱ्या मुसलमानांना कोणी धक्का देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही धक्का देऊ, असाही इशारा आठवलेंनी दिला. ‘मनसे’वर हल्लाबोल करताना आठवले म्हणाले, राज ठाकरे यांनी मराठी माणसांवर जरूर प्रेम करावे पण मुंबई ही सर्व भारतीयांची आहे. त्यामुळे मुंबईत व्यवसाय करणारा हा परप्रांतीय असला तरीही तो भारतीयच आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. ते म्हणाले, रिपाइंमध्ये व्यापक ऐक्य करण्यासाठी सर्व जाती-धर्मांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत. या रिपाइं ऐक्याच्या अध्यक्षपदी आपण प्रकाश आंबेडकर यांनी संमती दिल्यास त्यांची नियुक्ती करू. ऐक्य करा, ताकद वाढवा, पुढे ऐक्यातून नेते फुटले तर त्यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, चंदन शर्मा, बी. एम, चव्हाण, संगीता आठवले यांची भाषणे झाली. यावेळी श्यामप्रसाद कांबळे, बी. के. कांबळे, मंगलराव माळगे, डॉ. अनिल माने, कुमार कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)