शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

मांढरदेवी काळूबाई यात्रेचा आज मुख्य दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST

वाई : महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवी येथील श्री काळूबाई यात्रेचा २८ रोजी मुख्य दिवस आहे. ...

वाई : महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवी येथील श्री काळूबाई यात्रेचा २८ रोजी मुख्य दिवस आहे. दरवर्षी या यात्रेसाठी लाखो भाविक मांढरदेव येथे येत असतात. परंतु, चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोरोना रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून मांढरदेवी यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पौष महिन्यात म्हणजेच, १४ फेब्रुवारीपर्यंत काळूबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. मांढरदेव मंदिर परिसरात १४४ कलम लागू केले असून, मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, याची दक्षता पोलीस व प्रशासन घेत आहे. मात्र, देवीची विधीवत पूजा व महाआरती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व निवडक पुजारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुवार, २८ रोजी देवीचा यात्रेचा मुख्य दिवस. या दिवशी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक न्या. आर. डी. सावंत यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता देवीची विधीवत पूजा होणार आहे. त्यावेळी मांढरदेव देवस्थानचे चेअरमन न्या. एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त महेश कुलकर्णी, मिलिंद ओक, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, शैलेश क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, राजगुरू कोचळे, देवस्थानचे सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे व निवडक पुजारी उपस्थित राहणार आहेत.

पौष महिन्यात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन पोलीस व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षी मांढरगडावर लाखो भाविक येत असतात. त्याचबरोबर विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स मंदिर परिसरात थाटली जातात; मात्र, यावर्षी बाहेरील कोणत्याही दुकानदाराला मंदिर परिसरात दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.

चौकट...

भाविकांना मंदिराकडे येण्यास नो एन्ट्री !

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काळूबाई मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाईमार्गे एमआयडीसी चौकात तर भोर येथे शिवाजी पुतळ्याजवळ तसेच कोचळेवाडी फाटा येथे पोलीस तैनात केले असून, भाविकांना तेथूनच माघारी फिरविले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत भाविकांना मंदिराकडे सोडले जात नाही.