शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मांढरदेवी काळूबाई यात्रेचा आज मुख्य दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST

वाई : महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवी येथील श्री काळूबाई यात्रेचा २८ रोजी मुख्य दिवस आहे. ...

वाई : महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवी येथील श्री काळूबाई यात्रेचा २८ रोजी मुख्य दिवस आहे. दरवर्षी या यात्रेसाठी लाखो भाविक मांढरदेव येथे येत असतात. परंतु, चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोरोना रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून मांढरदेवी यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पौष महिन्यात म्हणजेच, १४ फेब्रुवारीपर्यंत काळूबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. मांढरदेव मंदिर परिसरात १४४ कलम लागू केले असून, मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, याची दक्षता पोलीस व प्रशासन घेत आहे. मात्र, देवीची विधीवत पूजा व महाआरती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व निवडक पुजारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुवार, २८ रोजी देवीचा यात्रेचा मुख्य दिवस. या दिवशी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक न्या. आर. डी. सावंत यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता देवीची विधीवत पूजा होणार आहे. त्यावेळी मांढरदेव देवस्थानचे चेअरमन न्या. एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त महेश कुलकर्णी, मिलिंद ओक, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, शैलेश क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, राजगुरू कोचळे, देवस्थानचे सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे व निवडक पुजारी उपस्थित राहणार आहेत.

पौष महिन्यात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन पोलीस व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षी मांढरगडावर लाखो भाविक येत असतात. त्याचबरोबर विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स मंदिर परिसरात थाटली जातात; मात्र, यावर्षी बाहेरील कोणत्याही दुकानदाराला मंदिर परिसरात दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.

चौकट...

भाविकांना मंदिराकडे येण्यास नो एन्ट्री !

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काळूबाई मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाईमार्गे एमआयडीसी चौकात तर भोर येथे शिवाजी पुतळ्याजवळ तसेच कोचळेवाडी फाटा येथे पोलीस तैनात केले असून, भाविकांना तेथूनच माघारी फिरविले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत भाविकांना मंदिराकडे सोडले जात नाही.