शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

मांढरदेवी काळूबाई यात्रेचा आज मुख्य दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST

वाई : महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवी येथील श्री काळूबाई यात्रेचा २८ रोजी मुख्य दिवस आहे. ...

वाई : महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवी येथील श्री काळूबाई यात्रेचा २८ रोजी मुख्य दिवस आहे. दरवर्षी या यात्रेसाठी लाखो भाविक मांढरदेव येथे येत असतात. परंतु, चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोरोना रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून मांढरदेवी यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पौष महिन्यात म्हणजेच, १४ फेब्रुवारीपर्यंत काळूबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. मांढरदेव मंदिर परिसरात १४४ कलम लागू केले असून, मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, याची दक्षता पोलीस व प्रशासन घेत आहे. मात्र, देवीची विधीवत पूजा व महाआरती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व निवडक पुजारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुवार, २८ रोजी देवीचा यात्रेचा मुख्य दिवस. या दिवशी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक न्या. आर. डी. सावंत यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता देवीची विधीवत पूजा होणार आहे. त्यावेळी मांढरदेव देवस्थानचे चेअरमन न्या. एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त महेश कुलकर्णी, मिलिंद ओक, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, शैलेश क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, राजगुरू कोचळे, देवस्थानचे सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे व निवडक पुजारी उपस्थित राहणार आहेत.

पौष महिन्यात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन पोलीस व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षी मांढरगडावर लाखो भाविक येत असतात. त्याचबरोबर विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स मंदिर परिसरात थाटली जातात; मात्र, यावर्षी बाहेरील कोणत्याही दुकानदाराला मंदिर परिसरात दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.

चौकट...

भाविकांना मंदिराकडे येण्यास नो एन्ट्री !

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काळूबाई मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाईमार्गे एमआयडीसी चौकात तर भोर येथे शिवाजी पुतळ्याजवळ तसेच कोचळेवाडी फाटा येथे पोलीस तैनात केले असून, भाविकांना तेथूनच माघारी फिरविले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत भाविकांना मंदिराकडे सोडले जात नाही.