शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘किसन वीर’कडून थकीत एफआरपी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:47 IST

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. दरम्यान, ...

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. दरम्यान, कारखान्याने एफआरपी कायद्यानुसार थकीत रकमेचे व्याज द्यावे, यासाठी वाई प्रांत कार्यालयातर्फे पत्रव्यवहार केला आहे.

किसन वीर कारखान्याने थकीत एफआरपीची रक्कम ३,३८२.४३ लाख व त्यावरील व्याज थकविले होते. शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळावेत, यासाठी साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल झाल्या होत्या. साखर आयुक्तांनी कारखान्यावर आरआरसी कारवाईचा बडगा उगारला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य प्रवक्ते अर्जुनराव साळुंखे, तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ व इतर सहकाऱ्यांनी कोरोना काळातही तीव्र आंदोलन केले. किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या सातारा येथील निवासस्थानी अनेक दिवस रात्रंदिवस त्यांनी आंदोलन केले. तसेच कारखान्याचे माजी संचालक प्रवीण बाबर यांनीदेखील थकीत एफआरपीची रक्कम मिळत नसल्याने कारखान्याविरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेऊन कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा केली. मात्र, व्याज भरले नसल्याने प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले यांनी साखर विभागाच्या विशेष लेखापरीक्षकांना वसुलीबाबतचे पत्र दिले आहे.

कोट...

‘स्वाभिमानी’च्या अभ्यासपूर्ण लढ्याला जबरदस्त यश आले आहे. सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच थकीत ऊसबिल वसुली १५ व्याजासह वसुलीस सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांकडून थकीत ऊसबिलापोटी कायदेशीर १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. किसन वीर सहकारी साखर कारखाना, भुईंज यांच्याकडून व्याज वसुली प्रक्रिया सुरू झाल्याशिवाय थांबणार नाही.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

‘स्वाभिमानी’कडून निवडणुकीची तयारी

या सातत्यपूर्ण आंदोलनाची दखल सर्वसामान्य शेतकरी व सभासद कामगारांनी घेऊन आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किसन वीर कारखान्याची निवडणूक लढवावी, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. याही मागणीबाबत संस्थापक-अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे राजू शेळके यांनी सांगितले.