शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कोरोनामुळे लग्नाला येऊ नका म्हणण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST

रशिद शेख औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार ...

रशिद शेख

औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार पडत नव्हता; मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, हे आपल्या पै-पाहुणे, मित्रमंडळींना फोन करून सांगत आहेत की लग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्यातच उरकणार आहे. त्यामुळे आता लग्नही बोटावर मोजता येतील अशा लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत, तर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत.

सद्य:स्थितीत गेल्या वर्षीपेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक जास्त प्रमाणात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये, वाडी-वस्तीमध्ये कोरोना जाऊन पोहोचला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी पन्नास लोकांची परवानगी काढून लग्नसोहळे केले जात होते. त्यावेळी जास्त संसर्ग नसल्याने पन्नासऐवजी दोनशे-तीनशे लोक उपस्थित राहत होते. परंतु, आता प्रशासनाने दोन्हीकडील मिळून २५ लोकांना परवानगी दिली आहे. मात्र, ती परवानगी काढताना उपस्थित २५ लोकांचे नाव, पत्ता, फोन नंबर, वय ही माहिती भरणे महत्त्वाचे केले आहे. तसेच आचारी, भटजी यांचे कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र व विवाह सोहळा दोन तासांच्या आत पूर्ण करणे या अटी व शर्ती बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत.

सध्याची अनिश्चतता, एकूणच कठीण परिस्थिती पाहता कुटुंबीयांसोबत सुरक्षित अंतर ठेवून बोहल्यावर चढण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे, तर संसर्गजन्य परिस्थितीमुळे लग्न पुढे ढकलावे लागल्यामुळे जोडप्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तुम्ही आहात तिथे सुरक्षित राहा, आम्ही थोडक्यात लग्न उरकून घेतो, नंतर जोडीने येतील तुमच्याकडे असे निरोप पै-पाहुणे, मित्रमंडळी यांना मिळत आहेत.

(चौकट)

कारवाईपेक्षा कोरोनाची भीती.....

लग्नसोहळ्यामध्ये नियम न पाळल्यास कारवाई होईल, या भीतीपेक्षाही ग्रामीण भागात आता कोरोनाची भीती जास्त असल्याने नियमांचे पालन करूनच लग्नसोहळ्याचे आयोजन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षभरापासून विवाह सोहळ्यातून काही ठिकाणी संसर्ग अधिक बळावला असल्याचेही पाहावयास मिळाले आहे.