शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

कोरोनामुळे लग्नाला येऊ नका म्हणण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST

रशिद शेख औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार ...

रशिद शेख

औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार पडत नव्हता; मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, हे आपल्या पै-पाहुणे, मित्रमंडळींना फोन करून सांगत आहेत की लग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्यातच उरकणार आहे. त्यामुळे आता लग्नही बोटावर मोजता येतील अशा लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत, तर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत.

सद्य:स्थितीत गेल्या वर्षीपेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक जास्त प्रमाणात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये, वाडी-वस्तीमध्ये कोरोना जाऊन पोहोचला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी पन्नास लोकांची परवानगी काढून लग्नसोहळे केले जात होते. त्यावेळी जास्त संसर्ग नसल्याने पन्नासऐवजी दोनशे-तीनशे लोक उपस्थित राहत होते. परंतु, आता प्रशासनाने दोन्हीकडील मिळून २५ लोकांना परवानगी दिली आहे. मात्र, ती परवानगी काढताना उपस्थित २५ लोकांचे नाव, पत्ता, फोन नंबर, वय ही माहिती भरणे महत्त्वाचे केले आहे. तसेच आचारी, भटजी यांचे कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र व विवाह सोहळा दोन तासांच्या आत पूर्ण करणे या अटी व शर्ती बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत.

सध्याची अनिश्चतता, एकूणच कठीण परिस्थिती पाहता कुटुंबीयांसोबत सुरक्षित अंतर ठेवून बोहल्यावर चढण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे, तर संसर्गजन्य परिस्थितीमुळे लग्न पुढे ढकलावे लागल्यामुळे जोडप्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तुम्ही आहात तिथे सुरक्षित राहा, आम्ही थोडक्यात लग्न उरकून घेतो, नंतर जोडीने येतील तुमच्याकडे असे निरोप पै-पाहुणे, मित्रमंडळी यांना मिळत आहेत.

(चौकट)

कारवाईपेक्षा कोरोनाची भीती.....

लग्नसोहळ्यामध्ये नियम न पाळल्यास कारवाई होईल, या भीतीपेक्षाही ग्रामीण भागात आता कोरोनाची भीती जास्त असल्याने नियमांचे पालन करूनच लग्नसोहळ्याचे आयोजन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षभरापासून विवाह सोहळ्यातून काही ठिकाणी संसर्ग अधिक बळावला असल्याचेही पाहावयास मिळाले आहे.