शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

कोरोनामुळे लग्नाला येऊ नका म्हणण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST

रशिद शेख औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार ...

रशिद शेख

औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार पडत नव्हता; मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, हे आपल्या पै-पाहुणे, मित्रमंडळींना फोन करून सांगत आहेत की लग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्यातच उरकणार आहे. त्यामुळे आता लग्नही बोटावर मोजता येतील अशा लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत, तर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत.

सद्य:स्थितीत गेल्या वर्षीपेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक जास्त प्रमाणात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये, वाडी-वस्तीमध्ये कोरोना जाऊन पोहोचला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी पन्नास लोकांची परवानगी काढून लग्नसोहळे केले जात होते. त्यावेळी जास्त संसर्ग नसल्याने पन्नासऐवजी दोनशे-तीनशे लोक उपस्थित राहत होते. परंतु, आता प्रशासनाने दोन्हीकडील मिळून २५ लोकांना परवानगी दिली आहे. मात्र, ती परवानगी काढताना उपस्थित २५ लोकांचे नाव, पत्ता, फोन नंबर, वय ही माहिती भरणे महत्त्वाचे केले आहे. तसेच आचारी, भटजी यांचे कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र व विवाह सोहळा दोन तासांच्या आत पूर्ण करणे या अटी व शर्ती बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत.

सध्याची अनिश्चतता, एकूणच कठीण परिस्थिती पाहता कुटुंबीयांसोबत सुरक्षित अंतर ठेवून बोहल्यावर चढण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे, तर संसर्गजन्य परिस्थितीमुळे लग्न पुढे ढकलावे लागल्यामुळे जोडप्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तुम्ही आहात तिथे सुरक्षित राहा, आम्ही थोडक्यात लग्न उरकून घेतो, नंतर जोडीने येतील तुमच्याकडे असे निरोप पै-पाहुणे, मित्रमंडळी यांना मिळत आहेत.

(चौकट)

कारवाईपेक्षा कोरोनाची भीती.....

लग्नसोहळ्यामध्ये नियम न पाळल्यास कारवाई होईल, या भीतीपेक्षाही ग्रामीण भागात आता कोरोनाची भीती जास्त असल्याने नियमांचे पालन करूनच लग्नसोहळ्याचे आयोजन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षभरापासून विवाह सोहळ्यातून काही ठिकाणी संसर्ग अधिक बळावला असल्याचेही पाहावयास मिळाले आहे.