शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लग्नाला येऊ नका म्हणण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST

रशिद शेख औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार ...

रशिद शेख

औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार पडत नव्हता; मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, हे आपल्या पै-पाहुणे, मित्रमंडळींना फोन करून सांगत आहेत की लग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्यातच उरकणार आहे. त्यामुळे आता लग्नही बोटावर मोजता येतील अशा लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत, तर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत.

सद्य:स्थितीत गेल्या वर्षीपेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक जास्त प्रमाणात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये, वाडी-वस्तीमध्ये कोरोना जाऊन पोहोचला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी पन्नास लोकांची परवानगी काढून लग्नसोहळे केले जात होते. त्यावेळी जास्त संसर्ग नसल्याने पन्नासऐवजी दोनशे-तीनशे लोक उपस्थित राहत होते. परंतु, आता प्रशासनाने दोन्हीकडील मिळून २५ लोकांना परवानगी दिली आहे. मात्र, ती परवानगी काढताना उपस्थित २५ लोकांचे नाव, पत्ता, फोन नंबर, वय ही माहिती भरणे महत्त्वाचे केले आहे. तसेच आचारी, भटजी यांचे कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र व विवाह सोहळा दोन तासांच्या आत पूर्ण करणे या अटी व शर्ती बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत.

सध्याची अनिश्चतता, एकूणच कठीण परिस्थिती पाहता कुटुंबीयांसोबत सुरक्षित अंतर ठेवून बोहल्यावर चढण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे, तर संसर्गजन्य परिस्थितीमुळे लग्न पुढे ढकलावे लागल्यामुळे जोडप्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तुम्ही आहात तिथे सुरक्षित राहा, आम्ही थोडक्यात लग्न उरकून घेतो, नंतर जोडीने येतील तुमच्याकडे असे निरोप पै-पाहुणे, मित्रमंडळी यांना मिळत आहेत.

(चौकट)

कारवाईपेक्षा कोरोनाची भीती.....

लग्नसोहळ्यामध्ये नियम न पाळल्यास कारवाई होईल, या भीतीपेक्षाही ग्रामीण भागात आता कोरोनाची भीती जास्त असल्याने नियमांचे पालन करूनच लग्नसोहळ्याचे आयोजन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षभरापासून विवाह सोहळ्यातून काही ठिकाणी संसर्ग अधिक बळावला असल्याचेही पाहावयास मिळाले आहे.