शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘दादां’वर शिक्कामोर्तब,‘आबां’वर चिंतनाची वेळ!

By admin | Updated: February 24, 2016 00:27 IST

कऱ्हाड दक्षिणचं राजकारण : अविनाश मोहितेंची ‘नवी इनिंग’ सुरू

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही म्हणे ! त्याला ‘राष्ट्रवादी’चे घड्याळ तरी कसे अपवाद असणार? म्हणून तर स्वत: थोरल्या पवारांनी दक्षिणच्या घड्याळाचे काटे चक्क अविनाश मोहितेंच्या हातात दिले. वाठारमध्ये हजारोंच्या उपस्थितीत या घड्याळाला चावीपण दिली. ‘इजा बिजा तिजा’ सांगत मोहितेंच्या नेतृत्वावर त्यांनी ‘शिक्कामोर्तब’ केले. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून किंबहुना त्यापूर्वीपासून पवार घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या वाठारकर गटावर, राजेश पाटील आबांवर आत्मचिंतनाची वेळ आली, हे निश्चित.सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून कऱ्हाडची ओळख आहे. कऱ्हाड दक्षिण अन् उत्तर असे दोन विधानसभा मतदार संघ असल्याने जिल्ह्याच्या राजकारणातही कऱ्हाडला नेहमीच महत्त्व राहिले आहे. कऱ्हाड दक्षिण मतदार संघावर आजपर्यंत काँगे्रस विचाराचाच पगडा राहिला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनीच या मतदार संघाचे प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या मतदार संघाचे तिसरे आमदार आहेत.दिवंगत यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र समजल्या जाणाऱ्या शरद पवारांनी सुरुवातीला काँग्रेसशी फारकत घेत समाजवादी काँगे्रस पक्षाची स्थापना केली. पुन्हा काँग्रेसमध्ये गेले अन् विदेशी नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित करीत पुन्हा त्यांचा राष्ट्रवाद जागा झाला. अन् राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना झाली.या प्रत्येकवेळी शरद पवारांच्या आदेशाची वाट न पाहता विलासराव पाटील-वाठारकरांनी दक्षिणेत पवारांचे विचार रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. समाजवादी काँगे्रसचा ‘चरखा’ त्यांनीच दक्षिणेत फिरविला तर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनीच जबाबदारी स्वीकारली. कऱ्हाड दक्षिणेत प्रस्थापित उंडाळकरांविरोधात नेहमीच वाठारकर दंड थोपटत गेले. त्याला नेत्यांचं ‘बळ’ किती मिळालं अन् त्या साऱ्यांचे वाठारकरांना ‘फळ’ काय मिळालं हा चिंतनाचाच विषय.विलासराव पाटील-वाठारकरांच्या निधनानंतर राजेश पाटील-वाठारकर त्यांचा वारसा चालवितायत म्हणे ! बापूंच्या पश्चात जनता बँकेची पहिली निवडणूक बिनविरोध करतानाही त्यांना अनेकांच्या नाकदुरी काढाव्या लागल्या. एका ‘राजेंद्र’च्या अर्ज माघारीसाठी कऱ्हाडातील ‘राजेंद्र’ मेहरबानांच्या माध्यमातून सातारच्या थोरल्या ‘राजें’पर्यंत प्रकरण पोहोचलं तेव्हा कुठ यश आलं म्हणे; पण धुसपूस मात्र संपलेली दिसत नाही. हे झालं जनता उद्योग समूहाचं. मात्र, कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणासाठी आणि पक्षासाठी आबा किती वेळ देतात हा दस्तुरखुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनाच पडलेला प्रश्न आहे. त्यामुळेच की काय ? शरद पवारांच्या वाठारच्या सभेत अनेक नेत्यांनी विलासराव पाटील-वाठारकरांच्या पश्चात कऱ्हाड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीची स्थिती कमकूवत झाली होती. ती मजबूत व्हायला अविनाश मोहितेंची मदत होईल असा सूर आळविला. यातून राजेश पाटलांनी काय संदेश घ्यायचा तो घेतलेला बरा!वाठारकरांचे पाहुणे असणाऱ्या उत्तरच्या आमदारांनी दक्षिणेत राष्ट्रवादी मजबूत करण्याचा सध्या ‘विडा’ उचललाय म्हणतात. पक्षाच्या दृष्टिने ही बाब चांगलीच आहे; पण यापूर्वी त्यांनी घेतलेल्या भूमिकांच ‘उत्तर’ मूळच्या दक्षिणमधील राष्ट्रवादी जनतेला सापडेनासे झालेय.राजेश पाटील वाठारकरांनी त्याचा ‘शोध’ घेतला. तर त्यातून त्यांना ‘बोध’ ही निश्चित घेता येईल. अन् त्यातून वेळ मिळालाच तर आबा नक्कीच आत्मचिंतन करतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. कारण फक्त कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करून अथवा काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी धडपड करून उपयोग तो काय?पद्वीधरची उमेदवारी पण...राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने पुणे पद्वीधर मतदार संघासाठी सन २००८ मध्ये राजेश पाटील-वाठारकरांना उमेदवारी दिली गेली. वाठारकर आमदार होणार अशी कार्यकर्त्यांची धारणा झाली; पण ‘दादां’च्या पुण्यातच राष्ट्रवादी ‘उणे’ पडली. तर सांगलीतल्या राष्ट्रवादी नेत्यांनी भलत्याच उमेदवारांचे ‘लाड’ पुरविले. त्यामुळे वाठारकरांच्या पदरात यश पडलेच नाही. त्यांनी पुन्हा तयारी सुरूच ठेवली; पण २०१४ मध्ये ही उमेदवारी कऱ्हाडच्या सारंग पाटलांना मिळाली.