शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

कोरोनामुळे घडशी समाजावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST

फलटण : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी ...

फलटण : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी समाज असून, सध्या कोरोनामुळे आमच्या समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी केली आहे.

पूर्वीपासून देवस्थानांमध्ये सनई-चौघडा, नगारा वाजवणे, लग्न समारंभामध्ये सनईवादन बँड, बेंजो, मावळा ग्रुप यासारखी कामे करणे फुलांचे हार बनविणे या व्यवसायावर आमच्या समाजाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र सध्या सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून, आमच्या समाजातील अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे राज्य सरकार व सर्वच समाजातील दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत करून दिलासा द्यावा, असे पवार यांनी सांगितले. पूर्वीपासूनच गरिबीत जीवन जगणारा हा समाज भूमिहीन आहे. त्यामुळे वरील व्यवसायावरच कसेबसे जीवन जगतो व या व्यवसायावर अवलंबून असतो. समाजात दररोज रोजी-रोटीचा प्रश्न असल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक सरकारी, खासगी नोकऱ्यांमध्ये आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे कोणताही व्यवसाय चालला नाही. सरकारी कोणतीही मदत समाजाला मिळाली नाही. भूमी नाही, शिक्षणाची इच्छा असून, घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे शिक्षणाचा अभाव, त्यामुळे सरकारी बँकेचे लोन व्यवसायाला मिळत नाही. मग या स्पर्धेच्या युगात टिकून राहून व्यवसाय चालावे, यासाठी खासगी कर्ज काढून वरील व्यवसायात गुंतवणूक केली. कोरोनामुळे ते कर्जही फिटले नाही. जवळची जी काही थोडी पुंजी होती, तिची मोडतोड करून कसंतरी जीवन जगावं लागलं. व्यवसाय ठप्प असल्याने मुलांच्या शिक्षणाच्या फीसाठीसुद्धा खूपच तारांबळ झाली. कसंतरी आत्तापर्यंत कुटुंब जगवलं. शहरातील समाजबांधवांचे तर खूपच हाल झाले. पुढे चांगले दिवस येतील, ही आशा घेऊन कसंतरी दिवस ढकलले; परंतु याहीवर्षी कोरोनाने डोकं वर काढलं आणि समाज पुरता कोलमडून पडला असून, सलग दोन वर्षे कोरोनाने सगळंच ठप्प झालं आहे.

इथून पुढे कसं जगायचं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट..

समाजातील एकही शासनात पदाधिकारी नाही. त्यामुळे आमच्या समाजाची दखल घेतली जात नाही, अशी खंत अनिल पवार यांनी बोलून दाखवली. शासनाकडून समाज दुर्लक्षित आहे. गेली दोन वर्षे कसेबसे जीवन जगत आहे. प्रचंड ओढाताण, हाल-अपेष्टा हा समाज भोगत आहे. तरी शासनाला विनंती आहे की, समाजाची दखल घेऊन समाजाला दानशूर व्यक्तींना काहीतरी मदत करावी.

- अनिल पवार, प्रदेशाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज