शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे घडशी समाजावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST

फलटण : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी ...

फलटण : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी समाज असून, सध्या कोरोनामुळे आमच्या समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी केली आहे.

पूर्वीपासून देवस्थानांमध्ये सनई-चौघडा, नगारा वाजवणे, लग्न समारंभामध्ये सनईवादन बँड, बेंजो, मावळा ग्रुप यासारखी कामे करणे फुलांचे हार बनविणे या व्यवसायावर आमच्या समाजाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र सध्या सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून, आमच्या समाजातील अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे राज्य सरकार व सर्वच समाजातील दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत करून दिलासा द्यावा, असे पवार यांनी सांगितले. पूर्वीपासूनच गरिबीत जीवन जगणारा हा समाज भूमिहीन आहे. त्यामुळे वरील व्यवसायावरच कसेबसे जीवन जगतो व या व्यवसायावर अवलंबून असतो. समाजात दररोज रोजी-रोटीचा प्रश्न असल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक सरकारी, खासगी नोकऱ्यांमध्ये आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे कोणताही व्यवसाय चालला नाही. सरकारी कोणतीही मदत समाजाला मिळाली नाही. भूमी नाही, शिक्षणाची इच्छा असून, घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे शिक्षणाचा अभाव, त्यामुळे सरकारी बँकेचे लोन व्यवसायाला मिळत नाही. मग या स्पर्धेच्या युगात टिकून राहून व्यवसाय चालावे, यासाठी खासगी कर्ज काढून वरील व्यवसायात गुंतवणूक केली. कोरोनामुळे ते कर्जही फिटले नाही. जवळची जी काही थोडी पुंजी होती, तिची मोडतोड करून कसंतरी जीवन जगावं लागलं. व्यवसाय ठप्प असल्याने मुलांच्या शिक्षणाच्या फीसाठीसुद्धा खूपच तारांबळ झाली. कसंतरी आत्तापर्यंत कुटुंब जगवलं. शहरातील समाजबांधवांचे तर खूपच हाल झाले. पुढे चांगले दिवस येतील, ही आशा घेऊन कसंतरी दिवस ढकलले; परंतु याहीवर्षी कोरोनाने डोकं वर काढलं आणि समाज पुरता कोलमडून पडला असून, सलग दोन वर्षे कोरोनाने सगळंच ठप्प झालं आहे.

इथून पुढे कसं जगायचं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट..

समाजातील एकही शासनात पदाधिकारी नाही. त्यामुळे आमच्या समाजाची दखल घेतली जात नाही, अशी खंत अनिल पवार यांनी बोलून दाखवली. शासनाकडून समाज दुर्लक्षित आहे. गेली दोन वर्षे कसेबसे जीवन जगत आहे. प्रचंड ओढाताण, हाल-अपेष्टा हा समाज भोगत आहे. तरी शासनाला विनंती आहे की, समाजाची दखल घेऊन समाजाला दानशूर व्यक्तींना काहीतरी मदत करावी.

- अनिल पवार, प्रदेशाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज