शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

घरगुती पीठगिरणी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

चाफळ : वाढत्या घरगुती घरघंटीमुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या पिठाच्या गिरण्यांना अखेरची घरघर लागली आहे. प्रत्येकाच्या घरात घरगुती ...

चाफळ : वाढत्या घरगुती घरघंटीमुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या पिठाच्या गिरण्यांना अखेरची घरघर लागली आहे. प्रत्येकाच्या घरात घरगुती पिठाच्या घरघंटी आल्यामुळे मोठ्या पीठगिरणी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अलीकडच्या आधुनिक व धावपळीच्या या काळात नवनवीन तंत्राचा वापर वाढू लागला आहे. त्यानुसार, लोकही ते आत्मसात करत आहेत. पूर्वी गिरणी व्यवसाय हा फायदेशीर मानला जात होता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता किमान दोन लाख रुपये भांडवलाची आवश्यकता भासते. एवढे भांडवल घालून फायद्याची खात्री नसते. कारण लोकांचा घरगुती आटाचक्की खरेदीकडे कल वाढू लागला आहे. या घरगुती आटाचक्क्या बाजारात सात हजारांपासून पंधरा हजारांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे घरोघरी या गिरण्या पाहायला मिळत आहेत. परिणामी, मोठ्या गिरणीकडे दळण दळण्यासाठी येणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. व्यवसाय होत नसल्याने अनेकांना गिरणीचे वीजबिल भरणेही मुश्किल झाले आहे. परिणामी, काहींनी तर आपले व्यवसायही बंद केले आहेत. व्यावसायिक गिरणीचे दळण दळण्याचे दर ग्रामीण पंधरा रुपये पायली, तर शहरीसाठी २५ रुपये पायली असे आहेत, तसेच यामध्ये नैसर्गिक पद्धतीने दळण दळले जाते. या गिरणीमध्ये दगडी जाते असल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो व भाकरी चपाती दर्जेदार बनते, तसेच ती आरोग्यास उत्तम असते, परंतु आत्ताच्या धावपळीच्या युगात घराबाहेर जाऊन दळण दळणे हे लोकांना त्रासाचे वाटत आहे.

चौकट..

गिरण्या नामशेष होणार का?

वेळ खर्च होतो आहे. परिणामी, वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी, तसेच घरीच गिरण घेऊन बिना कटकटीचे दळण दळण्यास त्यांच्याकडून अधिक पसंती दिली जाते आहे. त्यामुळे व्यावसायिक गिरण्या नामशेष होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. घरगुती गिरणीमुळे मोठे गिरणी व्यवसाय आता तोट्यात चालले आहेत.

कोट..

ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे पहिल्यासारखा आता व्यवसाय होत नाही. त्यामुळे वीजबिल भरणे ही कठीण झाले आहे. हळूहळू बेकारीची कुऱ्हाड आमच्यावर कोसळते की असे वाटू लागले आहे.

- शशिकांत माने, गिरणी व्यावसायिक, चाफळ