शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती पीठगिरणी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

चाफळ : वाढत्या घरगुती घरघंटीमुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या पिठाच्या गिरण्यांना अखेरची घरघर लागली आहे. प्रत्येकाच्या घरात घरगुती ...

चाफळ : वाढत्या घरगुती घरघंटीमुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या पिठाच्या गिरण्यांना अखेरची घरघर लागली आहे. प्रत्येकाच्या घरात घरगुती पिठाच्या घरघंटी आल्यामुळे मोठ्या पीठगिरणी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अलीकडच्या आधुनिक व धावपळीच्या या काळात नवनवीन तंत्राचा वापर वाढू लागला आहे. त्यानुसार, लोकही ते आत्मसात करत आहेत. पूर्वी गिरणी व्यवसाय हा फायदेशीर मानला जात होता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता किमान दोन लाख रुपये भांडवलाची आवश्यकता भासते. एवढे भांडवल घालून फायद्याची खात्री नसते. कारण लोकांचा घरगुती आटाचक्की खरेदीकडे कल वाढू लागला आहे. या घरगुती आटाचक्क्या बाजारात सात हजारांपासून पंधरा हजारांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे घरोघरी या गिरण्या पाहायला मिळत आहेत. परिणामी, मोठ्या गिरणीकडे दळण दळण्यासाठी येणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. व्यवसाय होत नसल्याने अनेकांना गिरणीचे वीजबिल भरणेही मुश्किल झाले आहे. परिणामी, काहींनी तर आपले व्यवसायही बंद केले आहेत. व्यावसायिक गिरणीचे दळण दळण्याचे दर ग्रामीण पंधरा रुपये पायली, तर शहरीसाठी २५ रुपये पायली असे आहेत, तसेच यामध्ये नैसर्गिक पद्धतीने दळण दळले जाते. या गिरणीमध्ये दगडी जाते असल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो व भाकरी चपाती दर्जेदार बनते, तसेच ती आरोग्यास उत्तम असते, परंतु आत्ताच्या धावपळीच्या युगात घराबाहेर जाऊन दळण दळणे हे लोकांना त्रासाचे वाटत आहे.

चौकट..

गिरण्या नामशेष होणार का?

वेळ खर्च होतो आहे. परिणामी, वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी, तसेच घरीच गिरण घेऊन बिना कटकटीचे दळण दळण्यास त्यांच्याकडून अधिक पसंती दिली जाते आहे. त्यामुळे व्यावसायिक गिरण्या नामशेष होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. घरगुती गिरणीमुळे मोठे गिरणी व्यवसाय आता तोट्यात चालले आहेत.

कोट..

ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे पहिल्यासारखा आता व्यवसाय होत नाही. त्यामुळे वीजबिल भरणे ही कठीण झाले आहे. हळूहळू बेकारीची कुऱ्हाड आमच्यावर कोसळते की असे वाटू लागले आहे.

- शशिकांत माने, गिरणी व्यावसायिक, चाफळ