शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पावरून पाटणमध्ये जुंपली!

By admin | Updated: May 25, 2015 00:36 IST

जनता संभ्रमात : दोन्ही नेत्यांच्या कोयनानगरला वाऱ्या

अरुण पवार- पाटण -सन १९८५ मध्ये कोयना व चांदोली अभयारण्यांची अधिसूचना निघाली. तेव्हा पाटणच्या वन्यप्राण्यांचा व वनविभागाचा त्रास होत आहे, अशी कोणतीही प्रतिक्रिया उमटत नव्हती. मात्र, या दोन्ही अभयारण्यांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतोय याची चाहूल लागताच पाटणच्या विशेषत: कोयना विभागातील जनतेच्या मनावर विरोधाची सल उभी राहिली. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनवरून पाटणचे आजी-माजी आमदार एकमेकांवर आरोप करण्यात मग्न असून, या दोन्ही नेत्यांचा सभा कोयनानगर येथे सतत सुरू आहेत. त्यामुळे नक्की कोणाचे ऐकायचे, या संभ्रमात कोयना विभागातील जनता आहे.‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती आमदार आणि मंत्री असताना झाली. त्यावेळी पाटणकरांनी विरोध का केला नाही. आता मात्र विरोधाचा पुळका दाखवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविळवाणा प्रयत्न पाटणकर करीत आहेत, असा आरोप शंभूराज देसाई करत आहेत,’ असे विक्रमसिंह पाटणकर एकीकडे सांगत आहेत. त्यावर आक्रमक होऊन मी सातारा येथे राहत असलो तरी पाटणची जनता माझ्या ह्दयात आहे. मी जनतेची किती कामे केली हे १९ हजारांच्या मताधिक्याने निवडून देणाऱ्या जनतेला ज्ञात आहे. तुम्ही पाटणच्या जनतेला किती त्रास दिला किंवा पाटणमध्ये राहून जनतेचा त्रास किती कमी केला याचे उत्तर आमने-सामने येऊन द्यावे, असे आवाहन शंभूराज देसार्इंनी केले आहे.त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावरून आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे पाटणच्या जनतेची दोन्ही नेते एकप्रकारे करमणूक करत आहेत, अशीच चर्चा सुरू आहे.कौन सच्चा.. कौन झुठा ?कोयना भूकंप पुनर्वसन निधी, भूकंपग्रस्तांना दाखले मिळण्याबाबतचा न्यायालयाचा निकाल असो किंवा एकाच कामाची दोन भूमिपूजने, उद्घाटन असो. याबाबत पाटण तालुक्यात विक्रमसिंह पाटणकर व शंभूराज देसाई हे दोन्ही नेते चर्चेत आहेत. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा वाद व श्रेयवाद सुरू आहे. याचा निर्णय काय होतो आणि पाटणच्या जनतेचे समाधान कोण करते? किंवा व्याघ्र प्रकल्पातील जाचक अटीतून जनतेची सुटका कोण करणार? हे आगामी काळात समजणार आहे.