शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पोस्टमनच्या माध्यमातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

टपाल कार्यालयाची विशेष मोहीम लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आपल्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा असलेल्या आधार कार्डला आपला मोबाईल क्रमांक ...

टपाल कार्यालयाची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : आपल्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा असलेल्या आधार कार्डला आपला मोबाईल क्रमांक आता घरबसल्या लिंक करता येणार आहे. यासाठी टपाल कार्यालयाकडून जिल्ह्यात दि. २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आधार आणि मोबाईल लिंकिंग मोहीम राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे टपाल कार्यालयासह पोस्टमनकडून ही सेवा घरपोच उपलब्ध केली जाणार आहे.

आधार कार्ड हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचं ओळखपत्र आहे. अगदी सीमकार्डपासून ते घर घेण्यापर्यंत आधार कार्डची गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड लागतंच. आधार कार्डची ओळख झाल्यापासून त्यात अनेक बदल झाले. त्याचप्रमाणे आधारला मोबाईल क्रमांक लिंक करणे बंधनकारक करण्यात आले. आधारला मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना काढताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे टपाल कार्यालयाने जिल्ह्यात दि. २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आधार आणि मोबाईल लिंकिंग मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे.

आधार लिंकिंग जवळच्या टपाल कार्यालयात केले जाणार आहे. शिवाय पोस्टमनच्या माध्यमातूनही ही सेवा घरपोच उपलब्ध केली जाणार आहे. ज्या नागरिकांनी आपला मोबाईल आधारला लिंक केलेला नाही असे नागरिक, सोसायटीमधील रहिवासी यांनी एकत्रितपणे या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा टपाल विभागाच्या प्रवर अधीक्षक अपराजिता मिश्रा यांनी केले आहे.