शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

जावलीतील तीन गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:37 IST

बामणोली : राज्यात आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय खेडोपाडी पसरायला सुरुवात केली असली तरी जावली तालुक्यातील दुर्गम ...

बामणोली : राज्यात आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय खेडोपाडी पसरायला सुरुवात केली असली तरी जावली तालुक्यातील दुर्गम विभागातील कोळघर, कारगाव व गोंदेमाळ या गावात गेल्या वर्षीपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. ही तिन्ही गावे अभिनंदनास पात्र असून, गावाची एकी, मास्कचा वापर, वेळोवेळी औषध फवारणी, शासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून सक्षम ग्रामसमिती आणि ग्रामसेवक यांनी एकत्रित कामाचा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवला आहे.

सातारा जिल्ह्यातील दररोजची कोरोना रुग्णांची आकडेवारी ऐकल्यावर धडकी भरतेय. मात्र, काही सकारात्मक कानावर पडल्यावर मनाला शांती लाभत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खेडेगावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, जावली तालुक्यातील कोळघर, कारगाव व गोंदेमाळ गावातील ग्रामस्थांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कोरोनाला आपले खाते उघडता आले नाही. कमी लोकसंख्येची ही गावे आहेत. मात्र, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरीय समिती आणि ग्रामसेवक यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आपला गाव आणि गावातील प्रत्येक माणूस कोरोनापासून चार हात लांब ठेवला आहे.

या तिन्ही गावांतील ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळींचे मोठे सहकार्य यासाठी लाभले आहे. गतवर्षीपासून जसा कोरोना सुरू झाला, तसे या गावांनी कडक नियम लावून त्याचे पालन करून दाखवले आहे. गावात येणाऱ्याला चौदा दिवस विलगीकरणात ठेवले जात होते. कोरोना चाचणी करून मगच गावात घेतले जात होते. विलगीकरणातील कुटुंबाला रेशन, तरकारी घरपोच पुरवली जात होती. वेळोवेळी गावात औषध फवारणी करण्यात आली. प्रत्येक घरात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले, मास्कचा काटेकोरपणे वापर केला गेला, लग्न सोहळे फक्त दहा ते वीस माणसातच उरकण्यात आले. सामाजिक अंतर प्रत्येकाने पाळले. त्यामुळे या तिन्ही गावात कोरोनाने अद्याप शिरकाव केलेला नाही.

कोट :

गावचे सरपंच सुमन शिंदे, सदस्य व ग्रामस्तरीय समिती यांनी खूप चांगले काम केले. ग्रामस्थांनीही आम्हाला सहकार्य केले. गावातील पंचेचाळीस वर्षांच्या सर्व नागरिकांचे शंभर टक्के आम्ही लसीकरण करून घेतले आहे. सांघिक प्रयत्नांमुळे आम्ही कोरोनाला गावाबाहेर ठेवण्यात यशस्वी झालो.

- राजेंद्र राऊत, ग्रामसेवक, कोळघर, ता. जावली

कोट :

गावात कोरोना येऊच द्यायचा नाही, असा आम्ही चंग बांधला होता. नियमित औषध फवारणी केली. मास्कचा वापर केला. मुंबईकर गावात आला तर विलगीकरण करून नंतर टेस्ट करूनच गावात घेतले जात होते. गावाने एकीचे बळ दाखवले म्हणून आमचे गाव कोरोनापासून सुरक्षित राहिले.

- सुमन शिंदे, सरपंच, कोळघर, ता. जावली

कोट : मुळात आमचे गाव एकदम दुर्गम विभागात आहे. गावातील माणसांचा बाहेरच्या जगाशी खूप कमी संपर्क येतो. मुंबईकर गेल्या वर्षी आले होते. त्यांना विलगीकरणात ठेवले होते. यावर्षी आलेच नाहीत. गावात कोणाचे येणे-जाणे नाही. तरीही नागरिक सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत आहेत.

- संदीप लोखंडे, ग्रामसेवक, कारगाव, ता. जावली

लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी