शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जावलीतील तीन गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:37 IST

बामणोली : राज्यात आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय खेडोपाडी पसरायला सुरुवात केली असली तरी जावली तालुक्यातील दुर्गम ...

बामणोली : राज्यात आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय खेडोपाडी पसरायला सुरुवात केली असली तरी जावली तालुक्यातील दुर्गम विभागातील कोळघर, कारगाव व गोंदेमाळ या गावात गेल्या वर्षीपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. ही तिन्ही गावे अभिनंदनास पात्र असून, गावाची एकी, मास्कचा वापर, वेळोवेळी औषध फवारणी, शासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून सक्षम ग्रामसमिती आणि ग्रामसेवक यांनी एकत्रित कामाचा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवला आहे.

सातारा जिल्ह्यातील दररोजची कोरोना रुग्णांची आकडेवारी ऐकल्यावर धडकी भरतेय. मात्र, काही सकारात्मक कानावर पडल्यावर मनाला शांती लाभत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खेडेगावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, जावली तालुक्यातील कोळघर, कारगाव व गोंदेमाळ गावातील ग्रामस्थांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कोरोनाला आपले खाते उघडता आले नाही. कमी लोकसंख्येची ही गावे आहेत. मात्र, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरीय समिती आणि ग्रामसेवक यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आपला गाव आणि गावातील प्रत्येक माणूस कोरोनापासून चार हात लांब ठेवला आहे.

या तिन्ही गावांतील ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळींचे मोठे सहकार्य यासाठी लाभले आहे. गतवर्षीपासून जसा कोरोना सुरू झाला, तसे या गावांनी कडक नियम लावून त्याचे पालन करून दाखवले आहे. गावात येणाऱ्याला चौदा दिवस विलगीकरणात ठेवले जात होते. कोरोना चाचणी करून मगच गावात घेतले जात होते. विलगीकरणातील कुटुंबाला रेशन, तरकारी घरपोच पुरवली जात होती. वेळोवेळी गावात औषध फवारणी करण्यात आली. प्रत्येक घरात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले, मास्कचा काटेकोरपणे वापर केला गेला, लग्न सोहळे फक्त दहा ते वीस माणसातच उरकण्यात आले. सामाजिक अंतर प्रत्येकाने पाळले. त्यामुळे या तिन्ही गावात कोरोनाने अद्याप शिरकाव केलेला नाही.

कोट :

गावचे सरपंच सुमन शिंदे, सदस्य व ग्रामस्तरीय समिती यांनी खूप चांगले काम केले. ग्रामस्थांनीही आम्हाला सहकार्य केले. गावातील पंचेचाळीस वर्षांच्या सर्व नागरिकांचे शंभर टक्के आम्ही लसीकरण करून घेतले आहे. सांघिक प्रयत्नांमुळे आम्ही कोरोनाला गावाबाहेर ठेवण्यात यशस्वी झालो.

- राजेंद्र राऊत, ग्रामसेवक, कोळघर, ता. जावली

कोट :

गावात कोरोना येऊच द्यायचा नाही, असा आम्ही चंग बांधला होता. नियमित औषध फवारणी केली. मास्कचा वापर केला. मुंबईकर गावात आला तर विलगीकरण करून नंतर टेस्ट करूनच गावात घेतले जात होते. गावाने एकीचे बळ दाखवले म्हणून आमचे गाव कोरोनापासून सुरक्षित राहिले.

- सुमन शिंदे, सरपंच, कोळघर, ता. जावली

कोट : मुळात आमचे गाव एकदम दुर्गम विभागात आहे. गावातील माणसांचा बाहेरच्या जगाशी खूप कमी संपर्क येतो. मुंबईकर गेल्या वर्षी आले होते. त्यांना विलगीकरणात ठेवले होते. यावर्षी आलेच नाहीत. गावात कोणाचे येणे-जाणे नाही. तरीही नागरिक सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत आहेत.

- संदीप लोखंडे, ग्रामसेवक, कारगाव, ता. जावली

लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी