शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटीं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटींना, तर ठाणे-भिवंडी या आठपदरी बायपास रस्त्याच्या एक हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. महिन्यात निविदा व तीन महिन्यांच्या आत हे काम सुरू करण्याचे ...

ठळक मुद्देस्ते व परिवहनविषयक कामांबाबत आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटींना, तर ठाणे-भिवंडी या आठपदरी बायपास रस्त्याच्या एक हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. महिन्यात निविदा व तीन महिन्यांच्या आत हे काम सुरू करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले.परिवहन भवन येथे गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते व परिवहनविषयक कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर श्री. गडकरी यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. बैठकीस महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, राज्यातील खासदार संजय धोत्रे, धनंजय महाडिक, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि केंद्रीय रस्तेवाहतूक विभागाचे सचिव युधवीरसिंह मलिक तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील रस्त्यांच्या ३० हजार कोटींच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मुख्यत्वे सातारा-कागल (कोल्हापूर) हा चौपदरी रस्ता सहापदरी करण्यात येणार असून, या संदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात तांत्रिक बाबींमध्ये असलेली विसंगती दूर करण्यात आली. या रस्त्याच्या बांधकामासाठी तीन हजार कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. येत्या एक महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येतील आणि तीन महिन्यांत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.----- बास्केट ब्रीजचे काम सुरु करा : महाडिकया बैठकीत कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बास्केट ब्रीजची बांधणी तातडीने सुरु करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. नागपूर-रत्नागिरी महामार्ग कोल्हापूर शहरातून प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येईल. त्यासाठी शिरोली नाका ते शिवाजी पुल या मार्गावर नवीन उड्डाण पूल उभारण्यात यावा असेही महाडिक यांनी सुचविले.