शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशभंगप्रकरणी तीन दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

महाबळेश्वर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शहरात कारवाई केली. यामध्ये मंगळवारी तीन दुकाने सील केली ...

महाबळेश्वर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शहरात कारवाई केली. यामध्ये मंगळवारी तीन दुकाने सील केली आहेत. दरम्यान आजअखेर दंडात्मक कारवाई करून पालिकेने दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनमध्ये दुकाने सुरू ठेवण्यास मनाई केली असताना बाजारपेठेतील काही दुकाने व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. या तक्रारींची मुख्याधिकारी यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी विशेष पथकासह महाबळेश्वर बाजारपेठेची पाहणी केली असता मंगळवारी सुभाष चैकातील ऑर्चिड माॅलमधील काही दुकाने अर्धवट उघडी होती. तर एका दुकानात ग्राहक आढळून आले. या माॅलमधील मोबाइल विक्री व दुरुस्ती, एक भांड्याचे व एक कपड्याचे दुकान अर्धवट स्थितीत आढळून आले. ज्या दुकानात ग्राहक आढळून आले. त्या दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली व माॅलमधील ती तीनही दुकाने सील करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत ही दुकाने बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. शहरातील दुकानदारांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहाकार्य करावे व कोरोना विरोधातील लढाईस हातभार लावावा, असे आवाहन मुख्याधिकारी पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून शहरात पालिकेने विशेष पथकाची नेमणूक केली आहे.

या पथकाने वेगवेगळ्या घटनांत आतापर्यंत १० लाख १३ हजार १६० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.