शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

तीन गावांमध्ये ‘माणूस’ वाचला!

By admin | Updated: October 15, 2015 00:31 IST

सह्याद्री व्याघ्रप्रकल्प : ‘लोकमत’च्या मालिकेनंतर बाधित जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटली; पुनर्वसनाची घोषणा--...पण अगोदर \ माणूसही वाचवा!

पाटण : ‘सेव्ह द टायगर; पण अगोदर माणूस वाचवा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सलग सात दिवस पाटण तालुक्यातील गावांची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमुळे कशी ससेहोलपट सुरू आहे. तसेच जनतेच्या प्रश्नाचे व जाचक अटींचे वास्तववादी लिखाण केले होते. त्यामुळेच मळे, कोळणे आणि पाथरपूंज या कोअर (गाभा) क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन केल्याची घोषणा वन्यजीव विभागाने नुकतीच केली.‘लोकमत’मधून वृत्तमालिका सुरू असतानाच पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण, जावळी, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची बैठक बोलावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प समन्वय समितीचा बैठक आढावा घेतला.त्यानंतर लगेच ढेबेवाडी विभागात वन्यजीव विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. त्याद्वारे आता निवी, कसणी, पळशी, मासोली अशा गावांमध्ये शामप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत विकासकामे सुरू केली आहेत.आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना विभागात जाऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पबाधित लोकांचे प्रश्न वन्यजीव अधिकाऱ्यांपुढे मांडण्यासाठी बैठक घेतली. या सर्व घटना ‘लोकमत’च्या मालिकेमुळेच घडून आल्या असून, तालुक्यातील व्याघ्रबाधित जनतेला न्याय मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)राजाभाऊ शेलार यांचा जलसमर्पणाचा इशारा घाटमाथा ते नवजा आणि कोयना जलाशयाच्या काठावरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोअर झोनमध्ये येणारी १४ गावे वगळावीत तसेच बफर झोन रद्द करावा, खासगी लाँचना परवानगी द्यावी, आदी मागण्या जर २ नोव्हेंबरपर्यंत मान्य झाल्या नाही, तर ५ नोव्हेंबर रोजी कोयना धरणात जलसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे. मानवी हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.पांढरेपाणी गावचे पुनर्वसन करणार : शंभूराज देसाईपांढरेपाणी ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी करून तसा प्रस्ताव दिला तर त्या गावचे पुनर्वसन करण्यासंदर्भात नक्कीच कार्यवाही करू, अशी ग्वाही आमदार शंभूराज देसई यांनी ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत दिली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते.