शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावांमध्ये ‘माणूस’ वाचला!

By admin | Updated: October 15, 2015 00:31 IST

सह्याद्री व्याघ्रप्रकल्प : ‘लोकमत’च्या मालिकेनंतर बाधित जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटली; पुनर्वसनाची घोषणा--...पण अगोदर \ माणूसही वाचवा!

पाटण : ‘सेव्ह द टायगर; पण अगोदर माणूस वाचवा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सलग सात दिवस पाटण तालुक्यातील गावांची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमुळे कशी ससेहोलपट सुरू आहे. तसेच जनतेच्या प्रश्नाचे व जाचक अटींचे वास्तववादी लिखाण केले होते. त्यामुळेच मळे, कोळणे आणि पाथरपूंज या कोअर (गाभा) क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन केल्याची घोषणा वन्यजीव विभागाने नुकतीच केली.‘लोकमत’मधून वृत्तमालिका सुरू असतानाच पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण, जावळी, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची बैठक बोलावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प समन्वय समितीचा बैठक आढावा घेतला.त्यानंतर लगेच ढेबेवाडी विभागात वन्यजीव विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. त्याद्वारे आता निवी, कसणी, पळशी, मासोली अशा गावांमध्ये शामप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत विकासकामे सुरू केली आहेत.आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना विभागात जाऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पबाधित लोकांचे प्रश्न वन्यजीव अधिकाऱ्यांपुढे मांडण्यासाठी बैठक घेतली. या सर्व घटना ‘लोकमत’च्या मालिकेमुळेच घडून आल्या असून, तालुक्यातील व्याघ्रबाधित जनतेला न्याय मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)राजाभाऊ शेलार यांचा जलसमर्पणाचा इशारा घाटमाथा ते नवजा आणि कोयना जलाशयाच्या काठावरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोअर झोनमध्ये येणारी १४ गावे वगळावीत तसेच बफर झोन रद्द करावा, खासगी लाँचना परवानगी द्यावी, आदी मागण्या जर २ नोव्हेंबरपर्यंत मान्य झाल्या नाही, तर ५ नोव्हेंबर रोजी कोयना धरणात जलसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे. मानवी हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.पांढरेपाणी गावचे पुनर्वसन करणार : शंभूराज देसाईपांढरेपाणी ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी करून तसा प्रस्ताव दिला तर त्या गावचे पुनर्वसन करण्यासंदर्भात नक्कीच कार्यवाही करू, अशी ग्वाही आमदार शंभूराज देसई यांनी ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत दिली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते.