शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर पेंडी शेतकऱ्याकडून दहाला तीन; ग्राहकाच्या पदात दहाला एक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पिके आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला भाव कमीच मिळत असतो. कारण, सध्या शेतकऱ्यांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पिके आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला भाव कमीच मिळत असतो. कारण, सध्या शेतकऱ्यांकडून कोथिंबिरीच्या दहा रुपयांना तीन पेंड्या घेऊन विक्रेते पुढे दहाला एकच विकत असल्याचे दिसून येत आहे. यात विक्रेत्यांचा फायदाच होत आहे, तर दर कमी मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही काढता येत नाही.

जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, कोरेगाव, खटाव, माण आदी तालुक्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. काही शेतकरी तर भाजीपाल्यावर अवलंबून आहेत. वर्षभर भाजीपालाच शेतात घेतात. उत्पादित माल हा सातारा, पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला जातो तर काही शेतकरी जागेवरच व्यापारी, विक्रेत्यांना देतात. जागेवरच विकल्यास दर कमी मिळाला तरी चालतो. कारण वाहतूक खर्च वाचत असतो. पण, व्यापारी शेतकऱ्यांकडून कमीच दराने भाजीपाला घेतो. त्यानंतर पुढे दर वाढवून विकला जातो.

कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक भाज्यांत विक्रेते मालामाल होतात. कारण, शेतकऱ्यांकडून दहा रुपयांना कधी ३, कधी ४ पेंड्या घेतात. त्यानंतर याच पेंड्या शहराच्या ठिकाणी १०, १५ रुपयांना १ या प्रमाणे विकल्या जातात. त्यामुळे भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पाहिजे त्या प्रमाणात मोबदला मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे महागाई वाढली; पण शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. कारण, भाजीपाल्याला अजूनही दर चांगला मिळत नाही; पण पुढे ग्राहकाला देताना जादा दराने विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.

-राजेंद्र कणसे, शेतकरी

बाजार समितीत आम्ही शेतमाल नेतो; पण तेथे कमीच दर मिळतो. कारण, बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांपासून कोबी, टोमॅटो, बटाट्याला दर कमीच मिळत आहे; पण बाजारात विकताना तो अधिक किमतीने जातो. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.

-रामचंद्र पाटील, शेतकरी

ग्राहकांना परवडेना...

कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई वाढतच चालली आहे. कधी गॅस सिलिंडर टाकीचे दर वाढतात, तर कधी साहित्याचा भाव वाढतो. त्यातच भाजीपालाही आवाक्याबाहेर आहे. कोणतीही भाजी घ्या ४० रुपये किलोच्या पुढेच मिळत आहे.

-किरण पठारे, ग्राहक

...................................

मागील तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेलेच आहेत. फक्त कोबी आणि टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत, तर वाटाणा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळतोय, तसेच इतर भाज्यांचे दरही टिकून आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.

-सदाशिव काळे, ग्राहक

भावात फरक...

बाजार समितीत शेतकरी भाजीपाला आणतात. तेथे मालाचे दर कमी निघतात; पण हाच माल किरकोळ विक्रेत्यांना व्यापारी विकतात. त्यामुळे विक्रेते हे आपल्याला परवडेल अशा पद्धतीने विकत असतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात शेतकऱ्यांपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दर वाढत गेलेले असतात.

...शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे महागाई वाढली; पण शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. कारण, भाजीपाल्याला अजूनही दर चांगला मिळत नाही; पण पुढे ग्राहकाला देताना जादा दराने विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.

-राजेंद्र कणसे, शेतकरी

बाजार समितीत आम्ही शेतमाल नेतो; पण तेथे कमीच दर मिळतो. कारण, बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांपासून कोबी, टोमॅटो, बटाट्याला दर कमीच मिळत आहे; पण बाजारात विकताना तो अधिक किमतीने जातो. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.

-रामचंद्र पाटील, शेतकरी

ग्राहकांना परवडेना...

कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई वाढतच चालली आहे. कधी गॅस सिलिंडर टाकीचे दर वाढतात, तर कधी साहित्याचा भाव वाढतो. त्यातच भाजीपालाही आवाक्याबाहेर आहे. कोणतीही भाजी घ्या ४० रुपये किलोच्या पुढेच मिळत आहे.

-किरण पठारे, ग्राहक

कोट..

मागील तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेलेच आहेत. फक्त कोबी आणि टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत, तर वाटाणा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळतोय, तसेच इतर भाज्यांचे दरही टिकून आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.

-सदाशिव काळे, ग्राहक

चौकट..

भावात फरक...

बाजार समितीत शेतकरी भाजीपाला आणतात. तेथे मालाचे दर कमी निघतात; पण हाच माल किरकोळ विक्रेत्यांना व्यापारी विकतात. त्यामुळे विक्रेते हे आपल्याला परवडेल अशा पद्धतीने विकत असतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात शेतकऱ्यांपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दर वाढत गेलेले असतात.

...

कोणत्या भाजीला काय भाव? (किलोचे दर)

भाजीपाला बाजार समिती भाव ग्राहकाला मिळणारा भाव

वांगी २० ४०

टोमॅटो ०८ २०

कोबी ०८ २०

फ्लॉवर २० ४०

दोडका १५ ४०

कारली १० ४०

बटाटा १५ ३०

मिरची २० ४०

ढबू १० ४०

भेंडी १५ ४०

वाटाणा ५० ८०

शेवगा ४० ८०

........................................................कोणत्या भाजीला काय भाव? (किलोचे दर)

भाजीपाला बाजार समिती भाव ग्राहकाला मिळणारा भाव

वांगी २० ४०

टोमॅटो ०८ २०

कोबी ०८ २०

फ्लॉवर २० ४०

दोडका १५ ४०

कारली १० ४०

बटाटा १५ ३०

मिरची २० ४०

ढबू १० ४०

भेंडी १५ ४०

वाटाणा ५० ८०

शेवगा ४० ८०

........................................................