शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

कोथिंबीर पेंडी शेतकऱ्याकडून दहाला तीन; ग्राहकाच्या पदात दहाला एक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पिके आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला भाव कमीच मिळत असतो. कारण, सध्या शेतकऱ्यांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पिके आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला भाव कमीच मिळत असतो. कारण, सध्या शेतकऱ्यांकडून कोथिंबिरीच्या दहा रुपयांना तीन पेंड्या घेऊन विक्रेते पुढे दहाला एकच विकत असल्याचे दिसून येत आहे. यात विक्रेत्यांचा फायदाच होत आहे, तर दर कमी मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही काढता येत नाही.

जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, कोरेगाव, खटाव, माण आदी तालुक्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. काही शेतकरी तर भाजीपाल्यावर अवलंबून आहेत. वर्षभर भाजीपालाच शेतात घेतात. उत्पादित माल हा सातारा, पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला जातो तर काही शेतकरी जागेवरच व्यापारी, विक्रेत्यांना देतात. जागेवरच विकल्यास दर कमी मिळाला तरी चालतो. कारण वाहतूक खर्च वाचत असतो. पण, व्यापारी शेतकऱ्यांकडून कमीच दराने भाजीपाला घेतो. त्यानंतर पुढे दर वाढवून विकला जातो.

कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक भाज्यांत विक्रेते मालामाल होतात. कारण, शेतकऱ्यांकडून दहा रुपयांना कधी ३, कधी ४ पेंड्या घेतात. त्यानंतर याच पेंड्या शहराच्या ठिकाणी १०, १५ रुपयांना १ या प्रमाणे विकल्या जातात. त्यामुळे भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पाहिजे त्या प्रमाणात मोबदला मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे महागाई वाढली; पण शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. कारण, भाजीपाल्याला अजूनही दर चांगला मिळत नाही; पण पुढे ग्राहकाला देताना जादा दराने विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.

-राजेंद्र कणसे, शेतकरी

बाजार समितीत आम्ही शेतमाल नेतो; पण तेथे कमीच दर मिळतो. कारण, बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांपासून कोबी, टोमॅटो, बटाट्याला दर कमीच मिळत आहे; पण बाजारात विकताना तो अधिक किमतीने जातो. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.

-रामचंद्र पाटील, शेतकरी

ग्राहकांना परवडेना...

कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई वाढतच चालली आहे. कधी गॅस सिलिंडर टाकीचे दर वाढतात, तर कधी साहित्याचा भाव वाढतो. त्यातच भाजीपालाही आवाक्याबाहेर आहे. कोणतीही भाजी घ्या ४० रुपये किलोच्या पुढेच मिळत आहे.

-किरण पठारे, ग्राहक

...................................

मागील तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेलेच आहेत. फक्त कोबी आणि टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत, तर वाटाणा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळतोय, तसेच इतर भाज्यांचे दरही टिकून आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.

-सदाशिव काळे, ग्राहक

भावात फरक...

बाजार समितीत शेतकरी भाजीपाला आणतात. तेथे मालाचे दर कमी निघतात; पण हाच माल किरकोळ विक्रेत्यांना व्यापारी विकतात. त्यामुळे विक्रेते हे आपल्याला परवडेल अशा पद्धतीने विकत असतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात शेतकऱ्यांपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दर वाढत गेलेले असतात.

...शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे महागाई वाढली; पण शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. कारण, भाजीपाल्याला अजूनही दर चांगला मिळत नाही; पण पुढे ग्राहकाला देताना जादा दराने विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.

-राजेंद्र कणसे, शेतकरी

बाजार समितीत आम्ही शेतमाल नेतो; पण तेथे कमीच दर मिळतो. कारण, बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांपासून कोबी, टोमॅटो, बटाट्याला दर कमीच मिळत आहे; पण बाजारात विकताना तो अधिक किमतीने जातो. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.

-रामचंद्र पाटील, शेतकरी

ग्राहकांना परवडेना...

कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई वाढतच चालली आहे. कधी गॅस सिलिंडर टाकीचे दर वाढतात, तर कधी साहित्याचा भाव वाढतो. त्यातच भाजीपालाही आवाक्याबाहेर आहे. कोणतीही भाजी घ्या ४० रुपये किलोच्या पुढेच मिळत आहे.

-किरण पठारे, ग्राहक

कोट..

मागील तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेलेच आहेत. फक्त कोबी आणि टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत, तर वाटाणा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळतोय, तसेच इतर भाज्यांचे दरही टिकून आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.

-सदाशिव काळे, ग्राहक

चौकट..

भावात फरक...

बाजार समितीत शेतकरी भाजीपाला आणतात. तेथे मालाचे दर कमी निघतात; पण हाच माल किरकोळ विक्रेत्यांना व्यापारी विकतात. त्यामुळे विक्रेते हे आपल्याला परवडेल अशा पद्धतीने विकत असतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात शेतकऱ्यांपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दर वाढत गेलेले असतात.

...

कोणत्या भाजीला काय भाव? (किलोचे दर)

भाजीपाला बाजार समिती भाव ग्राहकाला मिळणारा भाव

वांगी २० ४०

टोमॅटो ०८ २०

कोबी ०८ २०

फ्लॉवर २० ४०

दोडका १५ ४०

कारली १० ४०

बटाटा १५ ३०

मिरची २० ४०

ढबू १० ४०

भेंडी १५ ४०

वाटाणा ५० ८०

शेवगा ४० ८०

........................................................कोणत्या भाजीला काय भाव? (किलोचे दर)

भाजीपाला बाजार समिती भाव ग्राहकाला मिळणारा भाव

वांगी २० ४०

टोमॅटो ०८ २०

कोबी ०८ २०

फ्लॉवर २० ४०

दोडका १५ ४०

कारली १० ४०

बटाटा १५ ३०

मिरची २० ४०

ढबू १० ४०

भेंडी १५ ४०

वाटाणा ५० ८०

शेवगा ४० ८०

........................................................