शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

भरदिवसा तीन फ्लॅट फोडले!

By admin | Updated: October 17, 2016 00:33 IST

आगाशिवनगरमध्ये चोरी : साठ हजारांवर रोकड लंपास

मलकापूर : कटावणीच्या साह्याने कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा तीन फ्लॅटमधून सुमारे ६२ हजारांहून अधिक रोखड लंपास केली. आगाशिवनगर येथील बालाजी पार्क या इमारतीत गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील बालाजी कॉलनीमध्ये ‘बालाजी पार्क’ ही इमारत आहे. या इमारतीच्या बी २ फ्लॅटमध्ये हेमंत धोंडिराम घारे हे नऊ वर्षांपासून कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी हेमंत हे कामासाठी बाहेर गेले होते. मुलेही शाळेत गेली असल्याने हेमंतच्या पत्नी खरेदीसाठी कऱ्हाड शहरात गेल्या होत्या. कऱ्हाडमधील कामे आटोपून त्या दुपारी एक वाजता परत घरी आल्या. खरेदी केलेले साहित्य घरात ठेवून त्यांनी घराला कुलूप लावले व थोडावेळ शेजारच्या फ्लॅटमध्ये जाऊन बसल्या. अर्ध्या तासाने त्या बाहेर आल्या असता त्यांच्या दाराचा कोयंडा तुटून कुलूप खाली पडल्याचे निदर्शनास आले. दार उघडे असल्याने घरात चोरी झाल्याची त्यांची खात्री झाली. याबाबत त्यांनी पती हेमंत यांच्यासह शेजाऱ्यांना माहिती दिली. तसेच घरात जाऊन पाहिले असता टेबलचे ड्राव्हर, कपाटाचे दार कटावणीच्या साह्याने उचकटून पर्स, कपाटातील व कपड्यात ठेवलेले सुमारे ५० हजार ६०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर विठ्ठल घाडगे कुटुंबासह राहतात. ते नोकरी निमित्ताने सकाळीच बाहेर गेले होते. त्यांच्याही फ्लॅटमधून चोरट्यांनी १२ हजार रोख रक्कम लंपास केली. तर घाडगे यांच्या शेजारीच दुर्गेश चव्हाण यांचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे कोणीही वास्तव्यास नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा बंद फ्लॅट फोडून सुमारे ६२ हजार ६०० रुपये रोख रक्कम लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेबाबत संबंधित कुटुंबानी तातडीने कऱ्हाड शहर पोलिसांना खबर दिली. एका पोलिस कर्मचाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र, चोरीच्या घटनेची नोंद रविवारी दुपारपर्यंत पोलिसांत झाली नव्हती. पोलिसांकडून चालढकल! मलकापूरसह परिसरातून चोरीच्या घटना घडण्याची मालिकाच सुरू आहे. लहान-लहान चोरीच्या घटना पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून नागरिक पोलिसांत नोंदवत नाहीत. आगाशिवनगरात दिग्विजय प्लाझामधील चोरीचे काय झाले, हे आजपर्यंत माहीत नाही. तर बालाजी पार्कमध्ये गुरुवारी झालेल्या चोरीची रविवारपर्यंत नोंद होत नाही. यावरून अशा घटनांबाबत पोलिस चालढकल करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.