शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसीय रिक्षा बंदला स्थगिती

By admin | Updated: April 23, 2015 00:55 IST

कृती समितीची घोषणा : मुंबईत परिवहन मंत्र्यांशी शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा

कऱ्हाड : ‘ओला, उबेर या प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत उशिरा झालेले रिक्षा परवाने नूतनीकरण करण्याचे तसेच बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीला आळा घालणार आहे,’ असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आश्वासन दिले आहे. परिवहन मंत्री रावते यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कऱ्हाड अ‍ॅटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. २३, २४ व २५ रोजी पुकारण्यात आलेल्या ७२ तासांच्या स्वयंघोषित बंदला स्थगिती दिल्याची घोषणा कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे यांनी केली.अ‍ॅटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत मंगळवार, दि. २१ रोजी मुंबई येथे बैठकीत पार पडली. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्दे, कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे, मुंबई रिक्षा मेन्स युनियन अध्यक्ष शशांक राव, कृष्णा कऱ्हाड तालुका अ‍ॅटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष गफार नदाफ, प्रमोद घोणे, बाबा शिंदे, पुणे, कासम मुलाणी, नवी मुंबई, संभानाथ काळे, परभणी, महिपत पवार, सोलापूर, मल्हार गायकवाड, कल्याण डोंबिवली, बाळा जगदाळे, पनवेल, विजय गरद, रायगड पेण, गणेश देवकर, खोपोली, बापू भावे, फारूक बागवान, भागवत गरद, रहीम पटेल, मधुसुदन रहाणे, वसई, अरविंद पाटील, विनोद वरखडे, शिवार कांबळे, जहांगिर सय्यद, प्रल्हाद सोनवणे, जळगाव, नरेंद्र गायकवाड , नांदेड, राजू इंगळे, नागपूर, किरण गवळी, नंदूरबार, अशोक साळेकर, महादेव पवार, सांगली, दिलीप शिंदे, जालना, निसार अहमद, औरंगाबाद आदी राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.अ‍ॅटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने गुरुवारपासून राज्यातील १५ लाख रिक्षा चालकांनी बंद जाहीर केला होता. या बंदची दखल घेत आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या प्रयत्नातून शासन व रिक्षा संघटना पदाधिकारी यांची मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत रिक्षा चालकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. रिक्षा संघटनेच्या वतीने १७ मागण्या करण्यात आल्या होत्या. या सर्व मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सुमारे तीन तास पदाधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर राज्यभर करण्यात येणाऱ्या बंदला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. शासनाने दिलेल्या आश्वासनामुळे संपास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शासनाने दिलेले आश्वासन जून महिन्यापर्यंत पूर्ण न केल्यास पुन्हा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला. (प्रतिनिधी)