शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

वाई : वाईच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट ...

वाई : वाईच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने पंधरा गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. जोर येथे भूस्खलन होऊन तीन घरांवर रेती गेल्याने दोन घरे गाडली गेली आहेत. जोर रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने गावात अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. प्रशासनाने लवकर दाखल होऊन दळणवळण सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भात लागणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी सुखावला असला तरी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जोर, जांभळी खोऱ्यात अनेक ठिकाणी शेताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्याने मौजे बलकवडी (ता. वाई) व नांदगणे फणसेवाडी यांना जोडणारा पूल तुटल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाताच्या ताली, बांध, भाताची रोपे वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने पंधरा गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे.

दरम्यान, आमदार मकरंद पाटील, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, उपसभापती विक्रांत डोंगरे, ज्ञानदेव सणस, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, प्रमोद अनपट, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, स्वप्नील गायकवाड, श्रीकांत निकाळजे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन मदत कार्याला गती दिली.

चौकट...

दळणवळण सुरू करण्याची मागणी...

जोर येथे भूस्खलन होऊन तीन घरांवर वाळू आल्याने दोन घरे गाडली गेली आहेत. यामध्ये मायलेक वाहून गेले आहेत. जोरच्या रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने जोर गावात अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकर याठिकाणी दाखल होऊन दळणवळण सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.