शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

वाई : वाईच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट ...

वाई : वाईच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने पंधरा गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. जोर येथे भूस्खलन होऊन तीन घरांवर रेती गेल्याने दोन घरे गाडली गेली आहेत. जोर रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने गावात अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. प्रशासनाने लवकर दाखल होऊन दळणवळण सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भात लागणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी सुखावला असला तरी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जोर, जांभळी खोऱ्यात अनेक ठिकाणी शेताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्याने मौजे बलकवडी (ता. वाई) व नांदगणे फणसेवाडी यांना जोडणारा पूल तुटल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाताच्या ताली, बांध, भाताची रोपे वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने पंधरा गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे.

दरम्यान, आमदार मकरंद पाटील, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, उपसभापती विक्रांत डोंगरे, ज्ञानदेव सणस, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, प्रमोद अनपट, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, स्वप्नील गायकवाड, श्रीकांत निकाळजे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन मदत कार्याला गती दिली.

चौकट...

दळणवळण सुरू करण्याची मागणी...

जोर येथे भूस्खलन होऊन तीन घरांवर वाळू आल्याने दोन घरे गाडली गेली आहेत. यामध्ये मायलेक वाहून गेले आहेत. जोरच्या रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने जोर गावात अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकर याठिकाणी दाखल होऊन दळणवळण सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.