शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

‘तीन बिघा’तील खून जमिनीसाठीच

By admin | Updated: May 14, 2015 23:56 IST

दोघांना अटक : कोरेगावातील विशाल यादव हत्येचा अखेर लागला तपास

कोरेगाव : आसरे, ता. कोरेगाव येथील विशाल अशोक यादव याच्या ‘तीन बिघा’ नावाच्या शिवारातील खूनप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री दोघांना अटक केली आहे. विक्रम रामचंद्र पिसाळ व सोनू महेश सक्सेना (दोघेही रा. महादेवनगर, कोरेगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, जमिनीच्या व्यवहारातून आणि जुन्या भांडणाच्या रागातून खून केल्याचे स्पष्ट केले आहे. दोघांची पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशाल अशोक यादव (वय २१) याचा दि. ६ मे रोजी मध्यरात्री महादेवनगर नजीकच्या ‘तीन बिघा’ नावाच्या शिवारात खून झाला होता. ज्या दिवशी विशालचा खून झाला होता, त्याच्या अगोदर त्याची चार-पाच ठिकाणी भांडणे आणि किरकोळ मारामारी झाली होती. विशालबरोबर झालेल्या भांडणांबद्दल पोलीस ठाण्यात आजवर दाखल झालेल्या तक्रारींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. त्त्यांनी मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे विशालच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी आणि शहानिशा केली, त्यातून विक्रम रामचंद्र पिसाळ याचे नाव समोर आले. त्याला चौकशीला बोलाविले असता, त्याने टाळाटाळ केली आणि तो फरार झाला होता. त्याचदरम्यान, त्याने मोबाईल सीमकार्ड आणि हँडसेट बदलल्याने त्याचा शोध घेणे मुश्किल बनले होते. पोलीस निरीक्षक धस यांनी अखेरीस बुधवारी मध्यरात्री विक्रम पिसाळ याला कोरेगावात ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी असता, त्याने सांगितले की, विशालची आई सविता आणि वडील अशोक यांची वर्धनगड येथे दोन ठिकाणी शेतजमीन असून, तिचा व्यवहार ठरविला होता. दोन्ही जमिनींमध्ये कायदेशीर बाबींची अडचण होती, तो सोडवून व्यवहार करण्याचे दोघांना मान्य होते. पहिला व्यवहार अर्धवट राहिला आणि दुसऱ्या व्यवहारात नोटराईज करारनामा करत सुमारे पावणेसात लाखांहून अधिक रक्कम घेऊन देखील यादव कुटुंबीय दुसऱ्या व्यक्तीला वाढीव किंमतीला जमीन विकणार असल्याचे सातत्याने सांगत होते. आपण स्वत: कमावलेली रक्कम आणि नातेवाइकांकडून जमा केलेली रक्कम पाण्यात जाणार असल्याचे पाहून विक्रम पिसाळ हा अत्यवस्थ झाला होता. विशाल याने दुसऱ्या व्यक्तीला शेतजमीनविकणार असल्याचे सांगितले होते. (प्रतिनिधी) खुनासाठी सोनूने केली मदत...सोनू महेश सक्सेना हा मूळ उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बहा तालुक्यातील पातीपुरा या गावचा रहिवासी आहे. तो लहानपणीच कोरेगावात आपल्या कुटुंबीयांसमवेत आला होता. त्याचे आणि कुटुंबीयांचे पटत नसल्याने तो मित्र विक्रम पिसाळ याच्या दुकानावर रात्री झोपत असे. विशेष म्हणजे, सोनूची आणि विशालची एकदा भांडणे झाली होती, त्यावेळी विशालने त्याला ‘तुला कापतो,’ अशी धमकी दिली होती. त्याचा राग सोनूच्या मनातच होता. त्याने आपल्या जुन्या भांडणाची खुन्नस काढली.