शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

जिल्ह्यातील साडेतीन लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : योग्य नियोजन आणि आरोग्य विभागाची तत्परता यामुळे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : योग्य नियोजन आणि आरोग्य विभागाची तत्परता यामुळे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. जिल्ह्याला आतापर्यंत सुमारे पावणेचार लाख डोस मिळाले आहेत. यामधून आतापर्यंत ३ लाख ५५ हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवायचा, असे सूत्र प्रशासनाने ठेवले आहे. तसेच रेमडेसिविरची ५ हजार इंजेक्शन्स लवकरच जिल्ह्याला मिळणार आहेत.

जिल्ह्यात मागील एक वर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होते. मात्र, जून महिन्याच्या अखेरीपासून बाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या घरात स्पष्ट झाली. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही वाढत गेला. लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा कहर होता. सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात जवळपास ३८ हजारांवर रुग्ण आढळून आले. मात्र, त्यानंतर कोरोना साखळी खंडित झाल्याने बाधितांचे प्रमाण घटले. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मागील काही दिवसांचा विचार करता, मागीलपेक्षा कोरोनाची दुसरी लाट मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासा म्हणजे कोरोना लसीकरण.

जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोना लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यासाठी शासकीय तसेच काही खासगी रुग्णालयातही सोय करण्यात आली. शासकीयमध्ये मोफत, तर खासगी रुग्णालयात शुल्क आकारण्यात आले. मागील काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तर प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच उपकेंद्रातही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे गावपातळीवरील लोकांनाही लस घेता येणे शक्य झाले आहे. या लसीकरणासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. ठराविक तारखेलाच उपकेंद्रात लसीकरण होत असल्याने लोकांनाही हेलपाटे घालावे लागत नाहीत. तसेच ग्रामपंचायत, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांचा सहभाग घेतल्याने लसीकरणाचा वेग वाढत चालला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लसीचे ३ लाख ७६ हजार ३९० डोस आले आहेत, तर आणखी १९ हजार डोस मिळणार आहेत. जिल्ह्यात सोमवारअखेरपर्यंत ४५ वर्षांवरील ३ लाख ५५ हजार ३७० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. जशी लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोना लसीकरण ५ लाखावर जाणार आहे.

चौकट :

उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण...

जिल्हा प्रशासनाचे दररोज २० हजार लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. पण, या उद्दिष्टापेक्षा अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. सोमवारी एका दिवसात तर ३१ हजार ५०५ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.

................................................

आतापर्यंतचे तालुकानिहाय लसीकरण...

जावळी तालुका १५२१२, कऱ्हाड ६४०८१, खंडाळा १८३१४, खटाव तालुका ३१२३६, कोरेगाव २५०४६, महाबळेश्वर १४३९९, माण तालुका १६७०४, पाटण ४०८०३, फलटण ३१३६२, सातारा ७७४२८ आणि वाई तालुका २०७८५.

....................................................................