शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यातील ५९ गावांची तहान भागेना!

By admin | Updated: March 20, 2016 23:24 IST

टंचाईच्या झळा : घागरभर पाण्यासाठी वणवण; आढावा बैठकांतच अडकल्यात उपाययोजना

 कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात कृष्णा व कोयना या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्याचबरोबर उपनद्या, विहिरी, तलाव, कूपनलिकांची संख्याही जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत उपलब्ध असूनही यावर्षी तालुक्यातील बहुतांश गावांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे ५९ गावे यापूर्वीच टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर सध्या २१ गावे टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. गतवर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे ही भीषण परिस्थिती उद्भवली असून, प्रशासन पाणी पुरवठ्याऐवजी आढावा बैठका घेऊन चर्चा करण्यातच व्यस्त असल्याचे दिसते. कऱ्हाड तालुक्यात १९८ ग्रामपंचायती व २२२ गावे आहेत. त्यापैकी ५९ गावे यापूर्वीच टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर या गावांव्यतरिक्त अन्य २१ गावेही पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसते. या गावांतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दोनवेळा पाणीटंचाई आढावा बैठकाही घेण्यात आल्या. त्यात अनेक निर्णय, उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याची काम सुरू करण्यात आलेली नाहीत. प्रशासकीय अधिकारी बैठका आणि सूचनांमध्ये वेळ घालवत असल्याचे दिसते. प्रशासनाच्या या कारभाराबाबत शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. ‘प्रशासन काही करेना आणि तालुक्याची तहान भागेना,’ अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कऱ्हाड तालुक्याची लोकसंख्या ५ लाख ८४ हजार ८५ एवढी आहे. तर २२२ गावांचा समावेश तालुक्यात होतो. या गावांतील पाणीपुरवठा योजना, पाणीटंचाई, पिकांची उत्पादन क्षमता तसेच गावातील लोकांचे राहणीमान यांचा सर्व्हे प्रशासनाकडून करण्यात आला. त्यातून ५९ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली. मात्र, वास्तविक पाहता सद्य:स्थितीत तालुक्यात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेली २२ गावे आहेत. शिवाय उर्वरित वाड्या- वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. टंचाईग्रस्त घोषित केलेल्या गावांपैकी बोटांवर मोजण्याइतक्याच गावांना शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या घोषित टंचाईग्रस्त गावात शेतीचे उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायतीचे संकलित कर देखील भरले गेलेले नाहीत. तर टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे संकलित कर माफ करण्याऐवजी ३१ मार्च अखेर कर भरावेत; अन्यथा ग्रामपंचायतीच्या सुविधा दिल्या जाणार नाहीत, अशा सूचना काही ग्रामपंचायतींतून दिल्या जात आहेत. पीक उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतींचे कर भरलेले नाहीत. त्यामुळे या थकित कराचा बोजा इतर गावांवर पडत आहे. प्रशासनाकडून पाणीटंचाईची समस्या दूर करण्याऐवजी आढावा बैठकांद्वारे चर्चा केली जात आहे. तालुक्यातील ५० गावांचे पाणी पुरवठ्याबाबतचे प्रस्ताव धूळखात पडून आहेत. तालुक्यात चार प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना असून, त्यातील तीन सुरू आहेत. या उलट स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची संख्या २७२ आणि लघू नळ पाणीपुरवठा योजना १५० आहेत. गतवर्षी पावसाने दडी मारली होती. वळीव तसेच अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला; मात्र मान्सूनने म्हणावी तेवढी हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाळा संपताच पाणीप्रश्न निर्माण होऊ लागला. अनेक गावांना पाण्याची कमतरता भासू लागली. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती आणखी भयानक होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी) डोक्यावर ऊन : पाण्याअभावी ग्रामस्थांच्या घशाला पडली कोरड यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईतून सुटका मिळविण्यासाठी कडक उन्हात डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अशात डोक्यावर ऊन अन् घशाला कोरड अशी ग्रामीण भागाची अवस्था असल्याचे दिसून येत आहे. २१ गावे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर असलेली सध्या तालुक्यातील २१ गावे आहेत. शहापूर, अंतवडी, रिसवड, कोरीवळे, पाडळी हेळगाव, धोंडेवाडी, शामगाव, गोसावेवाडी, तुळसण, वसंतगड, उंडाळे, ओंड, कोळवाडी, कोळेवाडी, शिंदेवाडी, म्होप्रे, अकाईचीवाडी, जिंती, शेळकेवाडी, भुरभुशी, किवळ या गावांमध्ये सध्या पाणीटंचाई जाणवत आहे.