शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

‘आगाशिव’वरील हजारो वृक्ष होरपळले

By admin | Updated: September 6, 2015 20:35 IST

पाण्याची गरज : वनअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; मनसेचा आंदोलनाचा इशारा

कऱ्हाड : वनअधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आगाशिव डोंगरावरील ४ हजार १७० झाडे पाण्याअभावी जळून जात असून, संबंधित झाडांना पाणी देण्यासाठी उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेल्या आणि पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित झालेल्या आगशिव डोंगरावरील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक संस्था व पर्यावरणप्रेमींनी येथील वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनासाठी पाठबळ दिले आहे. वनविभागाच्या हद्दीत हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. परंतु त्यांच्या संगोपनाकडे वन विभागाने दुर्लक्ष केले आहे. सध्या पाऊस नसल्याने जमिनीमध्ये ओलावा नाही. त्यामुळे या परिसरातील झाडे जळून जात आहेत. आगाशिव डोंगरावरील वृक्ष संपदा पाण्याअभावी धोक्यात आली असतानाही वन विभागाकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसून येत नाही. तसेच जागोजागी पक्षी व जनावरांसाठी पाण्याचे टँक बांधलेले आहेत. त्यामध्ये सुध्दा पाणी नाही. सध्या झाडे १५ ते २० फूट उंच झाली आहेत, परंतु ती पाण्याअभावी वाळत असून, त्वरित लक्ष न दिल्यास ती नष्ट होतील.त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आगाशिव डोंगरावरील झाडांना पाणी देण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना करावी अन्यथा सोमवार, दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे मनसेच्या पत्रकात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत वनविभागाला देण्यात आली असून, त्यावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, उपाध्यक्ष महेश जगताप, तालुकाध्यक्ष दादा शिंगण यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)