शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हजारो सातारकरांचा सायकल रॅलीत सहभाग

By admin | Updated: August 16, 2016 23:00 IST

सायकल क्रांती : पर्यावरणपूरक चळवळीस आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद--लोकमत सायकल क्रांती

सातारा : पर्यावरण संवर्धनासह नागरिकांमध्ये आरोग्य जपण्याची भावना जागृत व्हावी, या उद्देशाने शहरात दैनिक ‘लोकमत’ साताऱ्यातील अमर सायकल एजन्सी, आणि फायर फॉक्स बाईक स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आलेल्या ‘सायकल क्रांती’ रॅलीत हजारो सातारकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थी, व्यावसायिक, डॉक्टर आदींसह ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला सहभाग हा या रॅलीचे वैशिष्ट ठरले. १५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी रॅलीस तालीम संघापासून प्रारंभ झाला. यानंतर रॅली राजवाडामार्गे खालच्या रस्त्याने ५०१ पाटी, शेटे चौक, पोवई नाका, न्यायालय, जिल्हा परिषद, विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून पुन्हा पोवई नाका, शाहू चौक मार्गे तालीम संघ मैदानाकडे आली. या क्रांतीसाठी साताऱ्यातील मान्यवर, सायकल संघटना, हौशी तसेच प्रोफेशनल खेळाडू, व्यावसायिक, नोकरदार व शालेय विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.रविवारी सकाळपासूनच तालीम संघाच्या मैदानावर सायकलस्वारांची गर्दी होऊ लागली. रॅली सुरू होईपर्यंत हजारो सातारकर याठिकाणी उपस्थित झाले. रॅलीत सहभागी प्रत्येक स्पर्धकांच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसून येत होता. रॅलीस प्रारंभ झाल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने रॅली शहरातून मार्गक्रमण झाली. आरोग्यासह पर्यावरण संवर्धनासाठी अशा प्रकारचे उपक्रम सतत राबविणे अत्यंत गरजेचे आहे. सायकल एक दिवस न चालविता सायकलचा दैनंदिन जीवनात वापर करावा, अशी भावना अनेक सायकलस्वार तसेच ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)इंधन बचतीसह आरोग्य संवर्धन‘सायकल क्रांती’ या चळवळीमुळेच दैनंदिन जीवनातील छोटे प्रवास सायकलवर केल्याने इंधन बचत तर होतेच त्याचप्रमाणे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. इंधन बचतीसह आरोग्य संगोपन आणि पर्यावरणजागृती अशा कित्येक बाबी आज सायकलिंगमुळे पूर्णत्वास जात आहे. अशा भावना रॅलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.‘लोकमत’च्या माध्यमातून ही चळवळ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला. हजारोंच्या संख्येने सातारकरांनी ‘सायकल क्रांती’ या चळवळीत सहभागी होऊन सातारा शहर ‘सायकल सिटी’ म्हणून नावारूपास यावे यासाठी प्रयत्न केले. येणाऱ्या काळात इंधन बचत, प्रदूषणमुक्त वातावरण तयार होणार यात काही शंकाच नाही.- आशिष जेजुरीकर