शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

ते नेते आता तुरुंगात जातील!

By admin | Updated: January 23, 2015 00:36 IST

लोणंद : बाळासाहेब बागवानांच्या एकसष्ठी सोहळ्यात राष्ट्रवादीला टोला

लोणंद : ‘जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत जिहे-कठापूरचे पाणी येणार नाही, असे फलटणचे आमदार सांगत होते. त्यांच्यासमोरच माण-खटावमध्ये पाणी नेण्यात मी यशस्वी झालो. निवडणुकीतील त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे दोघांनाही सत्तेपासून लांब राहावे लागले. आम्ही किमान घरी बसलो ते मात्र आता तुरुंगात बसतील,’ असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना लगावला.लोणंद येथे काँग्रेसचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांच्या एकसष्ठी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, शंकरराव गाढवे, प्रल्हाद पाटील, रणजित निंबाळकर, बापूराव धायगुडे, स्वाती बरदाडे, अनिरुद्ध गाढवे, अजय धायगुडे, अनिता शेळके, विठ्ठल शेळके, राजू कदम, धनाजी अहिरेकर, भरत शेळके, मुबीन बागवान, अशोक डोईफोडे, शैलजा खरात, देवती डोईफोडे, नंदा गायकवाड उपस्थित होते. यावेळी जयकुमार गोरे व रेखा खरात यांचा नागरी सत्कार करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘हार-तुऱ्यांमध्ये न राहता सामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारा बाळासाहेब बागवान हा नेता आहे. खंडाळा तालुक्यात पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला आहे. धरणे, कालवे बांधणे हे ठेकेदारांच्या हिताचे धोरण आहेत. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न न सुटता हजारो कोटी वाया गेले आहेत. या पैशांची वाटणी मात्र आम्ही पंधरा तालुक्यांत बंधारे बांधून जलसंधारणाची कामे केली आहेत. त्यांचे चांगले निकाल येत आहेत.’ अ‍ॅड. बाळासाहेब बागवान म्हणाले, ‘माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्यामुळेच मी राजकारणात आलो. आणि पाणीप्रश्नावर लढण्याचे सामर्थ्य मिळाले. म्हणूनच पाणी पंचायत व माथाडी बोर्डाची स्थापना केली.’यावेळी एस. वाय. पवार, भरत शेळके, शंकरराव गाढवे, आनंदराव पाटील, नंदा गायकवाड यांची भाषणे झाली. यावेळी दयानंद खरात, चंद्रकांत भंडारी, महंमद कच्छी, शामसुंदर डोईफोडे, इम्रान बागवान, सोपान क्षीरसागर, मस्कूअण्णा शेळके, अरुण गालिंदे, अ‍ॅड. बबलू मणेर, गणीभाई कच्छी, तुकाराम क्षीरसागर, लक्ष्मण शेळके, दिलीप घाडगे, बापूराव क्षीरसागर, दादू केसकर आदी उपस्थित होते. राहुल घाडगे यांनी स्वागत केले. संजय जाधव, रघुनाथ शेळके यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)नगरपंचायतीसाठी प्रयत्न करणार : चव्हाण‘युती शासनाने धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. त्यांच्याच आदिवासी विकास मंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचे सांगितले,’ असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘लोणंदचे वाटोळे व्हावे, असे वाटत असणाऱ्यांमुळेच लोणंद नगरपंचायत झाली नाही. यामुळे लोणंदचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, लोणंद नगरपंचायतीसाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे.’